शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

मालवाहतूक गाड्यांना प्रति किलोमीटर ६ ते ८ रुपये टोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST

सतीश पाटील शिरोली : कोल्हापूर भारतात दोनशे राष्ट्रीय महामार्गावर दोन कोटींहून अधिक माल वाहतूक गाड्या धावत असून प्रत्येभक एक ...

सतीश पाटील

शिरोली : कोल्हापूर

भारतात दोनशे राष्ट्रीय महामार्गावर दोन कोटींहून अधिक माल वाहतूक गाड्या धावत असून प्रत्येभक एक किलोमीटरला सरासरी आठ रुपये इतकी टोल आकारणी ४०० हून अधिक टोल नाक्यावर होत आहे.

देशाचे दळणवळण व्यवस्था सुरळीत चालू राहण्यासाठी

भारतातील ३२ राज्यांत एकूण २०० हून अधिक राष्ट्रीय महामार्ग आहेत. या महामार्गावरून दररोज २ कोटींपेक्षा जास्त वाहने धावतात. ही वाहने मालवाहतूक करताना त्यांना पेट्रोल -डिझेल इंधनाबरोबर टोलचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक किलोमीटरला सरासरी सहा ते आठ रलपये टोल आकारणी होते, असे जाणकार व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन महिन्यांत डिझेलमध्ये सतत होत असलेल्या दरवाढीमुळे प्रति किलोमीटर अंतराला२८ रुपये इतका खर्च येत होता, तो आता ३२ रूपयांवर पोहोचला आहे. भाडेवाढ किलोमीटरला चार रुपये होणे अपेक्षित आहे.

सध्या देशात फास्टॅग सुरू झाले आहे, पण या फास्टॅगचा बोजवारा उडालेला दिसत आहे.

वाहनधारकांना सध्या फास्टॅगबरोबरच पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीचा सर्वांत जास्त फटका बसत आहे. मोठ्या मालवाहतूक गाड्यांना एकाच वेळी टोल आकारणी करावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून वारंवार केली आहे, पण ती अद्याप अमलात आणलेली नाही. एकाच वेळी टोलचे पैसे आकारले तर वेळ वाचेल. टोल आकारणीसाठी लागणारी महागडी यंत्रणी कमी होईल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाला काही मागण्यांचे निवेदन दिले आहे. यात डिझेलवर जीएसटी आकारणी करावी. त्यामुळे संपूर्ण देशात डिझेल दर एकसारखा राहील आणि दरही कमी होतील.

चौकट

एकाच वेळी टोलची रक्कम घ्या

देशातील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगामुळे होणारा इंधनाचा खर्च याचा अभ्यास करून टोल फ्री इंडियाबाबत देशातील नॅशनल परमिट वाहनांवर वर्षाला एकाच वेळी टोलची रक्कम घ्यावी, अशी मागणी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशनची आहे.

प्रतिक्रिया

मालवाहतूक गाड्यांना प्रति किलोमीटर अंतराला ६ ते ८ रुपये टोल आकारणी होते. वर्षातून एकदाच टोल आकारणी करावी, अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून वारंवार करत आहे, पण शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

बाबा शिंदे -ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस‌ कमिटी मेंबर पुणे

.........

गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. प्रति किलोमीटर अंतराला चार रुपये इतका खर्च वाढला आहे आणि भाडेवाढ मात्र मिळत नाही. त्यामुळे वाहनधारक अडचणीत आहेत.

प्रकाश गवळी -अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट असोसिएशन सातारा