शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
4
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
5
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
6
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
7
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
8
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
9
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
10
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
11
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
12
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
13
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
14
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
15
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
16
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
17
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
18
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
19
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
20
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

टोलप्रश्नी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार

By admin | Updated: March 28, 2016 00:53 IST

टोलविरोधी कृती समितीची बैठक : ४ एप्रिलला जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला निवेदन देणार

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील टोलनाक्याला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी येत्या ४ एप्रिलला जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्याबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टोलप्रश्नी साकडे घातले जाणार आहे़ पालकमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आला़ यावेळी टोलला कायम विरोध करीत सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण करावा़ जयसिंगपूर व हातकणंगले येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा, तसेच सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापक कृती समितीची स्थापना करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष युवराज शहा होते़ येथील नगरपालिकेच्या दे़ भ़ रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात रविवारी टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली़ यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शासनाकडून शिरोळ तालुक्यात टोलचा तिसऱ्यांदा प्रयत्न झाला आहे़ येथील जनतेने नेहमीच टोलला विरोध केला आहे़ शिरोली व अंकली येथे होणारे टोलनाके हद्दपार करून टाकण्यासाठी सर्वपक्षीय लढ्याची गरज आहे़ मी सत्तेतील आमदार असलो तरी प्रथम चळवळीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या या लढ्यात अग्रभागी राहणार आहे़ टोल द्यायचा नाही आणि मागेही हटायचे नाही, असा निर्धार करून कोल्हापूरप्रमाणेच हाही टोल हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, टोलविरोधी लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देऊन टोलचे भूत हाणून पाडण्यासाठी शासनाशी भांडू व टोल हद्दपार करू.शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सतीश मलमे म्हणाले, कोल्हापूरप्रमाणेच हाही टोल हाणून पाडण्यासाठी संघटित लढा उभारणे गरजेचे आहे़ रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असताना टोल कशासाठी? टोल बंद करण्यासाठी मंत्र्यांच्या गाड्याही अडवायला शिवसेना मागे-पुढे बघणार नाही़ ‘स्वाभिमानी’चे जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे़ त्यातच टोलची घाई असलेल्या कंपनीनेच रस्त्याचा दर्जा तपासावा. मगच टोल उभारणीला हात घालावा़ टोलला टोला देण्यासाठी शिरोळची जनता सज्ज आहे़ कॉ़ रघुनाथ देशिंगे म्हणाले, टोलमुक्तीचे आश्वासन देऊनच सरकार सत्तेवर आले आहे़ टोल सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसविण्याचे काम शासन करीत आहे़ त्यामुळे या सरकारने टोलमुक्तीची घोषणा लक्षात घेऊन या मार्गावरील टोलनाका रद्द करावा; अन्यथा जनता टोलनाका उधळून लावेल. अ‍ॅड़ संभाजीराजे नाईक, मिलिंद भिडे, राजेंद्र दार्इंगडे, बाळासाहेब कलशेट्टी, रमेश शिंदे, पृथ्वीराज पवार, भगवान जांभळे, दिलीप माणगावे, चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दरगू गावडे, धनाजी चुडमुंगे, प्रकाश झेले, शैलेश आडके, सूरज भोसले, प्रकाश पाटील-टाकवडेकर, साजिदा घोरी, मधुकर पाटील, मिलिंद साखरपे, बजरंग खामकर यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)