शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

कळंब्यातील वृक्षसंवर्धनासाठी टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:16 IST

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली ...

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली खरी. मात्र, ती झाडे जगवायची कुणी, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची यावरून प्रशासनातीलच दोन विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे कळंबा तलावावरील लाखो रुपये खर्चून फुलवलेले हे नंदनवन कोमेजून जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे फिरावयास येणारे नागरिक झाडांना पाणी घालून ही झाडे जगवत असल्याचे चित्र आहे. कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामांतर्गत तलावास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी २०१८ साली कळंबा तलाव परिसरात चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांची लागवड करण्यात आल्यानंतर सहा महिने निविदाधारक कंपनीने संवर्धन केले. त्यानंतर हेच काम पालिका पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

यासाठी पाणीपुरवठा विभागाने त्यावेळी दोन वेळा मुदतवाढ घेतली होती. तज्ज्ञ कर्मचारीवर्गाअभावी वृक्षसंवर्धनाचे काम उद्यान विभागाने स्वीकारावे, अशी मागणी पाणीपुरवठा विभागाची आहे, तर पालिका हद्दीतील उद्याने संवर्धनासाठी कर्मचारीवर्ग तोकडा पडत असल्याने हेच काम पाणीपुरवठा विभागानेच करावे, असे सांगत उद्यान विभागानेही या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून फुलवलेल्या या नंदनवनाचे संवर्धन करायचे कोणी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासनातील या टोलवाटोलवीमुळे ही हिरवळ करपण्याची भीती व्यक्त होत आहे.

झाडे जगवली, वाढवली तरच पर्यावरण संतुलन राहणार आहे. बेसुमार वृक्षतोडीने निर्माण झालेल्या पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यासाठी एकीकडे शासन, सामाजिक संस्था एकच लक्ष शतकोटी वृक्ष मोहीम राबवित असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या ताकतुंब्यात कळंबा तलाव परिसरातील वनसंपदा कोमेजून जात असल्याचे चित्र आहे.

कर्मचारी नियुक्ती गरजेची : कळंबा तलावाची मालकी महानगरपालिकेची आहे. तलावाच्या संवर्धनासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाच्या हद्दीत वीस एकरांत अतिक्रमण झाले आहे. सुशोभीकरणाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात येत आहे. परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुले, पार्ट्यांसाठी होत आहे. ऐतिहासिक शाहूकालीन तलावाच्या संवर्धनासाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फोटो : २१ कळंबा तलाव

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कळंबा तलाव परिसरातील चार हजार वृक्षांची दुरवस्था झाली आहे.