शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

‘जलयुक्त शिवार’चे आज पोस्टमार्टम

By admin | Updated: April 14, 2017 00:09 IST

पालकमंत्री सांगलीत : कृषी राज्यमंत्र्यांचीही उपस्थिती, शेती कनेक्शन्स, बोगस बियाणांचा प्रश्न

सांगली : रखडलेली २२ हजार शेतीपंपांची व घरगुती वीज कनेक्शन, बोगस बियाणे आणि जलयुक्त शिवार योजनेतील निकृष्ट कामे हे मुद्दे शुक्रवारी, १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत गाजण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.खरीप पेरणी हंगामापूर्वी दरवर्षी एप्रिल महिन्यात तयारीची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते. मागील आढावा बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी, १३ हजार शेतीपंपांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे पिके वाळत असल्याचे सांगून, पैसे भरूनही त्यांना कनेक्शन मिळत नसल्याबद्दल नाराजीह व्यक्त केली होती. त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, महिन्यात शेतीपंपांच्या वीज कनेक्शनसाठी पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. अनिल बाबर त्यावेळी उपस्थित होते. त्यामध्येही पैसे उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली. पण गेल्या वर्षभरात काहीच निधी मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मागील सभेत असणारे प्रश्न जैसे थेच आहेत. सध्या शेतकरी आक्रमक झाले असून, जिल्ह्यातील खासदार, आमदारांकडे कैफियत मांडत आहेत. शिवाय घरगुती ९ हजार कनेक्शन रखडली आहेत.शुक्रवारी पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक होत आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री खोत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कृषीपंपांच्या वीज कनेक्शनचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. बोगस बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या माथी मारणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले नाही. यामुळे वर्षाला एखादी तरी बोगस कंपनी शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा गंडा घालून पसार होत आहे. यावरही ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.जलयुक्त शिवार योजनेतून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याचा आरोप आहे. अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीचा गंडाशेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करूनही त्यांना पैसे न देताच व्यापारी गायब झाले आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस परिसरातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची बाजार समित्यांनी कोणतीही नोंदणी केली नसल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. गुन्हे दाखल झाले आहेत. पण, अनेक व्यापाऱ्यांचा शोधच लागला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.