शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तूर प्रश्नास शासनच जबाबदार

By admin | Updated: May 3, 2017 00:38 IST

हसन मुश्रीफ : कागल येथे तूर खरेदीसाठी प्रतीकात्मक आंदोलन

कागल : राज्यातील तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. याला व्यापारीवर्ग कारणीभूत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे हे दिशाभूल करणारे आहे. तुरीच्या प्रश्नाला राज्य शासनच जबाबदार आहे. तूर घोटाळ्यातील गैरव्यवहार कधी शोधायचे ते शोधा. मात्र, पहिल्यांदा हलाखीत सापडलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी तूर खरेदीबद्दल प्रतीकात्मक आंदोलन म्हणून तहसीलदार किशोर घाडगे यांना पाच किलो तूर देत शासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भैया माने, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, नगरसेवक आनंदा पसारे, आदी उपस्थित होते. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या लालकिल्ल्यावरून भाषण करताना शेतीमालाला चांगला भाव देऊ, असे सांगितले होते. गतवर्षी तुरीला चांगला दर आला होता. यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र, तुरीचे उत्पादन निघून बाजारपेठेत आल्यावर भाव प्रचंड प्रमाणात खाली कोसळले. शासनाने तूर खरेदी करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकरीही थांबला; पण आता खरेदीचे नाव काढायला शासन तयार नाही. बाजार समितीच्या आवारात तूर विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागून राहिल्या आहेत. तूर विक्रीतून या वाहनांचे भाडेही निघते का नाही, अशी अवस्था आहे. शासन मात्र व्यापारीवर्गावर खापर फोडत आहेत. मोठा घोटाळा समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशी तर कराच, पण आधी तूरडाळ खरेदी करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशीही मागणी आ. मुश्रीफ यांनी केली. (प्रतिनिधी)