शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीच्यावेळी मुलीही वाचवणार लोकांचा जीव-कोल्हापुरात प्रशिक्षण सुरू: प्रात्यक्षिकांसह माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:56 IST

भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत

कोल्हापूर : भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत असून, त्यांचे १५ दिवसाचे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू झाले.केंद्र सरकारच्या आपदा प्रशिक्षण उपक्रमासाठी देशातील विविध राज्यांमधील शहरांची निवड केली आहे. त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीशी सामना करणे व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी कोल्हापूरमधून २०० जणांची रेस्क्यू टीम तयार करण्यात येत आहे. यापूर्वी नागपूरमधून ३५ व कोल्हापुरातून ३० अशी ६५ मुलांची टीम तयार केली आहे.आपत्ती म्हटली की मुलांची टीम लोकांना वाचविण्यासाठी जात असते. महिला हे काम करू शकणार नाहीत, असा एक समज असतो; पण आता मुलीही या संकटांशी सामना करण्यासाठी तयार होत आहेत. त्यासाठी कोल्हापुरातील विविध भागांतून ५० मुलींची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. मुलींची टीम तयार करणारा कोल्हापूर हा देशातील पहिला जिल्हा आहे. या मुलींना गृहरक्षक दल कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण देण्यात येत आहे.हे प्रशिक्षण १५ दिवस चालणार असून, यात पूर, भूकंप, आग, त्सुनामी, इमारतींची पडझड, दरडी कोसळणे, वायू गळती, अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी लोकांचा जीव कसा वाचविला पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येत आहे. संरक्षण विभागाच्या उपनियंत्रक सोनल मेहरोळे, सहायक उपनियंत्रक बाबासाहेब मंगसुळे, सुधाकर सूर्यवंशी, अतुल जगताप हे अधिकारी मुलींना प्रशिक्षण देत आहेत.परीक्षाही होणारहे प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर, आजरा, चंदगड, इचलकरंजी, गारगोटी, भुदरगड, टाकवडे येथून मुली आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी मुलींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली जाणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर