शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

कळंब्यातील वृक्षसंवर्धनासाठी टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:16 IST

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली ...

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली खरी. मात्र, ती झाडे जगवायची कुणी, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची यावरून प्रशासनातीलच दोन विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे कळंबा तलावावरील लाखो रुपये खर्चून फुलवलेले हे नंदनवन कोमेजून जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे फिरावयास येणारे नागरिक झाडांना पाणी घालून ही झाडे जगवत असल्याचे चित्र आहे. कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामांतर्गत तलावास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी २०१८ साली कळंबा तलाव परिसरात चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांची लागवड करण्यात आल्यानंतर सहा महिने निविदाधारक कंपनीने संवर्धन केले. त्यानंतर हेच काम पालिका पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

यासाठी पाणीपुरवठा विभागाने त्यावेळी दोन वेळा मुदतवाढ घेतली होती. तज्ज्ञ कर्मचारीवर्गाअभावी वृक्षसंवर्धनाचे काम उद्यान विभागाने स्वीकारावे, अशी मागणी पाणीपुरवठा विभागाची आहे, तर पालिका हद्दीतील उद्याने संवर्धनासाठी कर्मचारीवर्ग तोकडा पडत असल्याने हेच काम पाणीपुरवठा विभागानेच करावे, असे सांगत उद्यान विभागानेही या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून फुलवलेल्या या नंदनवनाचे संवर्धन करायचे कोणी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासनातील या टोलवाटोलवीमुळे ही हिरवळ करपण्याची भीती व्यक्त होत आहे.

झाडे जगवली, वाढवली तरच पर्यावरण संतुलन राहणार आहे. बेसुमार वृक्षतोडीने निर्माण झालेल्या पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यासाठी एकीकडे शासन, सामाजिक संस्था एकच लक्ष शतकोटी वृक्ष मोहीम राबवित असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या ताकतुंब्यात कळंबा तलाव परिसरातील वनसंपदा कोमेजून जात असल्याचे चित्र आहे.

कर्मचारी नियुक्ती गरजेची : कळंबा तलावाची मालकी महानगरपालिकेची आहे. तलावाच्या संवर्धनासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाच्या हद्दीत वीस एकरांत अतिक्रमण झाले आहे. सुशोभीकरणाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात येत आहे. परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुले, पार्ट्यांसाठी होत आहे. ऐतिहासिक शाहूकालीन तलावाच्या संवर्धनासाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फोटो : २१ कळंबा तलाव

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कळंबा तलाव परिसरातील चार हजार वृक्षांची दुरवस्था झाली आहे.