शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

लोकप्रतिनिधींसमवेत कॉरिडॉरसंबंधी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 00:36 IST

‘स्मॅक’चा पुढाकार : आंदोलनाची दिशा ठरणार

कोल्हापूर : मुंबई-बंगलोर कॉरिडॉर आणि कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्ग हे प्रकल्प कोल्हापूरच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत. यातून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा फटका जिल्ह्याच्या विकासाला बसणार आहे. त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, रविवारी दुपारी तीन वाजता बैठक होत आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅकच्या सभागृहात ही बैठक होत असून, त्यास जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी केले आहे. संबंधित दोन्ही प्रकल्पांमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील उद्योजकांनी संघटितपणे शुक्रवारी केली होती. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही बैठक होत आहे.कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेल्या कोल्हापूरऐवजी अविकसित असणाऱ्या आणि उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नसलेल्या भागातून हा कॉरिडॉर नेणे अयोग्य आहे. यातून या प्रकल्पांच्या अडचणी वाढणार आहेत. कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्गातून कोल्हापूरला बगल दिली आहे. या महत्त्वपूर्ण दोन्ही प्रकल्पांतून कोल्हापूरला वगळल्यास येथील औद्योगिक विकास ठप्प होणार आहे. कोल्हापूरवर एक प्रकारे संकट आले असून, ते परतावून लावण्यासह या प्रकल्पांमध्ये कोल्हापूरच्या समावेशासाठी हा लढा सुरू होत आहे. (प्रतिनिधी)