शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
3
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
4
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
5
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
6
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
7
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
8
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
9
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
10
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
11
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
12
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
13
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
14
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
15
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
16
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
17
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
18
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
19
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
20
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय

टोल रद्दच, अधिसूचनेची गरज नाही : पालकमंत्री

By admin | Updated: January 31, 2016 01:41 IST

‘आयआरबी’ला पैसे भागविण्याबाबतचे पत्रही दिले

कोल्हापूर : शहरवासीयांना टोल रद्द करण्याचे भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, आता टोल रद्द झाला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘आयआरबी’ला पैसे भागविण्याबाबतचे पत्रही दिले आहे. त्यामुळे आता वेगळी अधिसूचना काढण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. पालकमंत्री विविध बैठकांच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. टोल रद्दचा निर्णय झाला; परंतु अद्याप राज्य सरकारने अधिसूचना काढलेली नाही, याकडे पालकमंत्री पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शहरवासीयांना आम्ही निवडणूक काळात दिलेले एक आश्वासन पूर्ण केले. राज्य सरकार हा प्रकल्प ‘आयआरबी’चे सर्वच्या सर्व म्हणजे ४२८ कोटी रुपये देऊन विकत घेणार आहे. त्या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाने तसे पत्र ‘आयआरबी’ला दिले आहे. आता महामंडळ व आयआरबी यांची एक बैठक होणे बाकी आहे. ‘आयआरबी’ला पत्र दिले असल्याने आता वेगळी अधिसूचना काढण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अधिसूचना निघाली नाही म्हणून कोणी मनात शंका ठेवू नयेत. टोल रद्द झाला आहे. तो पुन्हा सुरू होणार नाही. हा विषय आता पूर्णपणे निकाली निघाला आहे. (प्रतिनिधी)