शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

टोलप्रश्नी शासन हायकोर्टात जाणार

By admin | Updated: August 6, 2015 23:21 IST

कागदपत्रांची तयारी : कंपनीकडून टोलवसुलीसाठी हालचाली सुरू

सांगली : सांगलीतील टोलप्रश्नी राज्य शासनाच्यावतीने सोमवारी (दि. १0) उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. याबाबतची सर्व कागदोपत्री तयारी जवळजवळ पूर्ण झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे कंपनीने टोलवसुलीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस संरक्षणाच्या मागणीचा अर्ज कंपनीचे अधिकारी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देणार आहेत. सांगलीतील बायपास पुलाच्या टोलवसुलीसाठी अशोका बिल्डकॉन कंपनीला पुन्हा मिळालेल्या परवानगीमुळे टोल विरोधात आंदोलन उभारण्यात येत आहे. शासकीय स्तरावरही या निर्णयाविरोधात लढ्याची तयारी सुरू झाली आहे. शासनाने बुधवारी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे त्यांनीच दिलेल्या निर्णयाला स्थगिती मिळावी, असा अर्ज दाखल केला होता. शासनाचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे गुरुवारी दिवसभर या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी प्रयत्नशील होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचिकेसाठीची सर्व कागदोपत्री तयारी पूर्ण झाली असून, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. दुसरीकडे कंपनीने टोलवसुली संदर्भात हालचाली गतिमान केल्या आहेत. पोलीस संरक्षणासाठी शुक्रवारी कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज दाखल केला जाणार आहे. कंपनीने सोमवारपासून टोलवसुलीचे संकेत दिले आहेत.टोलची पार्श्वभूमीसांगलीतील बायपास रस्ता व पुलासाठी अशोका कंपनीला काम देण्यात आले होते. साडेसात कोटी रुपयांचे हे काम होते. त्यासाठी कंपनीला टोल वसुलीसाठी १६ वर्षे तीन महिने मुदत दिली होती.२000 पासून सुरू झालेली टोलवसुली २0१४ पर्यंत सुरू होती. जानेवारी २0१४ मध्ये टोल बंद करण्यात आला. कंपनीने सुरुवातीपासून एक कोटी २0 लाखांच्या वाढीव खर्चासाठी पुन्हा टोलवसुलीसाठी परवानगी मागितली होती. लवादासमोर हा विषय गेल्यानंतर लवादाने वाढीव खर्चाच्या वसुलीसाठी कंपनीला आणखी १६ वर्षे ९ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयानेही लवादाचा निर्णय कायम केला.