शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

पोलिसांचे ‘बिºहाड’ दोन वर्षाला बदलणार बदलीचा नवा अध्यादेश; पोलिसांमधून नाराजी

By admin | Updated: May 11, 2014 00:45 IST

गणेश शिंदे (कोल्हापूर) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’असे ब्रीदवाक्य असलेले व २४ तास जनतेच्या सदैव रक्षणात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी

गणेश शिंदे (कोल्हापूर) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’असे ब्रीदवाक्य असलेले व २४ तास जनतेच्या सदैव रक्षणात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात बदल्यांच्या नव्या अध्यादेशामुळे नाराजी निर्माण झाली आहे. या नव्या अध्यादेशामध्ये एकाच उपविभागीय पोलीस विभागात आता चार वर्षे सेवा करण्याचा नियम राज्य शासनाने केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहा उपविभागीय कार्यालये आहेत. यातून पोलीस कर्मचार्‍यांची जिल्हाअंतर्गत २४ वर्षे सेवा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मे पोलीस ठाणे रिकामे होणार या नव्या अध्यादेशामुळे पोलीस ठाण्यातील सुमारे ७० ते ८० टक्के पोलीस कर्मचारी रिकामे होणार आहेत. जिल्ह्यात सुमारे २४०० पोलीस कर्मचारी आहेत. पूर्वी एकाच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याला सहा वर्षे सेवा बजावावी लागत होती. आता हे चित्र बदलणार आहे. पोलीस महासंचालक यांनी या आदेशाला स्थगितीची मागणी कोणत्याही पोलीस अधिकार्‍याला प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी सहा वर्षांची सेवा करता येत होती. तसेच एखाद्या पोलीस निरीक्षकाला दोन पोलीस ठाण्यांचा पदभार मिळत असे. मात्र, नव्या अध्यादेशामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकाला दोन वर्षे सेवा करता येणार आहे. या दोन वर्षांच्या अध्यादेशासाठी जिल्हा पोलीस प्रशासन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी या अद्यादेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांतून होत आहे. १५ मेपर्यंत विनंती अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी काल (शुक्रवार) सायंकाळी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला, ज्या पोलीस कर्मचार्‍यांची त्या पोलीस ठाण्यात ३१ मे २०१४ पर्यंत मुदत होत आहे, त्यांनी १५ मे २०१४ पर्यंत विनंती अर्ज करावेत, असे सांगितले आहे. त्या पोलीस कर्मचार्‍यांनी विनंती अर्जामध्ये तीन पोलीस ठाण्यांची पसंती दर्शवावी, असे सांगितले आहे. एका विभागात चार वर्षेच सेवा जिल्ह्यात करवीरसह शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, शाहूवाडी व जयसिंगपूर अशी उपविभागीय कार्यालये आहेत. सध्या शहर, करवीर, गडहिंग्लज या तीन विभागांचा पोलीस उपअधीक्षक पदाचा भार दुसर्‍या अधिकार्‍यांकडे आहे. समजा, शहर विभागातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एखाद्या पोलीस कर्मचार्‍याची चार वर्षे सलग सेवा झाली तर त्याला बदलीसाठी इतर विभागाकरिता अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे त्या कर्मचार्‍याला जुना राजवाडा पोलीस ठाणे, शाहूपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांत सेवा करण्याच्या संधीपासून मुकावे लागणार आहे.