शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जीएसटीच्या क्लिष्ट कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:35 IST

जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत ९०० वेळा कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आधीच क्लिष्ट आणि अस्पष्ट असलेल्या ...

जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत ९०० वेळा कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आधीच क्लिष्ट आणि अस्पष्ट असलेल्या जीएसटीचे पालन करताना व्यापाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. व्यापाऱ्याकडून ३ बी आणि जीएसटीआर १ अथवा २ बी मध्ये काही त्रुटी आढळल्यास नोंदणी निलंबित करणे, सुनावणी किंवा नोटीस न बजावता, व्यापाऱ्यांचे म्हणणे न ऐकता कारवाई केली जात आहे. हा विभाग म्हणजे कर न भरणाऱ्या विक्रेत्यांकडून वसूल करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांकडून कराची वसुली करीत आहे. सध्या बँकेचे दर ८ ते १० टक्के असताना जीएसटीमध्ये १८ ते २४ टक्क्यांच्यापुढे विलंब शुल्कदेखील भरमसाट आकारले जाते. विलंब आकार शुल्क, वेळेत रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना आयटीसी नाकारला जात आहे. ई-वे बिलामध्ये किरकोळ चूक झाल्यास किंवा वाहतूक कोंडीमुळे वाहन माल घेऊन वेळेत पोहोचले नाही, तर २०० टक्के दंड लावण्याची तरतूद केली आहे. समजा, दहा लाखांचा माल पकडला गेल्यास कराव्यतिरिक्त ३ लाख ६० हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो. देशात कोठेही तपासणी झाली तर तेथेच जाऊन याबद्दलची याचिका करावी लागते. याचिका दाखल करण्यासाठी भरमसाट डिपाॅझीटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या कायद्यामुळे मानगुटीवर राक्षस आणून बसविल्यासारखी स्थिती व्यापाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे हा कायदा सुटसुटीत आणि सरळ केल्यास व्यापारीही स्वेच्छेने कर भरणा करतील, अशी अपेक्षा व्यापारीवर्गांकडून व्यक्त होत आहे.

जाचक अटी अशा,

- ३ बी, जीएसटीआर-१, २ बी मध्ये त्रुटी आढळल्यास क्रेडिट लेजर ब्लाॅक करणे, जीएसटी नोंदणी निलंबित करणे, प्रसंगी बँक खात्यावर अथवा संपत्तीवरही टाच

- इनपुट टॅक्स (आयटीसी) मिळवण्यासाठी अव्यवहार्य निर्बंध, माल विक्री करणाऱ्यापेक्षा खरेदीदाराकडून जीएसटीची वसुली

- जीएसटी भरूनही तांत्रिक त्रुटी दाखवून माल खरेदी करणाऱ्यांकडून वसुली

- ई-वे मध्ये किरकोळ चूक झाल्यास अथवा वाहतूक कोंडीमुळे माल घेऊन येणारे वाहन वेळेत पोहोचले नाही तर २०० टक्क्यांपर्यंतचा दंड

- काही कारणांमुळे व्यापाऱ्यांनी रिटर्न वेळेत भरले नाही, तर त्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यालाही आयटीसी नाकारला जाताे.

कोट

कर चुकवेगिरी व बोगस बिलात व्यवहार करणाऱ्याविरोधात सरकारने कडक तरतुदी केल्या आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु प्रामाणिक व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजीदेखील सरकारने घ्यावी. कायदा सुटसुटीत आणि सरळ केल्यास व्यापारी स्वेच्छेने त्याचे पालन करतील. नवीन जाचक तरतुदींबद्दल चर्चा करून पुनर्विचार होणे आवश्यक आहे.

- सी.ए. दीपेश गुंदेशा