शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

टोल वसुली सोमवारपासून

By admin | Updated: August 6, 2015 00:48 IST

कंपनीचे संकेत : स्थगितीची शासनाची मागणी न्यायालयाने फेटाळली

सांगली : न्यायालयीन निर्णयानुसार पोलीस संरक्षणासह ‘अशोका बिल्डकॉन’मार्फत येत्या सोमवारपासून सांगलीत पुन्हा टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. टोल वसुलीच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शासनाच्यावतीने केलेली मागणी बुधवारी तदर्थ जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी फेटाळली. त्यामुळे कंपनीने टोल वसुलीसाठीची तयारी सुरू केली आहे. येथील आयर्विन पुलाच्या पर्यायी पुलावरील टोलसाठी कंपनीने केलेल्या दरखास्तीसंदर्भात न्यायालयाने सोमवारी निकाल दिला होता. त्यानुसार कंपनीला वाढीव खर्चासाठी १६ वर्षे ९ महिने टोलवसुली करता येणार आहे. न्यायालयाच्या निकालाचे वृत्त समजताच सरकारच्यावतीने बुधवारी येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. वरिष्ठ न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याने, न्यायालयाने या निकालास स्थगिती द्यावी, अशी मागणी सरकारच्यावतीने करण्यात आली. त्याचवेळी कंपनीच्यावतीने अ‍ॅड. एस. एस. शेठ यांनी स्थगिती अर्ज फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने शासनाचा अर्ज फेटाळला. याबाबतची माहिती अ‍ॅड. शेठ यांनी बुधवारी सायंकाळी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोलीस संरक्षणाच्या मागणीसाठी अर्ज केला जाणार आहे. कंपनीला पोलीस संरक्षण देण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यानुसार अर्ज करून कंपनी पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे. पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर लगेचच येत्या सोमवारपासून टोल वसुलीला सुरुवात केली जाणार आहे. कंपनीने टोल वसुलीसंदर्भातील तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून टोलनाके पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी २0१४ मध्ये शासनाच्या तोंडी आदेशानंतर व आंदोलकांच्या रेट्यामुळे येथील दोन्ही टोलनाके बंद करण्यात आले होते. १९ महिन्यांच्या कालावधीनंतर आता पुन्हा हे नाके पूर्ववत सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी) आता व्याजाचाही प्रश्न अशोका बिल्डकॉन कंपनीने १ कोटी २० लाखांच्या वाढीव खर्चाचा व महापुरात झालेल्या नुकसानीचा दावा केला होता. त्या दाव्यानुसार कंपनीने टोलवसुलीस मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर लवादाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. यासंदर्भात आणखी एक लवाद नेमण्यात आला होता. त्या लवादाने शासनाच्या बाजूने निकाल दिला होता. पहिल्या लवादानुसार न्यायालयीन लढाई कंपनीने जिंकली होती. त्यानंतर आता दरखास्तीनुसार न्यायालयाने टोलसंदर्भातील निकाल दिला आहे. आता शासनाकडून नुकसानभरपाई देण्याचा विषय पुढे आला तरी, कंपनीने केलेली वाढीव खर्चाची मागणी जुनी असल्याने त्यावरील व्याजाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. कंपनीनेही व्याजाचा मुद्दा उपस्थित केला आहे.