शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:57 IST

इचलकरंजी पालिकेवर मोर्चा : डांबरीकरण पुन्हा करण्याची मागणी

इचलकरंजी : येथील शांतीनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण नगरपालिकेकडून थांबविण्यात आल्याच्या निषेधार्थ तेथील नागरिकांनी मोर्चा काढून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना घेराव घातला. सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यामुळे रस्त्याचे बंद केलेले काम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर घेराव संपुष्टात आला.शांतीनगर परिसरामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा आणि सदरच्या निविदांची योग्य ती प्रक्रिया न करता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे चालू असलेले रस्त्याचे काम बंद करावे, अशा आशयाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे केली होती. सदरच्या तक्रारीवरून शांतीनगर परिसरातील रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते.शांतीनगर परिसरातील रस्त्याचे काम अचानकपणे बंद झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक रवी रजपुते, श्रीरंग खवरे, आदींच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा नगराध्यक्षांच्या दालनात घुसला आणि नगराध्यक्षा बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना घेराव घातला. त्यावेळी झालेल्या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून रस्त्याचे काम स्थगित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. अखेर रस्त्याचे काम पुन्हा चालू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले. यावेळी भाजपचे धोंडिराम जावळे, नरेश नगरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)इचलकरंजीतील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना नगरसेवक रवी रजपुते, श्रीरंग खवरे यांनी निवेदन दिले. यावेळी धोंडिराम जावळे, नरेश नगरकर उपस्थित होते.