शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

धोंडेवाडी ते केकतवाडी पायवाटेनेच प्रवास

By admin | Updated: June 16, 2016 01:00 IST

दऱ्या-खोऱ्यांतून वाट : स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांनंतरही वनवासच; ना रस्त्याचे रुंदीकरण ना डांबरीकरण

शिवराज लोंढे --सावरवाडी --सातेरी-महादेव डोंगरी पर्वतरांगा, दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेला प्रदेश, स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांत ना रस्त्याचे रुंदीकरण ना रस्त्याचे डांबरीकरण. दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या अजून पायवाट ही पाचवीला पूजलेली आहे. दऱ्या-खोऱ्यातून, काटेरी वनातून ग्रामस्थांना पाऊलवाटेनेच ये-जा करण्यात सारे आयुष्य वेचावे लागते. करवीर तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागातील धोंडेवाडी ते केकतवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था काटेरी बनली आहे. पाऊलवाटेतूनच वाहतूक करावी लागत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दळणवळणाचा प्रश्न धोंडेवाडी, केकतवाडी गावांचा सुटलेला नाही. केवळ मतांसाठी उपयोग करणाऱ्या कोणत्याच राजकीय नेत्यांनी धोंडेवाडी-केकतवाडी गावांना जोडणाऱ्या डोंगरी भागातील रस्त्याचे अद्याप रुंदीकरण व डांबरीकरण केलेले नाही. दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही साधी खडीही पडलेली नाही. धोंडेवाडी ते केकतवाडी दरम्यान चार किलोमीटर अंतरावरील रस्ता म्हणजे काटेरी पाऊलवाट आहे. डोंगरी भागातील महिला, पुरुष, विद्यार्थी यांना काटेरी पाऊल वाटेनेच ये-जा करावी लागते.डोंगरी भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या चाळण झाली आहे. दऱ्या-खोऱ्यांतून जाणाऱ्या या रस्त्यावरीलओढ्यावर मोरीचे अद्याप बांधकाम झालेले नाही. दोन्ही गावांतील ग्रामस्थांना गावांकडे ये-जा करण्यासाठी पाऊलवाटेचा जन्मभर आधार घ्यावा लागला. निवडणुका आल्या की, आश्वासन देणारे नेतेमंडळी मात्र निवडणुकीनंतर या डोंगरी परिसराला विसरतात हे अनेक वर्ष सत्य आहे. केवळ मतासाठी वापर करणाऱ्या नेत्यांनी मात्र दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे अद्याप दुरुस्तीचे काम सुरू केले नाही. शाळकरी विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी डोंगरी पाऊलवाटेनेच दररोज ये-जा करावी लागते.धोंडेवाडी ते केकतवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण कधी होणार या प्रश्नाकडे दोन्ही गावांच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. डोंगरी लोकांना काटेरी पाऊलवाटा मात्र पाचवीलाच पूजलेल्या आहेत. ग्रामीण भागाचा विकास कधी होणार, डोंगरी रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार यासारख्या प्रश्नांची समस्या कधी उलगडणार हा मुख्य हेतू आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे अद्याप रुंदीकरण, डांबरीकरण झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे डोंगरी लोकांचे हाल होऊ लागले आहेत. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होणे गरजेचे आहे.- रामभाऊ नलवडे, सामाजिक कार्यकर्तेदोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याकडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोणीच लक्ष दिलेले नाही. पाऊलवाटेने नागरिकांना ये-जा करावी लागते. रस्ता होणे गरजेचे आहे.- सरदार नलवडे, काँग्रेस (आय) कार्यकर्तेपाणी आल्यावर वाट बंददऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या डोंगरी भागातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी दरम्यान दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे अजून रूप पालटलेले नाही. भल्या मोठ्या शिळा अन् काटेरी झुडपातून गेलेल्या पाऊलवाटेनेच ग्रामस्थांना आपला चरितार्थ चालवावा लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गेल्या ६९ वर्षांत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मोठमोठ्या दगडी शिळेवरून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात दरीतील पाणी ओढ्यावर आले की, हा मार्ग बंद असतो. त्यामुळे अन्य रस्त्याने दोन्ही गावांना जावे लागते.