शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या राजकारणाला बदलाचे वेध?

By admin | Updated: July 22, 2014 22:27 IST

शिवसेना-भाजपकडे कोकणचे नेतृत्त्व करणारी व्यक्ती नाही,

मनोज मुळ््ये-रत्नागिरीकोकणचे नेते नारायण राणे यांनी दिलेला मंत्रीपदाचा राजीनामा आणि गेल्या काही काळात दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणात झालेले बदल यामुळे पुढच्या काही महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाची दिशाच बदलून जाणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळाली नाही तर कोकणचा पुढचा नेता कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने शिवसेना-भाजपकडे कोकणचे नेतृत्त्व करणारी व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे आहे.पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आक्षेप घेत नारायण राणे यांनी उद्योगमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा अनेक अर्थांनी चर्चेत आला आहे. त्याचे जसे हायकमांड आणि राज्यस्तरावर पडसाद उमटले तसेच ते कोकणातही उमटू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील निकाल लागल्यापासूनच राणे यांची अस्वस्थता सुरू झाली. देशभरात मोदी लाट असली तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनता आपल्या पाठीशी ठाम उभी राहील, असा प्रचंड विश्वास राणे यांना होता आणि त्यालाच तडा गेल्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले. तो निकाल जाहीर होत असतानाच आपण मंत्रीपद सोडणार, आपण राजकारणात राहणार नाही, इतका विकास करूनही जनतेला त्याची कदर नाही, असे ते उद्विग्नपणे म्हणालेही. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाही होता. अर्थात तो मंजूर झाला नाही.या निवडणुकांनंतर अपेक्षित बदल न झाल्याने राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची ही कृती कोकणातील राजकारणाला वेगळे वळण देणारी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरातील राजकारणालाच वेगळे वळण मिळाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबतची नाराजी मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागली आहे. या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठी मरगळ आहे. त्या तुलनेत शिवसेना-भाजपचे मनोबल वाढले आहे. तरीही सेना-भाजपकडे कोकणचे नेतृत्त्व करणारा नाही, हे पुढे आले आहे.अनंत गीते यांनी गेली पाच-सहा वर्षे रायगड मतदारसंघाकडेच लक्ष केंद्र्रीत केले आहे. विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदर्गचे खासदार असले तरी या दोन्ही जिल्ह्यात ते अगदीच नवखे आहेत. रामदास कदम यांच्याकडे कोकणच्या नेतेपदाची सूत्रे मिळू शकली असती. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेने स्वत:च त्यांचे महत्त्व कमी केले आहे. शिवसेनेचे किंवा भाजपचे विद्यमान आमदार आपापल्या भागापुरतेच मर्यादीत आहेत. भाजपची ताकद मुळातच रत्नागिरी आणि गुहागर या मतदारसंघांपुरतीच अधिक आहे. पण तेथूनही कोकणला नेतृत्त्व मिळण्याची आशा नाही.नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतरची काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना औषधालाच दिसत होती. मात्र अलिकडच्या काळात वैभव नाईक यांनी कुठे ना कुठे शिवसेना जिवंत ठेवली आहे. भाजपची सिंधुदुर्गातील ताकदही मर्यादीत आहे. रायगड आणि ठाण्यातील नेतेही आपापल्या भागापुरतेच मर्यादीत आहेत. कोकणातील भाजप नेते, पदाधिकाऱ्यांच्या आशा विनोद तावडे यांच्यावर आहेत. मात्र तावडे यांनी कोकणात तळागाळात लक्ष दिलेले नाही. त्यांच्या महत्त्वाकांक्षा पुढच्या असल्यामुळे त्यांना कोकणपुरते स्वत:ला बांधून ठेवण्यात रस नाही. त्यामुळे कोकणचा नेता म्हणून कोकणात सर्वांना एकत्र करण्याची ताकद असलेला नेता युतीकडे नाही.नारायण राणे यांच्यापाठोपाठ सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांची क्षमता नोंद घेण्याइतकी आहे. मात्र राष्ट्रवादीला सिंधुदुर्गात फार मोठे स्थान नाही. दीपक केसरकर यांच्यारूपात मिळालेली विधानसभेची एक जागाही आता राष्ट्रवादीला मिळेल की नाही सांगता येत नाही. तटकरे यांनी आतापर्यंत सिंधुदुर्गात कधीही लक्ष घातलेले नाही. भास्कर जाधव यांनीही चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड यापलिकडे जोर दिलेला नाही. काँग्रेसकडे तर कोकणची जबाबदारी पेलू शकणारे उल्लेखनीय असे दुसरे नावही नाही.राज्यातील राजकारणाला वळण मिळत असताना कोकणात मात्र नेतृत्त्वहीन वाटचाल होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. विधानसभेत कोकणची लॉबी कधीच नव्हती. पण राज्यात युतीचे सरकार असताना १९९५ मध्ये सगळे आमदार, पंचायत समित्या, जिल्हा परिषद अशी सगळीच सत्तास्थाने युतीकडे होती. तेव्हापासून नारायण राणे यांच्याकडेच सर्व सूत्रे होती. ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राज्यातील सरकार आणि स्थानिक पातळीवरील बहुतांश सत्तास्थाने काँग्रेसकडे असल्याने राणे यांच्याकडील कोकणचे नेतेपद अबाधित होते. मात्र राज्यात सत्ताबदलाचे वातावरण तयार होत असताना युतीकडे कोकण सांभाळणारा सक्षम नेता नाही, हे उघडपणे दिसत आहे.-शिवसेना-भाजपच्या नेत्यांना मतदारसंघांचीच मर्यादा-राज्यातील राजकारण बदलताना कोकण नेतृत्त्वहीन?-काँग्रेस-राष्ट्रवादीकडील पर्यायही मर्यादीतच-अनंत गीतेंचे लक्ष फक्त रायगडवरच-विनायक राऊत कोकणाला नवखेच.