शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

पोलिसांची कमतरता : पुरेशा सुविधांअभावी होतेय धावाधाव

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस दलाकडे विविध सोयीसुविधांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे़ वाहतूक पोलिसांची कमतरता हा त्यातील महत्त्वाचा अडसर असून, पोलिसांची पुरती दमछाक होत असल्याने त्यांचे संख्याबळ वाढवणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गासाठी केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर आहे. त्यातील १७ पोलीस कर्मचारी या अपघातप्रवण क्षेत्रात काम करीत आहेत. वास्तविक हा मार्ग तसा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. दररोज या मार्गावरून होत असलेली वाहतूक धोकादायक होत आहे.उत्सव आणि विविध सुट्यांच्या काळात या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण आणणे तसे जिकरीचे होत आहे. प्रतिवर्षी या मार्गावर शेकडोंच्या संख्येत बळी जाण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण भयावह आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाला हवी तेवढी गती अद्याप प्राप्त झाली नाही. किमान वर्षभर तरी या मार्गावर चौफेर वाहतूक सुरू होण्याची शक्यता नाही़ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडवताना पोलिसांना कसरत करावी लागते. या मार्गावर कशेडी, चिपळूण आणि हातखंबा या ठिकाणी वाहतूकपोलिसांची चेकनाकी आहेत. मात्र, पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता महामार्गावरील अपघातप्रसंगी निगराणी करताना मोठी कसरत करावी लागते.महामार्गावरील हातखंबा हा तसा पोलिसांची जास्त निगराणी असलेला तळ आहे. अगदी संगमेश्वर येथील बावनदीपासून गोव्यापर्यंत पोलिसांना निगराणी करावी लागत आहे. शिवाय रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांना करावे लागते. या ठिकाणी ३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १७ पोलीस कर्मचारी अपघाताच्या वेळी धावाधाव करीत असतात.हातखंबा परिसरात एकाचवेळी दोन अपघात झाल्यास या भागातील पोलीस अपघातस्थळी वेळेत पोहोचू शकत नाहीत. यामुळे गंभीर रूग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. शिवाय पोलिसांच्या व्हॅनला एकच चालक असल्याने फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यांची धावाधाव होते. येथील वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्यास महामार्गावरील अपघात रोखणे तसेच विनाविलंब सेवा पुरविणे शक्य होणार आहे.तसेच एका अतिरिक्त वाहनांची उपलब्धता करून देणे अनिवार्य झाले आहे. महामार्गावरील वाहतूक पोलिसांची ही त्रेधातिरपीट लक्षात घेत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गावर केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर.रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांकडे.३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर.केवळ १७ पोलीस कर्मचारी करतात धावाधाव.