शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पदाधिकाऱ्यांच्या शिपाई, स्वीय सहायकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्याकडील स्वीय सहायक आणि शिपायांच्या मूळ ठिकाणी बदल्या ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्याकडील स्वीय सहायक आणि शिपायांच्या मूळ ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु याबाबतच्या आदेशांमध्ये संभ्रम असल्याने पुन्हा आहे तिथे बदली करून देतो असे सांगत जोडण्या लावत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

एरवी जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात दीड महिना या सर्वांना मूळ ठिकाणी काम करण्यास सांगितले जाते. पदाधिकारी बदलाच्या काळात अशा बदल्या केल्या जात नाहीत. परंतु यावेळी मात्र तसे आदेश काढण्यात आले आहेत. यात शिपायांना मूळ ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले असून स्वीय सहायकांना मूळ काम करून अतिरिक्त जबाबदारी सध्याचीही जबाबदारी पार पाडण्यास सांगण्यात आले आहे.

पदाधिकाऱ्यांचा स्वीय सहायक होण्यासाठी अनेकदा चढाओढ असते. तसेच शिपाई म्हणूनही काम करण्यास काहीजण प्राधान्य देतात. इतर ठिकाणी शिपाई म्हणून काम करताना पूर्ण वेळ काम असते. परंतु अनेकदा पदाधिकाऱ्यांच्या येथे काम करताना ते आल्यानंतरच काम लागते. इतरवेळी थोडा निवांत वेळ मिळतो.

विभागात काम करणे आणि पदाधिकाऱ्यांकडे काम करणे याचे अन्य फायदेही असतात. त्यामुळेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या काळातही आपली वर्णी लागावी यासाठी काहीजण धडपडत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत पहावयास मिळत आहे. यासाठी काही जणांनी इच्छुकांना हमी दिली असून त्यानुसार जोडण्या घातल्या जात आहेत.