शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’चे आज पोस्टमार्टम

By admin | Updated: April 14, 2017 00:09 IST

पालकमंत्री सांगलीत : कृषी राज्यमंत्र्यांचीही उपस्थिती, शेती कनेक्शन्स, बोगस बियाणांचा प्रश्न

सांगली : रखडलेली २२ हजार शेतीपंपांची व घरगुती वीज कनेक्शन, बोगस बियाणे आणि जलयुक्त शिवार योजनेतील निकृष्ट कामे हे मुद्दे शुक्रवारी, १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत गाजण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.खरीप पेरणी हंगामापूर्वी दरवर्षी एप्रिल महिन्यात तयारीची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते. मागील आढावा बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी, १३ हजार शेतीपंपांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे पिके वाळत असल्याचे सांगून, पैसे भरूनही त्यांना कनेक्शन मिळत नसल्याबद्दल नाराजीह व्यक्त केली होती. त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, महिन्यात शेतीपंपांच्या वीज कनेक्शनसाठी पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. अनिल बाबर त्यावेळी उपस्थित होते. त्यामध्येही पैसे उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली. पण गेल्या वर्षभरात काहीच निधी मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मागील सभेत असणारे प्रश्न जैसे थेच आहेत. सध्या शेतकरी आक्रमक झाले असून, जिल्ह्यातील खासदार, आमदारांकडे कैफियत मांडत आहेत. शिवाय घरगुती ९ हजार कनेक्शन रखडली आहेत.शुक्रवारी पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक होत आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री खोत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कृषीपंपांच्या वीज कनेक्शनचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. बोगस बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या माथी मारणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले नाही. यामुळे वर्षाला एखादी तरी बोगस कंपनी शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा गंडा घालून पसार होत आहे. यावरही ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.जलयुक्त शिवार योजनेतून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याचा आरोप आहे. अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीचा गंडाशेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करूनही त्यांना पैसे न देताच व्यापारी गायब झाले आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस परिसरातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची बाजार समित्यांनी कोणतीही नोंदणी केली नसल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. गुन्हे दाखल झाले आहेत. पण, अनेक व्यापाऱ्यांचा शोधच लागला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.