शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

जीएसटीच्या क्लिष्ट कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:35 IST

जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत ९०० वेळा कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आधीच क्लिष्ट आणि अस्पष्ट असलेल्या ...

जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत ९०० वेळा कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आधीच क्लिष्ट आणि अस्पष्ट असलेल्या जीएसटीचे पालन करताना व्यापाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. व्यापाऱ्याकडून ३ बी आणि जीएसटीआर १ अथवा २ बी मध्ये काही त्रुटी आढळल्यास नोंदणी निलंबित करणे, सुनावणी किंवा नोटीस न बजावता, व्यापाऱ्यांचे म्हणणे न ऐकता कारवाई केली जात आहे. हा विभाग म्हणजे कर न भरणाऱ्या विक्रेत्यांकडून वसूल करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांकडून कराची वसुली करीत आहे. सध्या बँकेचे दर ८ ते १० टक्के असताना जीएसटीमध्ये १८ ते २४ टक्क्यांच्यापुढे विलंब शुल्कदेखील भरमसाट आकारले जाते. विलंब आकार शुल्क, वेळेत रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना आयटीसी नाकारला जात आहे. ई-वे बिलामध्ये किरकोळ चूक झाल्यास किंवा वाहतूक कोंडीमुळे वाहन माल घेऊन वेळेत पोहोचले नाही, तर २०० टक्के दंड लावण्याची तरतूद केली आहे. समजा, दहा लाखांचा माल पकडला गेल्यास कराव्यतिरिक्त ३ लाख ६० हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो. देशात कोठेही तपासणी झाली तर तेथेच जाऊन याबद्दलची याचिका करावी लागते. याचिका दाखल करण्यासाठी भरमसाट डिपाॅझीटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या कायद्यामुळे मानगुटीवर राक्षस आणून बसविल्यासारखी स्थिती व्यापाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे हा कायदा सुटसुटीत आणि सरळ केल्यास व्यापारीही स्वेच्छेने कर भरणा करतील, अशी अपेक्षा व्यापारीवर्गांकडून व्यक्त होत आहे.

जाचक अटी अशा,

- ३ बी, जीएसटीआर-१, २ बी मध्ये त्रुटी आढळल्यास क्रेडिट लेजर ब्लाॅक करणे, जीएसटी नोंदणी निलंबित करणे, प्रसंगी बँक खात्यावर अथवा संपत्तीवरही टाच

- इनपुट टॅक्स (आयटीसी) मिळवण्यासाठी अव्यवहार्य निर्बंध, माल विक्री करणाऱ्यापेक्षा खरेदीदाराकडून जीएसटीची वसुली

- जीएसटी भरूनही तांत्रिक त्रुटी दाखवून माल खरेदी करणाऱ्यांकडून वसुली

- ई-वे मध्ये किरकोळ चूक झाल्यास अथवा वाहतूक कोंडीमुळे माल घेऊन येणारे वाहन वेळेत पोहोचले नाही तर २०० टक्क्यांपर्यंतचा दंड

- काही कारणांमुळे व्यापाऱ्यांनी रिटर्न वेळेत भरले नाही, तर त्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यालाही आयटीसी नाकारला जाताे.

कोट

कर चुकवेगिरी व बोगस बिलात व्यवहार करणाऱ्याविरोधात सरकारने कडक तरतुदी केल्या आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु प्रामाणिक व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजीदेखील सरकारने घ्यावी. कायदा सुटसुटीत आणि सरळ केल्यास व्यापारी स्वेच्छेने त्याचे पालन करतील. नवीन जाचक तरतुदींबद्दल चर्चा करून पुनर्विचार होणे आवश्यक आहे.

- सी.ए. दीपेश गुंदेशा