शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

पर्यटकांचा सामना तबक उद्यानातील दुरवस्थेशी

By admin | Updated: April 13, 2015 00:02 IST

वनविभागाचे दुर्लक्ष : बैठक व्यवस्था, खेळणी उपलब्ध करणे गरजेचे

नितीन भगवान - पन्हाळा प्रवासी हंगाम सुरू झाला आहे. दररोज चारचाकींची रीघ लागते आहे. पर्यटक पन्हाळा बघून तबक वनउद्यानात दुपारच्यावेळी आसरा घेऊन, पुन्हा उर्वरित पन्हाळा पाहायचे; पण वनविभागाच्या दुर्लक्षामुळे तबक वनउद्यानाची दुरवस्था झाली आहे.तबक उद्यानात पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असून, लहानांसाठीची खेळणी मोडल्याने या बागेकडे पर्यटक आता फारसे येत नाहीत.पांढऱ्या, पिवळ््या व लालसर निळ््या शाडूमुळे नैसर्गिक गारवा असलेल्या या बागेत जुने, पण मोठे असे वृक्ष उभे आहेत. यात काही औषधी वृक्षसुद्धा आहेत. या झाडांमुळे बागेत पक्षीसंख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. बहुतेक पक्षीमित्र व अभ्यासक अजूनही या बागेचा फेरफटका मारताना दिसतात.बागेची सुधारणा करीत असताना नैसर्गिक समतोल न ढळता सुधारणा करणे आवश्यक आहे. राजदिंडीकडून बागेकडे येणारा रस्ता बागेच्या आसपास असणारी पांढरी, पिवळी आणि लालसर निळ््या शाडूची माती टाकून सुशोभित करणे गरजेचे आहे. बालोद्यान विभाग स्वतंत्र करून यात पारंपरिक खेळण्यांबरोबरच आधुनिक खेळणी बसविणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी हिरवळ व बैठक व्यवस्थेबरोबरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.पर्यटकांकडून मिळणारा कर आणि शासकीय निधी वापरून वनविभागाने आपल्या हद्दीतील इतर विहिरींचे पाणी या बागेत आणल्यास ही बाग सदा बहरत जाईल आणि जास्तीत जास्त पर्यटक या बागेकडे आकृष्ट होतील.