शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

धोंडेवाडी ते केकतवाडी पायवाटेनेच प्रवास

By admin | Updated: June 16, 2016 01:00 IST

दऱ्या-खोऱ्यांतून वाट : स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांनंतरही वनवासच; ना रस्त्याचे रुंदीकरण ना डांबरीकरण

शिवराज लोंढे --सावरवाडी --सातेरी-महादेव डोंगरी पर्वतरांगा, दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेला प्रदेश, स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांत ना रस्त्याचे रुंदीकरण ना रस्त्याचे डांबरीकरण. दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या अजून पायवाट ही पाचवीला पूजलेली आहे. दऱ्या-खोऱ्यातून, काटेरी वनातून ग्रामस्थांना पाऊलवाटेनेच ये-जा करण्यात सारे आयुष्य वेचावे लागते. करवीर तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागातील धोंडेवाडी ते केकतवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था काटेरी बनली आहे. पाऊलवाटेतूनच वाहतूक करावी लागत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दळणवळणाचा प्रश्न धोंडेवाडी, केकतवाडी गावांचा सुटलेला नाही. केवळ मतांसाठी उपयोग करणाऱ्या कोणत्याच राजकीय नेत्यांनी धोंडेवाडी-केकतवाडी गावांना जोडणाऱ्या डोंगरी भागातील रस्त्याचे अद्याप रुंदीकरण व डांबरीकरण केलेले नाही. दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही साधी खडीही पडलेली नाही. धोंडेवाडी ते केकतवाडी दरम्यान चार किलोमीटर अंतरावरील रस्ता म्हणजे काटेरी पाऊलवाट आहे. डोंगरी भागातील महिला, पुरुष, विद्यार्थी यांना काटेरी पाऊल वाटेनेच ये-जा करावी लागते.डोंगरी भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या चाळण झाली आहे. दऱ्या-खोऱ्यांतून जाणाऱ्या या रस्त्यावरीलओढ्यावर मोरीचे अद्याप बांधकाम झालेले नाही. दोन्ही गावांतील ग्रामस्थांना गावांकडे ये-जा करण्यासाठी पाऊलवाटेचा जन्मभर आधार घ्यावा लागला. निवडणुका आल्या की, आश्वासन देणारे नेतेमंडळी मात्र निवडणुकीनंतर या डोंगरी परिसराला विसरतात हे अनेक वर्ष सत्य आहे. केवळ मतासाठी वापर करणाऱ्या नेत्यांनी मात्र दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे अद्याप दुरुस्तीचे काम सुरू केले नाही. शाळकरी विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी डोंगरी पाऊलवाटेनेच दररोज ये-जा करावी लागते.धोंडेवाडी ते केकतवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण कधी होणार या प्रश्नाकडे दोन्ही गावांच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. डोंगरी लोकांना काटेरी पाऊलवाटा मात्र पाचवीलाच पूजलेल्या आहेत. ग्रामीण भागाचा विकास कधी होणार, डोंगरी रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार यासारख्या प्रश्नांची समस्या कधी उलगडणार हा मुख्य हेतू आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे अद्याप रुंदीकरण, डांबरीकरण झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे डोंगरी लोकांचे हाल होऊ लागले आहेत. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होणे गरजेचे आहे.- रामभाऊ नलवडे, सामाजिक कार्यकर्तेदोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याकडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोणीच लक्ष दिलेले नाही. पाऊलवाटेने नागरिकांना ये-जा करावी लागते. रस्ता होणे गरजेचे आहे.- सरदार नलवडे, काँग्रेस (आय) कार्यकर्तेपाणी आल्यावर वाट बंददऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या डोंगरी भागातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी दरम्यान दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे अजून रूप पालटलेले नाही. भल्या मोठ्या शिळा अन् काटेरी झुडपातून गेलेल्या पाऊलवाटेनेच ग्रामस्थांना आपला चरितार्थ चालवावा लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गेल्या ६९ वर्षांत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मोठमोठ्या दगडी शिळेवरून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात दरीतील पाणी ओढ्यावर आले की, हा मार्ग बंद असतो. त्यामुळे अन्य रस्त्याने दोन्ही गावांना जावे लागते.