शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आजºयाला मोठ्या निधीची संधी--नगरपंचायतीमुळे विकासाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:54 IST

कोल्हापूर : नगरपंचायतीच्या स्थापनेमुळे आजºयाला मोठ्या निधीची संधी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे उद्यानांबरोबरच अग्निशमन दलाचीही स्थापनापार्किंगपासून ते वाहतुकीच्या कोंडीपर्यंत अनेक प्रश्नांना नगरपंचायत उत्तर ठरू शकेल का हे आगामी काळ ठरवणार आहे.

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नगरपंचायतीच्या स्थापनेमुळे आजºयाला मोठ्या निधीची संधी निर्माण झाली आहे. आजºयाच्या विकासासाठी नवीन दालन निर्माण झाले असताना लोकप्रतिनिधींनीही दरवेळी सोयीची भूमिका न घेता गावच्या चौफेर विकासाची भूमिका घेतल्यास आजºयाचे एक नवे रूप येत्या दहा वर्षांत दिसू शकेल.

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे नगरपंचायतीची स्थापना झाली. याकामी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्या टीमचे मोठे सहकार्य लाभले. आता नगरपंचायतीच्या धोरणांनुसार शहराची प्रभाग रचना होणार आहे. त्यानंतर मतदार यादी तयार होईल आणि त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करेल. यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत. आजºयाच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार दिला असल्याने तेथील ग्रामविकास अधिकाºयाचे पद संपुष्टात आले आहे. नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि मुख्याधिकारी या दोन्ही भूमिकांतून निवडणुकीपर्यंत प्रशासकांना काम करावे लागणार आहे.

आता अग्निशमन दल कार्यरत होणार असल्याने आजºयातील अनेक अरूंद रस्ते अतिक्रमणामुळे अडचणीत आलेली वळणे याबाबतही विचार करावा लागणार आहे. यापुढच्या काळामध्ये आता ग्रामविकास विभागाचे नियम लागू होणार नसून नगरविकास विभागाच्या नियमानुसार कामे होणार आहेत. त्यामुळे पदाधिकाºयांबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी वाढणार आहे. पार्किंगपासून ते वाहतुकीच्या कोंडीपर्यंत अनेक प्रश्नांना नगरपंचायत उत्तर ठरू शकेल का हे आगामी काळ ठरवणार आहे.नगराध्यक्ष निवडणूक थेट नाहीनगरपालिकांसारखी नगरपंचायतीला थेट नगराध्यक्ष निवडणूक नाही. येथे नगरसेवकांतूनच बहुमताने नगराध्यक्ष निवडला जातो. आजरा नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवक राहण्याची शक्यता आहे तर दोन नगरसेवकांना स्वीकृत म्हणून घेता येणार आहेत. नगराध्यक्ष निवड थेट होणार नसल्याने नगरसेवकांमध्येच रस्सीखेच होणार आहे.हे असतील अधिकारी१) मुख्याधिकारी, २) शहर अभियंता, ३) पाणीपुरवठा अभियंता. ४) विद्युत अभियंता,५) आरोग्याधिकारी, ६) सहा. लेखाधिकारी.हे सहा अधिकारी दर तीन वर्षांनी बदलतील. याबरोबरच मोठ्या संख्येने सफाई कामगार, शिपाई, मुख्याधिकाºयांच्या गाडीवर, अग्निशमन बंबावर आणि पाणी टँकर असल्यावर त्यावर असे तीन वाहनचालक असतील.येथून निधी मिळेल१) १४ वा वित्त आयोग,२) विविध करांची आकारणी, ३) सहाय्यक अनुदान (वेतनासाठी) ४) खासदार/ आमदार निधी, ५ ) रस्ता अनुदान,६) अल्पसंख्याकअनुदान, ७) अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती अभियान, ८) दलितेत्तर अनुदान ९) जिल्हा नियोजन समितीहे असतील सभापती१) पाणीपुरवठा आणि आरोग्य समिती सभापती२) सार्वजनिक बांधकाम समिती सभापती३) शिक्षण समिती सभापती, ४) नियोजन समिती सभापती. या चार समित्यांमध्ये प्रत्येकी ५ सदस्य असतील. या चार सभापतींची मिळून स्थायी समिती तयार होते. त्याचे अध्यक्ष नगराध्यक्ष असतात.हे असतील विभाग१) बांधकाम २) पाणीपुरवठा, ३) कर,) आस्थापना, ५) आरोग्य, उद्यान ६) पुरवठा,७) अभिलेख, ८) अग्निशमन, ९) जन्म-मृत्यू दाखल विभाग