शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वारणा उजवा कालवा समस्यांचा सापळा

By admin | Updated: March 25, 2015 00:47 IST

शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज

राजाराम कांबळे -मलकापूर --शाहूवाडी -पन्हाळा तालुक्यांतील कोरडवाहू शेती जलसिंचनाखाली आणून कर्नाटकमध्ये वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी सुरू केलेला वारणा उजवा कालवा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दोन्ही तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालव्याकरिता शासनाने १९७८ मध्ये १०० हेक्टर जमीन संपादित केली होती. त्यानुसार सरूड ते कोडोली अशा ४४ कि. मी. दरम्यान रुंदी १६ फूट, तर खोली १२ फूट, असे या कालव्याचे सुमारे १६ कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यात आले होते.कालव्यामध्ये उड्डाण व भुयारी डक्टचा समावेश करून या कालव्याचे काम पूर्णपणे गळती विरहित होण्याकरिता स्लॅब मजबुतीकरण, अस्तरीकरण, स्विसलँड तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. शासनाकडून सुरुवातीस सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. २००७ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण होणार होते. मात्र, गेली नऊ वर्षे या कालव्याचे काम रखडले आहे. शासनाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिलेला नाही.दरम्यान, कालव्याच्या खुदाईच्या कामातून उपलब्ध माती-दगडांचे मोठे ढीग पडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीचे ढीगही ढासळून खुदाईचे काम मुजून गेले आहे. सिमेंट काँक्रीटच्या कामाला गळती लागून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी हेऊन जमीन नापीक बनू लागली आहे. कोतोली, तुरुकवाडी, रेठरे, आदी गावांतील शेतकऱ्यांच्या घरांमध्ये या कालव्याला लागलेल्या गळतीमुळे पाण्याचे झरे उमळू लागले आहेत.या कालव्यात पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. काही गावांच्या वेशीपासून हा कालवा पुढे गेल्याने तेथील रस्ता दोन्ही बाजूंनी मृत्यूचा सापळा बनला आहे. हा कालवा पुढे जाण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील जमीन शासनाने संपादित केलेली नाही.शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, तुरुकवाडी, भेडसगाव, सरूड, डोणोली, चरण, आदी गावांतून कालवा गेला आहे. येथील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन या कालव्याचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे.- शिवाजी सोनवळे, शेतकरीशासनाने या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करावे व शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीला पाण्याची सोय करावी.- शारदा डोंगरे, सरपंच, ग्रामपंचायत चरण