शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो, वाटाण्याने गाठली ऐंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:32 IST

पुराच्या पाण्याने भाजीपाल्याची आवक मंदावली : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर दर वधारणार

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२३ : उत्पादन कमी त्यात पुराच्या पाण्याने आवक मंदावल्याने टोमॅटो व हिरवा वाटाणा चांगलाच कडाडला असून दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहचला आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांच्या मागणीत वाढ होणार असल्याने दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. कडधान्यासह शाबू , शेंगदाणे, साखरेचा दर स्थिर आहे. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र गेले आठ-दहा दिवस जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. जून मधील आवकेच्या तुलनेत भाजीपाला निम्यावर आला आहे.

गेले वर्षभर दहा ते वीस रुपये किलोपर्यंत राहिलेला टोमॅटोचा दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उन्हाळ्यात टोमॅटो मातीमोल किमतीने विकावा लागल्याने यंदा एप्रिल-मेमध्ये टोमॅटोची नवीन लागण झालीच नाही. त्यामुळे आवक मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या सांगली, सोलापूर येथून नियमित आवकेपेक्षा २५ टक्केच आवक सुरू असल्याने दर वधारला आहे. घाऊक बाजारात ६० रुपयांपर्यंत दर असल्याने किरकोळमध्ये ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

ओला वाटाण्यांचा दरही गगनाला भिडला आहे. हुबळी, धारवाड येथून आवक सुरू झाली असली तरी मागणी जास्त असल्याने दर तेजीत आहे. ओली मिरचीही तेजीत असून गवारी, दोडका, कारली ६० रुपये किलो आहे. वांगी, वरणा, ढब्बू ४० रुपयांपर्यंत किलो दर आहे. कोथंबीरची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत, किरकोळ बाजारात कोथंबीर दहा, मेथी पंधरा रुपयाला दोन असा दर आहे.

जीएसटीमुळे कडधान्य मार्केट अद्याप सुस्तच दिसत आहे. या कराबाबत अद्याप व्यापाऱ्यांच्या पातळीवर गोंधळ सुरू असल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होऊ लागला आहे. किरकोळ बाजारात साखर ४२ रुपयांवर स्थिर असली तरी सरकी तेलाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणामुळे शाबू, शेंगदाणांची मागणी वाढू लागली आहे, पण दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. कांदा-बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरही कायम राहिले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचा दर सरासरी ७ तर बटाटा ८ रुपये आहे.

फळमार्केट अद्याप गारठलेच!

पावसामुळे गेले दीड महिना फळ मार्केटमधील उलाढाल एकदम थंड झाली आहे. या आठवड्यात तर पुराच्या पाण्यामुळे मार्केट एकदमच गारठले आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आजपासून थोडी तेजी येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कोकण मार्ग बंदचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतून रोज २० ते २५ ट्रक भाजीपाला, कांदा-बटाटा कोकणात जातो; पण कोकणात जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी असल्याने वाहतूक तीन दिवस बंद असल्याने भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली आहे.