शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक

By admin | Updated: May 22, 2015 00:48 IST

सरकारचे चर्चेचे निमंत्रण : टोलविरोधी कृती समितीने स्वीकारले

कोल्हापूर : शहरांतर्गत आकारल्या जाणाऱ्या टोलला राज्य सरकारने सुचविलेला पर्याय स्पष्टपणे फेटाळून लावल्यानंतरही सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीसोबत चर्चा करण्यास राज्य सरकारची तयारी आहे. यासंदर्भात चर्चेतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कोल्हापुरात बैठक बोलावली असून चर्चेचे निमंत्रण कृती समितीनेही स्वीकारले आहे. शनिवारी दुपारी चार वाजता राम गणेश गडकरी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सर्वपक्षीय कृती समितीचे २० निवडक सदस्य यांच्यात बैठक होणार आहे. चर्चेतून काय मार्ग निघणार आहे यावर पुढील दिशा ठरविली जाईल. जर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला नाही तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.कृती समितीचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा बुधवारी सायंकाळी मला फोन आला. त्यावेळी त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची कृती समितीसोबत चर्चा करण्याची तयारी आहे, असा निरोप सांगितला; परंतु चर्चेला जायचे की नाही, यावर कृती समितीतील सर्व सदस्यांशी सल्लामसलत करूनच काय ते सांगतो, असे त्यांना उलट निरोप दिला. बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी कृती समितीच्या सर्वच घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन चर्चेला जाण्याचा निर्णय घेतला. ‘चर्चेतून मार्ग निघतो,’ ही आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही शनिवारी चर्चेला जाणार आहोत शिवाय आम्हाला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. प्रा. पाटील यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी सरकारच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘एम एच ०९’ वाहने वगळण्याचा पर्याय आम्हाला सांगितला होता परंतु आम्ही तो नाकारला आहे. आता सरकार आणखी पुढे जाऊन मोठी वाहने तसेच मालक कोल्हापूरचा आणि वाहन बाहेर जिल्ह्यातील आहेत अशांनाही वगळण्याचा पर्याय सांगितला आहे परंतु आमचं तर म्हणणे असं आहे की, कोल्हापूरमध्ये आयआरबीचा एकही टोलनाका राहता कामा नये. चर्चेला आम्ही जाऊ पण विनापर्याय टोल रद्द, ही आमची मागणी कायम राहील. टोल कायमचा घालविणे हीच सरकारची भूमिका आहे. सर्वाेच्च न्यायालयाने टोलवसुलीस दिलेली स्थगिती उठविल्याने टोलविरोधी कृती समितीच्या मागणीनुसार टोलवसुलीस सरकारने स्थगिती दिल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल.- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीसरकारसोबत चर्चेला जातोय याचा अर्थ आम्ही टोलचा कोणताही पर्याय स्वीकारलेला नाही अथवा स्वीकारणारही नाही. कोल्हापुरातून सर्व टोलनाके उचलून नेले पाहिजेत यावर आम्ही अद्यापही ठाम आहोत.- प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते