शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या क्लिष्ट कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:35 IST

जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत ९०० वेळा कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आधीच क्लिष्ट आणि अस्पष्ट असलेल्या ...

जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत ९०० वेळा कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आधीच क्लिष्ट आणि अस्पष्ट असलेल्या जीएसटीचे पालन करताना व्यापाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. व्यापाऱ्याकडून ३ बी आणि जीएसटीआर १ अथवा २ बी मध्ये काही त्रुटी आढळल्यास नोंदणी निलंबित करणे, सुनावणी किंवा नोटीस न बजावता, व्यापाऱ्यांचे म्हणणे न ऐकता कारवाई केली जात आहे. हा विभाग म्हणजे कर न भरणाऱ्या विक्रेत्यांकडून वसूल करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांकडून कराची वसुली करीत आहे. सध्या बँकेचे दर ८ ते १० टक्के असताना जीएसटीमध्ये १८ ते २४ टक्क्यांच्यापुढे विलंब शुल्कदेखील भरमसाट आकारले जाते. विलंब आकार शुल्क, वेळेत रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना आयटीसी नाकारला जात आहे. ई-वे बिलामध्ये किरकोळ चूक झाल्यास किंवा वाहतूक कोंडीमुळे वाहन माल घेऊन वेळेत पोहोचले नाही, तर २०० टक्के दंड लावण्याची तरतूद केली आहे. समजा, दहा लाखांचा माल पकडला गेल्यास कराव्यतिरिक्त ३ लाख ६० हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो. देशात कोठेही तपासणी झाली तर तेथेच जाऊन याबद्दलची याचिका करावी लागते. याचिका दाखल करण्यासाठी भरमसाट डिपाॅझीटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या कायद्यामुळे मानगुटीवर राक्षस आणून बसविल्यासारखी स्थिती व्यापाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे हा कायदा सुटसुटीत आणि सरळ केल्यास व्यापारीही स्वेच्छेने कर भरणा करतील, अशी अपेक्षा व्यापारीवर्गांकडून व्यक्त होत आहे.

जाचक अटी अशा,

- ३ बी, जीएसटीआर-१, २ बी मध्ये त्रुटी आढळल्यास क्रेडिट लेजर ब्लाॅक करणे, जीएसटी नोंदणी निलंबित करणे, प्रसंगी बँक खात्यावर अथवा संपत्तीवरही टाच

- इनपुट टॅक्स (आयटीसी) मिळवण्यासाठी अव्यवहार्य निर्बंध, माल विक्री करणाऱ्यापेक्षा खरेदीदाराकडून जीएसटीची वसुली

- जीएसटी भरूनही तांत्रिक त्रुटी दाखवून माल खरेदी करणाऱ्यांकडून वसुली

- ई-वे मध्ये किरकोळ चूक झाल्यास अथवा वाहतूक कोंडीमुळे माल घेऊन येणारे वाहन वेळेत पोहोचले नाही तर २०० टक्क्यांपर्यंतचा दंड

- काही कारणांमुळे व्यापाऱ्यांनी रिटर्न वेळेत भरले नाही, तर त्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यालाही आयटीसी नाकारला जाताे.

कोट

कर चुकवेगिरी व बोगस बिलात व्यवहार करणाऱ्याविरोधात सरकारने कडक तरतुदी केल्या आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु प्रामाणिक व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजीदेखील सरकारने घ्यावी. कायदा सुटसुटीत आणि सरळ केल्यास व्यापारी स्वेच्छेने त्याचे पालन करतील. नवीन जाचक तरतुदींबद्दल चर्चा करून पुनर्विचार होणे आवश्यक आहे.

- सी.ए. दीपेश गुंदेशा