शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आजºयाला मोठ्या निधीची संधी--नगरपंचायतीमुळे विकासाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:54 IST

कोल्हापूर : नगरपंचायतीच्या स्थापनेमुळे आजºयाला मोठ्या निधीची संधी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे उद्यानांबरोबरच अग्निशमन दलाचीही स्थापनापार्किंगपासून ते वाहतुकीच्या कोंडीपर्यंत अनेक प्रश्नांना नगरपंचायत उत्तर ठरू शकेल का हे आगामी काळ ठरवणार आहे.

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नगरपंचायतीच्या स्थापनेमुळे आजºयाला मोठ्या निधीची संधी निर्माण झाली आहे. आजºयाच्या विकासासाठी नवीन दालन निर्माण झाले असताना लोकप्रतिनिधींनीही दरवेळी सोयीची भूमिका न घेता गावच्या चौफेर विकासाची भूमिका घेतल्यास आजºयाचे एक नवे रूप येत्या दहा वर्षांत दिसू शकेल.

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे नगरपंचायतीची स्थापना झाली. याकामी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्या टीमचे मोठे सहकार्य लाभले. आता नगरपंचायतीच्या धोरणांनुसार शहराची प्रभाग रचना होणार आहे. त्यानंतर मतदार यादी तयार होईल आणि त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करेल. यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत. आजºयाच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार दिला असल्याने तेथील ग्रामविकास अधिकाºयाचे पद संपुष्टात आले आहे. नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि मुख्याधिकारी या दोन्ही भूमिकांतून निवडणुकीपर्यंत प्रशासकांना काम करावे लागणार आहे.

आता अग्निशमन दल कार्यरत होणार असल्याने आजºयातील अनेक अरूंद रस्ते अतिक्रमणामुळे अडचणीत आलेली वळणे याबाबतही विचार करावा लागणार आहे. यापुढच्या काळामध्ये आता ग्रामविकास विभागाचे नियम लागू होणार नसून नगरविकास विभागाच्या नियमानुसार कामे होणार आहेत. त्यामुळे पदाधिकाºयांबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी वाढणार आहे. पार्किंगपासून ते वाहतुकीच्या कोंडीपर्यंत अनेक प्रश्नांना नगरपंचायत उत्तर ठरू शकेल का हे आगामी काळ ठरवणार आहे.नगराध्यक्ष निवडणूक थेट नाहीनगरपालिकांसारखी नगरपंचायतीला थेट नगराध्यक्ष निवडणूक नाही. येथे नगरसेवकांतूनच बहुमताने नगराध्यक्ष निवडला जातो. आजरा नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवक राहण्याची शक्यता आहे तर दोन नगरसेवकांना स्वीकृत म्हणून घेता येणार आहेत. नगराध्यक्ष निवड थेट होणार नसल्याने नगरसेवकांमध्येच रस्सीखेच होणार आहे.हे असतील अधिकारी१) मुख्याधिकारी, २) शहर अभियंता, ३) पाणीपुरवठा अभियंता. ४) विद्युत अभियंता,५) आरोग्याधिकारी, ६) सहा. लेखाधिकारी.हे सहा अधिकारी दर तीन वर्षांनी बदलतील. याबरोबरच मोठ्या संख्येने सफाई कामगार, शिपाई, मुख्याधिकाºयांच्या गाडीवर, अग्निशमन बंबावर आणि पाणी टँकर असल्यावर त्यावर असे तीन वाहनचालक असतील.येथून निधी मिळेल१) १४ वा वित्त आयोग,२) विविध करांची आकारणी, ३) सहाय्यक अनुदान (वेतनासाठी) ४) खासदार/ आमदार निधी, ५ ) रस्ता अनुदान,६) अल्पसंख्याकअनुदान, ७) अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती अभियान, ८) दलितेत्तर अनुदान ९) जिल्हा नियोजन समितीहे असतील सभापती१) पाणीपुरवठा आणि आरोग्य समिती सभापती२) सार्वजनिक बांधकाम समिती सभापती३) शिक्षण समिती सभापती, ४) नियोजन समिती सभापती. या चार समित्यांमध्ये प्रत्येकी ५ सदस्य असतील. या चार सभापतींची मिळून स्थायी समिती तयार होते. त्याचे अध्यक्ष नगराध्यक्ष असतात.हे असतील विभाग१) बांधकाम २) पाणीपुरवठा, ३) कर,) आस्थापना, ५) आरोग्य, उद्यान ६) पुरवठा,७) अभिलेख, ८) अग्निशमन, ९) जन्म-मृत्यू दाखल विभाग