शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

टोमॅटो, वाटाण्याने गाठली ऐंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:32 IST

पुराच्या पाण्याने भाजीपाल्याची आवक मंदावली : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर दर वधारणार

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२३ : उत्पादन कमी त्यात पुराच्या पाण्याने आवक मंदावल्याने टोमॅटो व हिरवा वाटाणा चांगलाच कडाडला असून दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहचला आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांच्या मागणीत वाढ होणार असल्याने दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. कडधान्यासह शाबू , शेंगदाणे, साखरेचा दर स्थिर आहे. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र गेले आठ-दहा दिवस जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. जून मधील आवकेच्या तुलनेत भाजीपाला निम्यावर आला आहे.

गेले वर्षभर दहा ते वीस रुपये किलोपर्यंत राहिलेला टोमॅटोचा दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उन्हाळ्यात टोमॅटो मातीमोल किमतीने विकावा लागल्याने यंदा एप्रिल-मेमध्ये टोमॅटोची नवीन लागण झालीच नाही. त्यामुळे आवक मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या सांगली, सोलापूर येथून नियमित आवकेपेक्षा २५ टक्केच आवक सुरू असल्याने दर वधारला आहे. घाऊक बाजारात ६० रुपयांपर्यंत दर असल्याने किरकोळमध्ये ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

ओला वाटाण्यांचा दरही गगनाला भिडला आहे. हुबळी, धारवाड येथून आवक सुरू झाली असली तरी मागणी जास्त असल्याने दर तेजीत आहे. ओली मिरचीही तेजीत असून गवारी, दोडका, कारली ६० रुपये किलो आहे. वांगी, वरणा, ढब्बू ४० रुपयांपर्यंत किलो दर आहे. कोथंबीरची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत, किरकोळ बाजारात कोथंबीर दहा, मेथी पंधरा रुपयाला दोन असा दर आहे.

जीएसटीमुळे कडधान्य मार्केट अद्याप सुस्तच दिसत आहे. या कराबाबत अद्याप व्यापाऱ्यांच्या पातळीवर गोंधळ सुरू असल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होऊ लागला आहे. किरकोळ बाजारात साखर ४२ रुपयांवर स्थिर असली तरी सरकी तेलाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणामुळे शाबू, शेंगदाणांची मागणी वाढू लागली आहे, पण दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. कांदा-बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरही कायम राहिले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचा दर सरासरी ७ तर बटाटा ८ रुपये आहे.

फळमार्केट अद्याप गारठलेच!

पावसामुळे गेले दीड महिना फळ मार्केटमधील उलाढाल एकदम थंड झाली आहे. या आठवड्यात तर पुराच्या पाण्यामुळे मार्केट एकदमच गारठले आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आजपासून थोडी तेजी येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कोकण मार्ग बंदचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतून रोज २० ते २५ ट्रक भाजीपाला, कांदा-बटाटा कोकणात जातो; पण कोकणात जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी असल्याने वाहतूक तीन दिवस बंद असल्याने भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली आहे.