शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

टोलवसुली आजपासून ! पोलिसांनी पुरविला बंदोबस्त

By admin | Updated: May 29, 2014 01:26 IST

‘आयआरबी’कडून टोलनाक्यांची डागडुजी

कोल्हापूर : येत्या ४८ तासांत टोलवसुली सुरू करणार असल्याचे पत्र आयआरबीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना २६ मे रोजी दिले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या विनाअट व तत्काळ संरक्षण पुरविण्याच्या आदेशानुसार पोलिसांंनी आज, बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बंदोबस्तही तैनात केला आहे. यामुळे दिवसभरात आयआरबीने टोलनाक्यांची डागडुजी करून टोलवसुलीची तयारी पूर्ण केल्याने मध्यरात्री किंवा उद्या, गुरुवारपासून टोलवसुली सुरू होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे रोजी शहरातील टोलवसुलीस उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविली. न्यायालय आदेशाच्या दुसर्‍या दिवसापासून आयआरबीने टोलवसुली सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या. पोलीस संरक्षणासाठी बंदोबस्त देण्याची मागणी पत्राद्वारे पोलीस प्रशासनास केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आयआरबीने पाठविलेल्या पत्रास उत्तर देताना, प्रथम पोलिसांसाठी शेड, शौचालय व विश्रांतीसाठी खुर्च्या, तसेच नाक्यावरील प्रत्येक कर्मचार्‍यांची माहिती देण्याबाबत सूचना केल्या. प्राथमिक मागण्या पूर्ण करण्याचे आयआरबीने मान्य करताच पोलीस अधीक्षकांनी २३ मे रोजी पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण असून, वसुलीची तारीख कळविण्याबाबत आयआरबीला पत्र लिहिले. यानंतर २६ मे रोजी दुपारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची आयआरबीचे जयंत धनागरे व नीलेश म्हेत्रे यांनी भेट घेऊन पोलीस मुख्यालयात बंदोबस्ताबाबत चर्चा केली. सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील सर्व नऊ टोलनाक्यांवर विनाअट पोलीस बंदोबस्त पुरविण्याबाबत आदेश दिला आहे. तरीही आयआरबी पोलिसांसाठी शेड, शौचालय व खुर्च्या पुरवीत असल्याचे सांगितले. कर्मचार्‍यांची माहिती देणे अशक्य असल्याने ही माहिती देण्याबाबत आयआरबीने या बैठकीत असमर्थता दर्शविली. शहरातील सर्व नऊ टोलनाक्यांवर २८ मेपासून केव्हाही टोलवसुली सुरू करणार असून, विनाअट पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी आयआरबीने केली. यानुसार आज सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, पोलिसांसाठी शेड व शौचालय उभारणी तसेच नाक्यांची डागडुजी आयआरबीने सुरू केली असून, कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)