शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

टोलनाके हटविले

By admin | Updated: February 7, 2016 00:53 IST

आयआरबीचे अस्तित्व पुसले : रस्ते विकास महामंडळाच्या आदेशानंतर मनपाची कारवाई

कोल्हापूर : तमाम कोल्हापूरकरांच्या रोषाचे प्रमुख कारण बनून राहिलेल्या शहरातील नऊ टोलनाक्यांवरील ‘आयआरबी’च्या केबिन्स शनिवारी सायंकाळनंतर हटविण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने ही कारवाई केली. आयआरबीने नाक्यावर उभ्या केलेल्या कमानी या महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याने त्या उतरविण्यात येणार नाहीत, असे मनपा सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने टोल रद्द केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ कोल्हापुरात आज, रविवारी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून ‘आयआरबी’ने उभ्या केलेल्या टोलनाक्यांवरील केबिन्स हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत स्वत: आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा केली आणि केबिन्स काढून टाकण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारी आयुक्तांनी महापालिकेत सर्वच विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्या त्यांच्या हद्दीतील टोलनाक्यावरील केबिन्स काढून घेण्याच्या सूचना दिल्या. ‘दादां’नी शब्द खरा केला.. कोल्हापुरातून टोल कायमचा हद्दपार करणार हा भाजप सरकारचा शब्द आहे व त्याबाबत कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेकदा केली होती. दोन दिवसांपूर्वी टोल रद्दची अधिसूचना जाहीर झाली तेव्हाही त्यांनी दोन दिवसांत टोलनाकेही काढून टाकले जातील, असे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी नाके हलविल्याने आयआरबी कंपनीच्या व ‘टोल’अस्तित्वाच्या खुणाही कायमच्या पुसल्या गेल्या.