शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो, वाटाण्याने गाठली ऐंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:32 IST

पुराच्या पाण्याने भाजीपाल्याची आवक मंदावली : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर दर वधारणार

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२३ : उत्पादन कमी त्यात पुराच्या पाण्याने आवक मंदावल्याने टोमॅटो व हिरवा वाटाणा चांगलाच कडाडला असून दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहचला आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांच्या मागणीत वाढ होणार असल्याने दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. कडधान्यासह शाबू , शेंगदाणे, साखरेचा दर स्थिर आहे. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र गेले आठ-दहा दिवस जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. जून मधील आवकेच्या तुलनेत भाजीपाला निम्यावर आला आहे.

गेले वर्षभर दहा ते वीस रुपये किलोपर्यंत राहिलेला टोमॅटोचा दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उन्हाळ्यात टोमॅटो मातीमोल किमतीने विकावा लागल्याने यंदा एप्रिल-मेमध्ये टोमॅटोची नवीन लागण झालीच नाही. त्यामुळे आवक मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या सांगली, सोलापूर येथून नियमित आवकेपेक्षा २५ टक्केच आवक सुरू असल्याने दर वधारला आहे. घाऊक बाजारात ६० रुपयांपर्यंत दर असल्याने किरकोळमध्ये ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

ओला वाटाण्यांचा दरही गगनाला भिडला आहे. हुबळी, धारवाड येथून आवक सुरू झाली असली तरी मागणी जास्त असल्याने दर तेजीत आहे. ओली मिरचीही तेजीत असून गवारी, दोडका, कारली ६० रुपये किलो आहे. वांगी, वरणा, ढब्बू ४० रुपयांपर्यंत किलो दर आहे. कोथंबीरची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत, किरकोळ बाजारात कोथंबीर दहा, मेथी पंधरा रुपयाला दोन असा दर आहे.

जीएसटीमुळे कडधान्य मार्केट अद्याप सुस्तच दिसत आहे. या कराबाबत अद्याप व्यापाऱ्यांच्या पातळीवर गोंधळ सुरू असल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होऊ लागला आहे. किरकोळ बाजारात साखर ४२ रुपयांवर स्थिर असली तरी सरकी तेलाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणामुळे शाबू, शेंगदाणांची मागणी वाढू लागली आहे, पण दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. कांदा-बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरही कायम राहिले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचा दर सरासरी ७ तर बटाटा ८ रुपये आहे.

फळमार्केट अद्याप गारठलेच!

पावसामुळे गेले दीड महिना फळ मार्केटमधील उलाढाल एकदम थंड झाली आहे. या आठवड्यात तर पुराच्या पाण्यामुळे मार्केट एकदमच गारठले आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आजपासून थोडी तेजी येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कोकण मार्ग बंदचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतून रोज २० ते २५ ट्रक भाजीपाला, कांदा-बटाटा कोकणात जातो; पण कोकणात जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी असल्याने वाहतूक तीन दिवस बंद असल्याने भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली आहे.