शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

टोलनाके हटविले

By admin | Updated: February 7, 2016 00:53 IST

आयआरबीचे अस्तित्व पुसले : रस्ते विकास महामंडळाच्या आदेशानंतर मनपाची कारवाई

कोल्हापूर : तमाम कोल्हापूरकरांच्या रोषाचे प्रमुख कारण बनून राहिलेल्या शहरातील नऊ टोलनाक्यांवरील ‘आयआरबी’च्या केबिन्स शनिवारी सायंकाळनंतर हटविण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने ही कारवाई केली. आयआरबीने नाक्यावर उभ्या केलेल्या कमानी या महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याने त्या उतरविण्यात येणार नाहीत, असे मनपा सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने टोल रद्द केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ कोल्हापुरात आज, रविवारी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून ‘आयआरबी’ने उभ्या केलेल्या टोलनाक्यांवरील केबिन्स हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत स्वत: आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा केली आणि केबिन्स काढून टाकण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारी आयुक्तांनी महापालिकेत सर्वच विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्या त्यांच्या हद्दीतील टोलनाक्यावरील केबिन्स काढून घेण्याच्या सूचना दिल्या. ‘दादां’नी शब्द खरा केला.. कोल्हापुरातून टोल कायमचा हद्दपार करणार हा भाजप सरकारचा शब्द आहे व त्याबाबत कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेकदा केली होती. दोन दिवसांपूर्वी टोल रद्दची अधिसूचना जाहीर झाली तेव्हाही त्यांनी दोन दिवसांत टोलनाकेही काढून टाकले जातील, असे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी नाके हलविल्याने आयआरबी कंपनीच्या व ‘टोल’अस्तित्वाच्या खुणाही कायमच्या पुसल्या गेल्या.