शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वाहतूक पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

‘मार्च एंडिंग’ : वाहनधारकांची पिळवणूक

कोल्हापूर : नंबर व्यवस्थित अन् ठळक हवेत, जेणेकरून ते पटकन वाचता येतील, आदी नियम आहेत; पण या नियमांची नेहमी पायमल्ली होते. याकडे शहर वाहतूक शाखेचे लक्ष कसे नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. परंतु, वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना वाहतूक पोलीस सन्मानाची वागणूक न देता ‘ए, चल गाडी बाजूला घे’, अशी अरेरावीची भाषा वापरत आहेत. कायद्याचे रक्षण करणारेच रस्त्यावर गुंडगिरी करू लागल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात सध्या दुचाकींचा वापर करून घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये चोऱ्या, चेन स्नॅचिंग, अपहरण व अपघातांसारख्या घटनांचा समावेश असून, अशा गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या वाहनांना नोंदणी क्रमांक नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. काही वाहनचालक वाहनांवर नंबर न घालता दादा, मामा, राज, राम, भाई, अमर, पाटील, राऊत असे फॅन्सी अक्षरातील नंबर लावतात. अशा वाहनांवर गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई सुरू आहे. मार्च एंडिंगचा कोटा पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून ‘दबंग’गिरी सुरू केली आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांकडेही गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून सक्तीने दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. बिंदू चौक, भवानी मंडप परिसरात बंदोबस्तास असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी तर कहरच केला आहे. बाहेरून आलेल्या पर्यटक, भाविकांना या पोलिसांकडून अरेरावीची भाषा ऐकावी लागत आहे. चार-पाचजणांची टीम बनवून चौका-चौकांत वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे. या टीमचा रुबाब आणि उद्धट भाषा यामुळे खाकी वर्दीतल्या गुंडगिरीचे दर्शन लोकांना पाहायला मिळत आहे. वाहनचालक परवाना असूनही गाडीची कागदपत्रके जवळ नाहीत, असे कारण सांगत सक्तीने दंडाची वसुली केली जात आहे, या वाहतूक पोलिसांबाबतीत नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी सक्त सूचना देऊ.- अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक