शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेत दोन्ही कॉँग्रेस एकत्र

By admin | Updated: April 30, 2015 00:42 IST

जिल्हा बँक : जनसुराज्य पक्षाची गोची

आयुब मुल्ला -खोची -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निमित्ताने कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तालुक्यात एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. शाहू विकास आघाडीकडून एक जागा बिनविरोध व दोन ठिकाणी उमेदवारी अशी कॉँग्रेसची, तर फक्त एकच जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे; परंतु या आघाडीबरोबर असणाऱ्या जनसुराज्यपक्षाची मात्र गोची झाली आहे. त्यामुळे आवळे यांना मिळून ते आघाडीधर्म पाळतील का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शाहू विकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या कोट्यातून महिला गटांतून माजी खासदार निवेदिता माने, अनुसूचित जाती-जमाती गटांतून माजी खासदार जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे, तर इतर मागास गटांतून आवाडे गटाचे विलासराव गाताडे यांना उमेदवारी मिळाली आहे. संस्था गटातून आमदार महाडिक बिनविरोध झाले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीला एक, तर कॉँग्रेसला तीन जागा असे चित्र निर्माण झाले आहे. विलास गाताडे वगळता वरील तिन्ही नेते बॅँकेचे गेल्यावेळी संचालक होते. विशेष म्हणजे निवेदिता माने अध्यक्ष, तर राजू आवळे उपाध्यक्ष म्हणून पहिल्यादांच त्यांना संधी मिळाली. गेल्यावेळी निवडणूक चुरशीने झाली होती. ती परिस्थिती सध्या दिसत नाही. कारण माघारीच्या अंतिम दिवशीच चार जागा बिनविरोध झाल्या. महिला गटातील दोन जागाही बिनविरोध होत होत्या. परंतु, माघारीसाठी पंधरा मिनिटे उशीर झाला. त्यामुळे जयश्री रेडेकर (गडहिंग्लज), सुजाता सातवणेकर (चंदगड) यांचे अर्ज राहिले. अन्यथा, निवेदिता माने व उदयानी साळोखे या शाहू विकास आघाडीच्या महिला उमेदवार बिनविरोध झाल्या असत्या.विशेष म्हणजे विरोधी गटानेच भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये स्वत: मिणचेकर हे अनुसूचित जाती-जमाती गटातून उभे आहेत. तर सुधीर मुंज हे इतर मागास गटांतून उभे आहेत. मिणचेकर यांचे विरोधक राजू आवळे आहेत. तसेच ‘जनसुराज्य’चे विरोधक मिणचेकर व राजू आवळे हे दोघे अहेत. त्यामुळे जनसुराज्य कोणाचे समर्थन करणार? हा प्रश्न आहे. विनय कोरे मात्र शाहू विकास आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे त्यांना आघाडी म्हणून राजू जयवंतराव आवळे यांचे समर्थन करावे लागेल. अन्यथा, या जागेबाबत काहीही न बोलता ते कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यही देऊ शकतील अशी स्थिती आहे.या निवडणुकीने जास्त ताणाताण होईल, असे चित्र नाही. दोन्ही कॉँग्रेस एकत्रित काम करीत आहेत. परंतु, तालुक्यात मात्र ‘जनसुराज्य’ची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.