शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:57 IST

इचलकरंजी पालिकेवर मोर्चा : डांबरीकरण पुन्हा करण्याची मागणी

इचलकरंजी : येथील शांतीनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण नगरपालिकेकडून थांबविण्यात आल्याच्या निषेधार्थ तेथील नागरिकांनी मोर्चा काढून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना घेराव घातला. सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यामुळे रस्त्याचे बंद केलेले काम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर घेराव संपुष्टात आला.शांतीनगर परिसरामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा आणि सदरच्या निविदांची योग्य ती प्रक्रिया न करता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे चालू असलेले रस्त्याचे काम बंद करावे, अशा आशयाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे केली होती. सदरच्या तक्रारीवरून शांतीनगर परिसरातील रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते.शांतीनगर परिसरातील रस्त्याचे काम अचानकपणे बंद झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक रवी रजपुते, श्रीरंग खवरे, आदींच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा नगराध्यक्षांच्या दालनात घुसला आणि नगराध्यक्षा बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना घेराव घातला. त्यावेळी झालेल्या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून रस्त्याचे काम स्थगित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. अखेर रस्त्याचे काम पुन्हा चालू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले. यावेळी भाजपचे धोंडिराम जावळे, नरेश नगरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)इचलकरंजीतील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना नगरसेवक रवी रजपुते, श्रीरंग खवरे यांनी निवेदन दिले. यावेळी धोंडिराम जावळे, नरेश नगरकर उपस्थित होते.