शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

महामार्गावरील वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

पोलिसांची कमतरता : पुरेशा सुविधांअभावी होतेय धावाधाव

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस दलाकडे विविध सोयीसुविधांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे़ वाहतूक पोलिसांची कमतरता हा त्यातील महत्त्वाचा अडसर असून, पोलिसांची पुरती दमछाक होत असल्याने त्यांचे संख्याबळ वाढवणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गासाठी केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर आहे. त्यातील १७ पोलीस कर्मचारी या अपघातप्रवण क्षेत्रात काम करीत आहेत. वास्तविक हा मार्ग तसा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. दररोज या मार्गावरून होत असलेली वाहतूक धोकादायक होत आहे.उत्सव आणि विविध सुट्यांच्या काळात या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण आणणे तसे जिकरीचे होत आहे. प्रतिवर्षी या मार्गावर शेकडोंच्या संख्येत बळी जाण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण भयावह आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाला हवी तेवढी गती अद्याप प्राप्त झाली नाही. किमान वर्षभर तरी या मार्गावर चौफेर वाहतूक सुरू होण्याची शक्यता नाही़ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडवताना पोलिसांना कसरत करावी लागते. या मार्गावर कशेडी, चिपळूण आणि हातखंबा या ठिकाणी वाहतूकपोलिसांची चेकनाकी आहेत. मात्र, पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता महामार्गावरील अपघातप्रसंगी निगराणी करताना मोठी कसरत करावी लागते.महामार्गावरील हातखंबा हा तसा पोलिसांची जास्त निगराणी असलेला तळ आहे. अगदी संगमेश्वर येथील बावनदीपासून गोव्यापर्यंत पोलिसांना निगराणी करावी लागत आहे. शिवाय रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांना करावे लागते. या ठिकाणी ३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १७ पोलीस कर्मचारी अपघाताच्या वेळी धावाधाव करीत असतात.हातखंबा परिसरात एकाचवेळी दोन अपघात झाल्यास या भागातील पोलीस अपघातस्थळी वेळेत पोहोचू शकत नाहीत. यामुळे गंभीर रूग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. शिवाय पोलिसांच्या व्हॅनला एकच चालक असल्याने फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यांची धावाधाव होते. येथील वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्यास महामार्गावरील अपघात रोखणे तसेच विनाविलंब सेवा पुरविणे शक्य होणार आहे.तसेच एका अतिरिक्त वाहनांची उपलब्धता करून देणे अनिवार्य झाले आहे. महामार्गावरील वाहतूक पोलिसांची ही त्रेधातिरपीट लक्षात घेत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गावर केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर.रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांकडे.३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर.केवळ १७ पोलीस कर्मचारी करतात धावाधाव.