शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वारणा उजवा कालवा समस्यांचा सापळा

By admin | Updated: March 25, 2015 00:47 IST

शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज

राजाराम कांबळे -मलकापूर --शाहूवाडी -पन्हाळा तालुक्यांतील कोरडवाहू शेती जलसिंचनाखाली आणून कर्नाटकमध्ये वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी सुरू केलेला वारणा उजवा कालवा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दोन्ही तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालव्याकरिता शासनाने १९७८ मध्ये १०० हेक्टर जमीन संपादित केली होती. त्यानुसार सरूड ते कोडोली अशा ४४ कि. मी. दरम्यान रुंदी १६ फूट, तर खोली १२ फूट, असे या कालव्याचे सुमारे १६ कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यात आले होते.कालव्यामध्ये उड्डाण व भुयारी डक्टचा समावेश करून या कालव्याचे काम पूर्णपणे गळती विरहित होण्याकरिता स्लॅब मजबुतीकरण, अस्तरीकरण, स्विसलँड तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. शासनाकडून सुरुवातीस सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. २००७ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण होणार होते. मात्र, गेली नऊ वर्षे या कालव्याचे काम रखडले आहे. शासनाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिलेला नाही.दरम्यान, कालव्याच्या खुदाईच्या कामातून उपलब्ध माती-दगडांचे मोठे ढीग पडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीचे ढीगही ढासळून खुदाईचे काम मुजून गेले आहे. सिमेंट काँक्रीटच्या कामाला गळती लागून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी हेऊन जमीन नापीक बनू लागली आहे. कोतोली, तुरुकवाडी, रेठरे, आदी गावांतील शेतकऱ्यांच्या घरांमध्ये या कालव्याला लागलेल्या गळतीमुळे पाण्याचे झरे उमळू लागले आहेत.या कालव्यात पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. काही गावांच्या वेशीपासून हा कालवा पुढे गेल्याने तेथील रस्ता दोन्ही बाजूंनी मृत्यूचा सापळा बनला आहे. हा कालवा पुढे जाण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील जमीन शासनाने संपादित केलेली नाही.शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, तुरुकवाडी, भेडसगाव, सरूड, डोणोली, चरण, आदी गावांतून कालवा गेला आहे. येथील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन या कालव्याचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे.- शिवाजी सोनवळे, शेतकरीशासनाने या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करावे व शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीला पाण्याची सोय करावी.- शारदा डोंगरे, सरपंच, ग्रामपंचायत चरण