शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

टोलची आज धाड

By admin | Updated: June 12, 2014 01:03 IST

सर्व नाक्यांवर बंदोबस्त तैनात : कंपनीकडून नाके सज्ज

कोल्हापूर : टोलनाक्यांची साफसफाई झाली, वसुलीसाठी कर्मचारी सज्ज आहेत, पोलीस बंदोबस्तही तयार आहे, फक्त वसुली सुरू करा, असा आदेश मिळायचा बाकी आहे. त्यामुळे उद्या, गुरुवारी दुपारी तीनपासून टोलवसुली सुरू होण्याची शक्यता आहे. त्यास पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनीही ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. ‘आयआरबी’ कंपनीने आज, बुधवारी दुपारपासूनच टोलवसुली सुरू करण्याचे नियोजन केले होते, परंतु प्रत्यक्षात टोलवसुलीचे धाडस दाखविले नाही. सर्वोच्च न्यायालयाने ‘आयआरबी’ला टोलवसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज पोलीस प्रशासनाकडून टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. स्थानिक पोलीस, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या प्रत्येक नाक्यावर तैनात करण्यात आल्या आहेत. शिरोली, शिये, शाहू, सरनोबतवाडी, उचगाव, कळंबा, वाशी नाका, फुलेवाडी, आर. के. नगर या नाक्यांवर काल, मंगळवारपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.वीज कनेक्शन, बल्बची सज्जता, जनरेटरची सोय करण्यात आली आहे. ‘आयआरबी’ने काल रात्रीच सर्व कर्मचाऱ्यांना आजपासून टोलनाक्यांवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे नऊ नाक्यांवर कर्मचारी हजर झाले. ते वसुलीच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. पहिली शिफ्ट संपून, दुसरी शिफ्ट सुरू झाली, तरी आदेश मिळाले नाहीत. ‘आयआरबी’चे कर्मचारी पोलिसांच्या संपर्कात होते आणि कर्मचारी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहात होते. मात्र, पोलीस अधीक्षक शर्मा यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर रस्त्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने किमान एक महिना ‘आयआरबी’ने वसुली करू नये, अशी सूचना पुढे आली. तसा निरोप ‘आयआरबी’ला देण्यात आला. ‘आयआरबी’च्या येथील अधिकाऱ्यांनी मुंबईतील त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. शेवटी टोलवसुलीची प्रक्रिया उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता उद्या दुपारपासून टोलवसुलीला सुरुवात होणार असून, पोलीस अधीक्षक शर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टोलवसुली झाली तर कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा महामोर्चाच्यावतीने जिल्हा प्रशासन व पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीसही काहीसे संभ्रमात आहेत. सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने कोल्हापुरात काही घडले तर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटायला नकोत, अशी भूमिका पोलीस प्रशासनाची दिसते. टोल देऊ नकाकोणत्याही वाहनधारकाने टोल देणार नाही, असे सभ्य भाषेत आयआरबीच्या टोलवसुली कर्मचाऱ्यांना सांगावे. टोल देणार नाही असे सांगितल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी न ऐकल्यास त्यांच्याशी हुज्जत घालू नका. कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्यास याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपोआपच होणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची तक्रार नाक्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे करा. टोलवसुली सुरू झाल्यास कोणत्याही परिस्थितीत टोल देऊ नका. - निवास साळोखे (निमंत्रक - टोल विरोधी कृती समिती)आयआरबीने टोलवसुलीची आगळीक करू नयेकोल्हापूरच्या जनभावनेचा आदर करून शासनाने प्रकल्पाचे मुल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त केली आहे. महिन्याभरात तिचा अहवाल येणार आहे. तो आल्यानंतर प्रकल्पाचे पुढे काय करायचे याचा सकारात्मक निर्णय राज्य शासन घेईल. तोपर्यंत कंपनीने कोणत्याही परिस्थितीत टोलवसुली करण्याची आगळीक करू नये - सतेज पाटील, गृहराज्यमंत्रीफुलेवाडीत बसविल्या के बीन टोलविरोधी कृती समितीने जेव्हा टोलनाक्यांवर हल्ला चढविला होता, त्यावेळी नाक्यांवरील अनेक केबीन फोडल्या होत्या, तर फुलेवाडी येथील केबीन उखडून फेकून दिल्या होत्या. त्यामुळे बहुतेक सर्व केबीनची दुरुस्ती करण्यात आली आहे. फु लेवाडी येथे रस्त्यावर आज दुपारी केबीन बसविण्यात आली. सर्वच नाक्यांवर छोट्या चाकांवर सरकणारी लोखंडी बॅरिकेटस् ठेवण्यात आली आहेत. जनरेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. टोलवसुलीचे काम तीन शिफ्टमध्ये सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.