शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

टोल तोडग्यास 'आयआरबी'ही उत्सुक

By admin | Updated: January 26, 2015 00:22 IST

चंद्रकांत पाटील : मूल्यांकन समितीची बुधवारी मुंबईत बैठक

कोल्हापूर : टोल रद्द करण्यासाठी कोल्हापूरकरांप्रमाणेच ‘आयआरबी’ही उत्सुक आहे. मात्र, ते मागेल तितकी किंमत देणे योग्य नाही. प्रकल्पाचे योग्य मूल्यांकन करणे व त्यासाठी शासकीय समिती नेमणे गरजेचे आहे. समिती स्थापनेचा अध्यादेश मंगळवार (दि. २७) पर्यंत निघणार आहे. या समितीची बैठक बुधवारी (दि. २८) मुंबईत समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, रविवारी शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत दिली. मंत्री पाटील यांच्या विनंतीवरून कृती समितीने शुक्रवारचे ‘भीक मांगो’ आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.मंत्री पाटील म्हणाले, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फेरमूल्यांकन समितीच्या बैठकीबाबत आताच चर्चा केली. मंगळवारी मंत्री शिंदे यांच्याशी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटणार आहे. पर्याय म्हणून वेळेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास हरकत नाही. शासन निर्णय अंतिम टप्प्यात आल्यानंतर यचिका मागे घेता येईल. या खर्चासाठी भीक मागू नका, वर्गणी जमा करूया. कोल्हापूरचा नागरिक म्हणून मीही वर्गणी देतो. चांगला वकील मिळवून देवू. कायदेशीरदृष्ट्या टोलला स्थगीती देणे राज्य शासनाला अशक्य आहे. मात्र, टोल प्रश्न निकाली लागेपर्यंत वसुली थांबविण्याची आयआरबीला विनंती करु.त्रयस्थ संस्थेमार्फत प्रकल्पाचे मूल्यांकन करून त्याची योग्य किंमत ठरविली जाईल. टोलचे पैसे भागविण्याचे शंभर पर्याय आहेत. मात्र, त्यासाठी योग्य किंमत ठरणे गरजेचे आहे. घाई करून चालणार नाही. समितीच्या अनेक वेळा बैठक घ्याव्या लागल्या तरी चालतील; मात्र, ही सर्व प्रक्रिया अत्यंत जलद होईल. एकदा ठरलेल्या प्रकल्पाच्या किमतीबाबत ‘आयआरबी’ला शंका असल्यास हे प्रकरण शासनस्थापित लवादाकडे नेऊ. लवादापुढे युक्तिवाद झाल्यानंतर प्रकल्पाची ठरणारी किंमत अंतिम राहील. याबाबत न्यायालयात दाद मागता येणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.निवास साळोखे म्हणाले, तूर्तास फक्त 'भीक मांगो' आंदोलन मागे घेत आहे. टोलनाक्यांवर कर्मचाऱ्यांकडून अरेरावीचे प्रकार वारंवार घडत आहेत. बळाचा वापर करीत टोलवसुलीची सक्ती झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, बाबा पार्टे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, भगवान काटे, रामभाऊ चव्हाण, अशोक पोवार, लाला गायकवाड, दीपाताई पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी बाजू मांडली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारचे भीक मांगो आंदोलन स्थगीतबैठकीतील निर्णयशुक्रवारचे ‘भीक मांगो’ आंदोलन स्थगीतनाक्यावर अरेरावी झाल्यास पुन्हा आंदोलनदोन दिवसांत पोलीस अधीक्षकांसोबत बैठकपालकमंत्री पोलिसांना सूचना देणारनाक्यांवरील कर्मचाऱ्यांची पुन्हा पडताळणी मागील राज्यकर्त्यांनी टोलसाठी पाच वर्षे वेळकाढूपणा केला. पहिल्या २० दिवसांत आम्ही समिती स्थापन केली. फक्त ७० दिवसांत आमच्या सरकारने टोल रद्दचा मुद्दा अंतिम टप्प्यात आणला आहे. ‘आयआरबी’चे राज्यात इतरत्र प्रकल्प आहेत. त्यांना योग्य किमतीवरच समझोता करावा लागेल. कोल्हापूरकर किंवा आयआरबी दोन्हींपैकी कोणावरही अन्याय होणार नाही. कोल्हापूर टोलमुक्त होणारच. काळजी करू नका. आम्ही टोलबाबत आश्वासन दिल्याप्रमाणे बांधील आहोत. - चंद्रकांत पाटील, पालकमंत्री