शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शाहुपुरी, लक्ष्मीपुरीतील व्यापारी, व्यावसायिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

कोल्हापूर : जोरदार पावसामुळे आलेल्या महापुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने शुक्रवारी शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, स्टेशनरोड, व्हिनस कॉर्नर परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांची ...

कोल्हापूर : जोरदार पावसामुळे आलेल्या महापुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने शुक्रवारी शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, स्टेशनरोड, व्हिनस कॉर्नर परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे दुकानांतील साहित्याचे नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जयंती नाला ओसंडून वाहू लागला. त्याचे पाणी व्यापारीपेठ असणाऱ्या शाहुपुरीतील पहिली ते सहावी गल्ली, लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून पाणी शिरले. तासगाणिक त्यामध्ये वाढ होऊ लागली. या परिसरात औषधे, किराणा, शेती अवजारे, कोंडा, टायर्स, डिजिटल प्रिटिंग, चांदी कारागीर आदींची दुकाने आहेत. सखल ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये वेगाने पाणी शिरले. त्यातील काहींना दुकानांपर्यंत पोहोचता आले नाही. दुकानांपर्यंत जाणे शक्य असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांनी त्यांच्या कुटुंबीय, कामगारांच्या मदतीने साहित्य सुरक्षित ठिकाणी नेले. काहींना कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत साहित्य तेथून बाहेर काढले. कोसळणारा पाणी आणि महापुराच्या वाढणाऱ्या पाण्यात जीव मुठीत घेऊन त्यांचे साहित्य स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. साहित्य स्थलांतरित केल्यानंतर त्यांनी दुकाने बंद केली. दुपारी चारपर्यंत बहुतांश त्यांचे काम सुरू होते.

चौकट

‘कोल्हापूर चेंबर’कडून दक्षतेचे आवाहन

शहरात महापुराचे पाणी वाढू लागल्याचे निर्दशनास आल्यानंतर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने गुरुवारी सायंकाळपासून शाहुपुरी, लक्ष्मीपुरीसह पुराचे पाणी येणाऱ्या परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांमधील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सांगितले. पावसाबरोबरच पुराचे पाणी वाढत असल्याने व्यापारी, व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. पुरामुळे शहरात स्थलांतरित झालेल्या आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी परिसरातील नागरिकांना जेवण पुरविण्यासाठी हॉटेल मालक संघाला आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

पुन्हा फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील व्यापार, व्यवसाय बंद राहिला. गेल्या आठवड्यापासून सर्व व्यापार सुरू झाला आहे. त्यातच आता महापूर आल्याने व्यापारी, व्यावसायिकांना पुन्हा फटका बसला आहे.