शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

वारणा उजवा कालवा समस्यांचा सापळा

By admin | Updated: March 25, 2015 00:47 IST

शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज

राजाराम कांबळे -मलकापूर --शाहूवाडी -पन्हाळा तालुक्यांतील कोरडवाहू शेती जलसिंचनाखाली आणून कर्नाटकमध्ये वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी सुरू केलेला वारणा उजवा कालवा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दोन्ही तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालव्याकरिता शासनाने १९७८ मध्ये १०० हेक्टर जमीन संपादित केली होती. त्यानुसार सरूड ते कोडोली अशा ४४ कि. मी. दरम्यान रुंदी १६ फूट, तर खोली १२ फूट, असे या कालव्याचे सुमारे १६ कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यात आले होते.कालव्यामध्ये उड्डाण व भुयारी डक्टचा समावेश करून या कालव्याचे काम पूर्णपणे गळती विरहित होण्याकरिता स्लॅब मजबुतीकरण, अस्तरीकरण, स्विसलँड तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. शासनाकडून सुरुवातीस सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. २००७ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण होणार होते. मात्र, गेली नऊ वर्षे या कालव्याचे काम रखडले आहे. शासनाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिलेला नाही.दरम्यान, कालव्याच्या खुदाईच्या कामातून उपलब्ध माती-दगडांचे मोठे ढीग पडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीचे ढीगही ढासळून खुदाईचे काम मुजून गेले आहे. सिमेंट काँक्रीटच्या कामाला गळती लागून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी हेऊन जमीन नापीक बनू लागली आहे. कोतोली, तुरुकवाडी, रेठरे, आदी गावांतील शेतकऱ्यांच्या घरांमध्ये या कालव्याला लागलेल्या गळतीमुळे पाण्याचे झरे उमळू लागले आहेत.या कालव्यात पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. काही गावांच्या वेशीपासून हा कालवा पुढे गेल्याने तेथील रस्ता दोन्ही बाजूंनी मृत्यूचा सापळा बनला आहे. हा कालवा पुढे जाण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील जमीन शासनाने संपादित केलेली नाही.शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, तुरुकवाडी, भेडसगाव, सरूड, डोणोली, चरण, आदी गावांतून कालवा गेला आहे. येथील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन या कालव्याचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे.- शिवाजी सोनवळे, शेतकरीशासनाने या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करावे व शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीला पाण्याची सोय करावी.- शारदा डोंगरे, सरपंच, ग्रामपंचायत चरण