शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे उद्या धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:26 IST

शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात समाजबांधवांनी विविध सूचना, मते मांडली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तातडीने ...

शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात समाजबांधवांनी विविध सूचना, मते मांडली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तातडीने विशेष अधिवेशन राज्य सरकारने बोलवावे. त्याबाबत जिल्ह्यातील आमदार, खासदारांना निवेदन देण्यात येईल. अधिवेशनाच्या मागणीसाठी उद्या सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यामध्ये मराठा बांधव हे काळ्या फिती लावून सहभागी होतील. सरकारने विशेष अधिवेशन घेतले नाही तर समाजाची बैठक घेऊन पुढील आंदोलन ठरविले जाईल, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदार यांनी छत्रपती शिवाजी चौकात यावे, असे आवाहन महेश जाधव यांनी केले. आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने विशेष कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवासराव साळोखे यांनी केले. तज्ज्ञ वकिलांची परिषद घेऊन त्यांनी मांडलेल्या सूचना पुनर्विचार याचिकेमध्ये समाविष्ट कराव्यात, अशी सूचना ॲड. अशोकराव साळोखे यांनी केली. कायदेशीर टिकणाऱ्या आरक्षणासाठी लढा देणे आवश्यक आहे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे जास्तीत जास्त लाभ द्यावेत, अशी मागणी बाबा इंदुलकर यांनी केली. या बैठकीत दिलीप देसाई यांनी आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सवलती द्याव्यात. त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन राज्य सरकारने घ्यावे, या मागणीचा ठराव मांडला. तो उपस्थितांनी मान्य केला. यावेळी दिलीप पाटील, फत्तेसिंह सावंत, श्रीकांत भोसले, स्वप्निल पार्टे, दिलीप सावंत, संदीप मोहिते, राजेंद्र चव्हाण, मंजित माने, आदी उपस्थित होते. सुरेश जरग यांनी आभार मानले.

चौकट

वकील, उद्योजकांचे मार्गदर्शन घेणार

आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजातील वकील, उद्योजक बांधवांचे मार्गदर्शन घेतले जाईल. त्यासाठी त्यांच्यासमवेत बैठका घेण्यात येतील. सर्व तालीम, संस्थांना एकत्रित करून टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले जाईल, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले.

कोण, काय म्हणाले?

चंद्रकांत यादव : आरक्षणाबाबत राज्य सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे.

बाळ घाटगे : मराठा समाजाची व्होट बँक तयार व्हावी.

राजू सावंत : समाजातील तज्ज्ञांचा अभ्यासगट स्थापन करून आंदोलनाची दिशा ठरवावी.

संपत पाटील : सरकारला विशेष अधिवेशन घेण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक.

जयकुमार शिंदे : कायदेशीर मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ वकिलांचा मेळावा घ्यावा.

किशोर घाटगे : आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींचे ठराव घेऊन ते सरकारला द्यावेत.