शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

शाहुपुरी, लक्ष्मीपुरीतील व्यापारी, व्यावसायिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

कोल्हापूर : जोरदार पावसामुळे आलेल्या महापुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने शुक्रवारी शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, स्टेशनरोड, व्हिनस कॉर्नर परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांची ...

कोल्हापूर : जोरदार पावसामुळे आलेल्या महापुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने शुक्रवारी शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, स्टेशनरोड, व्हिनस कॉर्नर परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे दुकानांतील साहित्याचे नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जयंती नाला ओसंडून वाहू लागला. त्याचे पाणी व्यापारीपेठ असणाऱ्या शाहुपुरीतील पहिली ते सहावी गल्ली, लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून पाणी शिरले. तासगाणिक त्यामध्ये वाढ होऊ लागली. या परिसरात औषधे, किराणा, शेती अवजारे, कोंडा, टायर्स, डिजिटल प्रिटिंग, चांदी कारागीर आदींची दुकाने आहेत. सखल ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये वेगाने पाणी शिरले. त्यातील काहींना दुकानांपर्यंत पोहोचता आले नाही. दुकानांपर्यंत जाणे शक्य असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांनी त्यांच्या कुटुंबीय, कामगारांच्या मदतीने साहित्य सुरक्षित ठिकाणी नेले. काहींना कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत साहित्य तेथून बाहेर काढले. कोसळणारा पाणी आणि महापुराच्या वाढणाऱ्या पाण्यात जीव मुठीत घेऊन त्यांचे साहित्य स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. साहित्य स्थलांतरित केल्यानंतर त्यांनी दुकाने बंद केली. दुपारी चारपर्यंत बहुतांश त्यांचे काम सुरू होते.

चौकट

‘कोल्हापूर चेंबर’कडून दक्षतेचे आवाहन

शहरात महापुराचे पाणी वाढू लागल्याचे निर्दशनास आल्यानंतर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने गुरुवारी सायंकाळपासून शाहुपुरी, लक्ष्मीपुरीसह पुराचे पाणी येणाऱ्या परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांमधील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सांगितले. पावसाबरोबरच पुराचे पाणी वाढत असल्याने व्यापारी, व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. पुरामुळे शहरात स्थलांतरित झालेल्या आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी परिसरातील नागरिकांना जेवण पुरविण्यासाठी हॉटेल मालक संघाला आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

पुन्हा फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील व्यापार, व्यवसाय बंद राहिला. गेल्या आठवड्यापासून सर्व व्यापार सुरू झाला आहे. त्यातच आता महापूर आल्याने व्यापारी, व्यावसायिकांना पुन्हा फटका बसला आहे.