शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

महामार्गावरील वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

पोलिसांची कमतरता : पुरेशा सुविधांअभावी होतेय धावाधाव

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस दलाकडे विविध सोयीसुविधांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे़ वाहतूक पोलिसांची कमतरता हा त्यातील महत्त्वाचा अडसर असून, पोलिसांची पुरती दमछाक होत असल्याने त्यांचे संख्याबळ वाढवणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गासाठी केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर आहे. त्यातील १७ पोलीस कर्मचारी या अपघातप्रवण क्षेत्रात काम करीत आहेत. वास्तविक हा मार्ग तसा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. दररोज या मार्गावरून होत असलेली वाहतूक धोकादायक होत आहे.उत्सव आणि विविध सुट्यांच्या काळात या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण आणणे तसे जिकरीचे होत आहे. प्रतिवर्षी या मार्गावर शेकडोंच्या संख्येत बळी जाण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण भयावह आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाला हवी तेवढी गती अद्याप प्राप्त झाली नाही. किमान वर्षभर तरी या मार्गावर चौफेर वाहतूक सुरू होण्याची शक्यता नाही़ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडवताना पोलिसांना कसरत करावी लागते. या मार्गावर कशेडी, चिपळूण आणि हातखंबा या ठिकाणी वाहतूकपोलिसांची चेकनाकी आहेत. मात्र, पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता महामार्गावरील अपघातप्रसंगी निगराणी करताना मोठी कसरत करावी लागते.महामार्गावरील हातखंबा हा तसा पोलिसांची जास्त निगराणी असलेला तळ आहे. अगदी संगमेश्वर येथील बावनदीपासून गोव्यापर्यंत पोलिसांना निगराणी करावी लागत आहे. शिवाय रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांना करावे लागते. या ठिकाणी ३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १७ पोलीस कर्मचारी अपघाताच्या वेळी धावाधाव करीत असतात.हातखंबा परिसरात एकाचवेळी दोन अपघात झाल्यास या भागातील पोलीस अपघातस्थळी वेळेत पोहोचू शकत नाहीत. यामुळे गंभीर रूग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. शिवाय पोलिसांच्या व्हॅनला एकच चालक असल्याने फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यांची धावाधाव होते. येथील वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्यास महामार्गावरील अपघात रोखणे तसेच विनाविलंब सेवा पुरविणे शक्य होणार आहे.तसेच एका अतिरिक्त वाहनांची उपलब्धता करून देणे अनिवार्य झाले आहे. महामार्गावरील वाहतूक पोलिसांची ही त्रेधातिरपीट लक्षात घेत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गावर केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर.रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांकडे.३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर.केवळ १७ पोलीस कर्मचारी करतात धावाधाव.