शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यांतील वाहनांवर टोल लावावा

By admin | Updated: December 27, 2015 01:27 IST

चंद्रकांतदादांचा सल्ला : रस्तेदुरुस्तीची कसरत होणार; टोल रद्दची उद्या अधिसूचना

 कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या लोकभावना लक्षात घेऊन ‘आयआरबी’चा टोल रद्द केला आहे; पण महा-नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पैसे उभे करताना महापालिकेची कसरत होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर नाममात्र कर लावण्याचा विचार करावा, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. याशिवाय ‘आयआरबी’ला द्याव्या लागणाऱ्या रकमेपैकी कोणताही बोजा सरकार कोल्हापूर महानगरपालिकेवर टाकणार नसल्याचा महत्त्वाचा खुलासाही चंद्रकांतदादांनी यावेळी केला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरचा टोल रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळात आपले वजन सिद्ध केले आहे. टोल रद्दचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रथमच शनिवारी कोल्हापुरात आले. कोल्हापुरातील अनेक संस्थांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. टोल रद्द केल्याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जनभावनेचा आदर करीत कोल्हापूरचा टोल रद्द केल्याबाबत मला समाधान वाटते. या टोल रद्दची विधानसभेत घोषणा झाली असली तरी निर्णयाबाबत येत्या उद्या, सोमवारी नगरविकास खात्यामार्फत अधिसूचना काढण्यात येणार आहे. टोल रद्द केल्यानंतर बैठकीत तामसेकर मूल्यांकन समितीचा अहवाल ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनीला ४५९ कोटी रुपये देणार आहे; पण याचा कोणताही आर्थिक बोजा सरकार कोल्हापूर महापालिकेवर टाकणार नाही; पण महापालिकेने टेंबलाई टेकडी येथील आयआरबी कंपनीला दिलेली जागा राज्य रस्ते विकास महामंडळ आपल्या ताब्यात घेणार आहे. त्या जागेचा व त्यावरील बांधकामांवर मालकी हक्क हा रस्ते विकास महामंडळाचा राहणार आहे. टोल रद्द करण्यात आला असला तरीही महापालिकेला तयार रस्ते आपल्या ताब्यात मिळालेले आहेत. टोल रद्दचा निर्णय झाल्याने नियमानुसार आता याच तयार रस्त्यांचा दुरुस्ती-देखभालीचा खर्च महानगरपालिकेला करावा लागणार आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा दुरुस्ती व देखभालीचा खर्च तिला परवडणारा नाही. या रस्त्यांवर वसुलीच्या केबिन्स तयार आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने स्थानिक वाहनांव्यतिरिक्त परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर नाममात्र कर लावावा. त्यासाठी शासनही सहकार्य करील असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)