शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय कामगार गावी जाण्याच्या मार्गावर. कोल्हापूर मधील फौंड्री उद्योगा समोर नवीन संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:14 IST

लाॅकडाऊन उठल्यावर तात्काळ रेल्वे अथवा इतर गाड्या पकडन गावी या असे या कामगारांना घरचे लोक फोन करून बोलवत आहेत. कोल्हापूर मधील उद्योगात परप्रांतीय कामगारांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. हे कामगार फौंड्रीत मोल्डींग,फेटलींग,रस ओतण्याचे काम,मशिनशाॅप मध्ये अवघड काम करतात आणि लाॅकडाऊन उठल्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगार घरी गेले तर कामगार आणायचे कुठून हा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.

ठळक मुद्देपण तरीही लाॅकडाऊन उठल्यावर जर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर स्थानिक ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग पुन्हा संकटात येणार.

-शिरोली--सतीश पाटील 

लाॅकडाऊन उठल्यावर उद्योजकांच्यावर परप्रांतीय कामगारांना थांबवण्याचे नवीन संकट उभ राहणार आहे. कोरोनाच्या भितीने जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार परत गावी जाण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना मुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे.भारतात ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत.

 कोल्हापूर जिल्ह्यात ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग मोठा आहे. शिरोली गोकुळ शिरगांव, कागल या ठिकाणच्या फौंड्री उद्योगात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. हे कामगार उत्तरप्रदेश,बिहार,कर्नाटक, पश्चिम बंगाल, उडीसा, झारखंड, मध्यप्रदेश येथील आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या कामगारांच्या घरातील लोक काळजीत पडले आहेत. लाॅकडाऊन उठल्यावर तात्काळ रेल्वे अथवा इतर गाड्या पकडन गावी या असे या कामगारांना घरचे लोक फोन करून बोलवत आहेत. कोल्हापूर मधील उद्योगात परप्रांतीय कामगारांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. हे कामगार फौंड्रीत मोल्डींग,फेटलींग,रस ओतण्याचे काम,मशिनशाॅप मध्ये अवघड काम करतात आणि लाॅकडाऊन उठल्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगार घरी गेले तर कामगार आणायचे कुठून हा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.

यासाठी या कामगारांची जेवणाची, खाण्या पिण्याची, पैशांची खबरदारी उद्योजकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. लागेल ती मदत देतो पण तुम्ही जाऊ नका. आपल कोल्हापूर हे चांगलं आहे. या ठिकाणी कोणताही धोका नाही तुमची काळजी आम्ही घेतो.असे सांगुन कामगरांच्या घरच्यांना ही फोन वरून समजावत आहेत. पण तरीही लाॅकडाऊन उठल्यावर जर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर स्थानिक ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग पुन्हा संकटात येणार.

 

लाॅकडाऊन उठल्यावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर फौंड्री उद्योग अडचणीत येईल यासाठी स्मॅक आणि इतर औद्योगिक संघटनांनी या कामगारांचे प्रबोधन, मनधरणी करण्याचे ठरवले आहे.स्थानिक  कामगारांना सुद्धा सर्व सुविधा देण्याचे ठरवले आहे. (स्मॅक अध्यक्ष - अतुल पाटील)

 

परप्रांतीय कामगार कोल्हापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. हे कामगार लाॅकडाऊन उठल्यावर जर गावी गेले तर पुन्हा लवकर हे कामगार येतील का हे माहिती नाही.कामगारांची पोकळी निर्माण होईल आणि पुन्हा काम सुरू करताना उद्योगां समोर अडचणी निर्माण होतील.(फौंड्री उद्योजक-निरज झंवर)

 

स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांनी लाॅकडाऊन नंतर गावी जाऊ नये. कामगार गावाला गेले तर फौंड्री उद्योग अडचणीत येईल. कामगारांनी उद्योजकांना आणि उद्योजकांनी कामगारांना समजवून घेतले पाहिजे.आणि उद्योग सुरू केले पाहिजे.(काॅ.इम्रान जंगले- जनरल सेक्रेटरी कोल्हापुर जनरल कामगार युनियन लालबवटा)

 

 

  • उद्योजकांची पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंदकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी बैठक झाली आणि उद्योजकांना लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेल्या उद्योगांचे विज बिलाचे स्थीर आकार रद्द करावेत.तसेच जीएसटीसह इतर कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. अशी मागणी केली. या बैठकीला स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमा अध्यक्ष सचिन शिरगांवकर,मॅक अध्यक्ष गोरख माळी,राजू पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी