शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

दानवाड दुधगंगा पुलावरील वाहतूक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST

दत्तवाड : महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीवरील पुलावर मध्यभागी खड्डा पडला असून, ...

दत्तवाड : महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीवरील पुलावर मध्यभागी खड्डा पडला असून, आतील सळ्या बाहेर आल्याने वाहनधारकांना कसरत करतच वाहन चालवावे लागत आहे. तर संरक्षक कठडा तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीवरील पूल हा शिरवत-चिक्कोडी कर्नाटक यांना जोडणारा मुख्य पूल आहे. या पुलावरून नृसिंहवाडी, जयसिंगपूर याठिकाणी येणाऱ्या कर्नाटकातील भाविकांची संख्या जास्त आहे; तर कर्नाटकातील चिक्कोडी, संकेश्वर, बेळगाव याबरोबर रायबाग या भागात जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. सीमाभागातील शिरोळला जोडणारा हा मुख्य पूल आहे. या पुलाच्या मध्यभागी खड्डा पडला आहे. या खड्डयातून पुलाच्या आतील स्लॅबमध्ये असणाऱ्या सळ्या बाहेर आल्या आहेत. यामुळे हा खड्डा चुकवून बाजूला गाडी घेतली, तरी बाजूच्या संरक्षक कठडादेखील तुटला आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, हा खड्डा त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

फोटो - १९०४२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - दुधगंगा नदीवरील पुलावर पडलेला खड्डा व तुटलेला संरक्षक कठडा. (छाया - सुकुमार पाटील, जुने दानवाड)