शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यातील वृक्षसंवर्धनासाठी टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:16 IST

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली ...

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली खरी. मात्र, ती झाडे जगवायची कुणी, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची यावरून प्रशासनातीलच दोन विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे कळंबा तलावावरील लाखो रुपये खर्चून फुलवलेले हे नंदनवन कोमेजून जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे फिरावयास येणारे नागरिक झाडांना पाणी घालून ही झाडे जगवत असल्याचे चित्र आहे. कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामांतर्गत तलावास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी २०१८ साली कळंबा तलाव परिसरात चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांची लागवड करण्यात आल्यानंतर सहा महिने निविदाधारक कंपनीने संवर्धन केले. त्यानंतर हेच काम पालिका पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

यासाठी पाणीपुरवठा विभागाने त्यावेळी दोन वेळा मुदतवाढ घेतली होती. तज्ज्ञ कर्मचारीवर्गाअभावी वृक्षसंवर्धनाचे काम उद्यान विभागाने स्वीकारावे, अशी मागणी पाणीपुरवठा विभागाची आहे, तर पालिका हद्दीतील उद्याने संवर्धनासाठी कर्मचारीवर्ग तोकडा पडत असल्याने हेच काम पाणीपुरवठा विभागानेच करावे, असे सांगत उद्यान विभागानेही या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून फुलवलेल्या या नंदनवनाचे संवर्धन करायचे कोणी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासनातील या टोलवाटोलवीमुळे ही हिरवळ करपण्याची भीती व्यक्त होत आहे.

झाडे जगवली, वाढवली तरच पर्यावरण संतुलन राहणार आहे. बेसुमार वृक्षतोडीने निर्माण झालेल्या पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यासाठी एकीकडे शासन, सामाजिक संस्था एकच लक्ष शतकोटी वृक्ष मोहीम राबवित असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या ताकतुंब्यात कळंबा तलाव परिसरातील वनसंपदा कोमेजून जात असल्याचे चित्र आहे.

कर्मचारी नियुक्ती गरजेची : कळंबा तलावाची मालकी महानगरपालिकेची आहे. तलावाच्या संवर्धनासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाच्या हद्दीत वीस एकरांत अतिक्रमण झाले आहे. सुशोभीकरणाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात येत आहे. परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुले, पार्ट्यांसाठी होत आहे. ऐतिहासिक शाहूकालीन तलावाच्या संवर्धनासाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फोटो : २१ कळंबा तलाव

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कळंबा तलाव परिसरातील चार हजार वृक्षांची दुरवस्था झाली आहे.