शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
3
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
4
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकूण काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
5
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
6
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
7
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
8
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
9
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
10
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
11
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
12
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
13
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
14
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
15
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
17
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
18
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
19
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
20
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

तंबाखू करप्रश्नी व्यापाऱ्यांच्या नजरा मुंबईकडे

By admin | Updated: January 10, 2015 00:25 IST

साडेबारा टक्क्यांचा प्रश्न प्रलंबितच : अर्थ व नियोजन मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

संदीप बावचे - जयसिंगपूर -अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्केकराचा प्रश्न सोडविण्याबाबत नुकतेच अर्थ व नियोजनमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे तंबाखू व्यापाऱ्यांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत. व्हॅटप्रश्नी शासन कशाप्रकारे हा प्रश्न सोडवून व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार, की तो पुन्हा लांबणीवर पडणार, याचीच उत्सुकता आहे. तत्कालीन आघाडी शासनाने अर्थसंकल्पात सर्व प्रकारच्या अनुत्पादित तंबाखूवर साडेबारा टक्के मूल्यवर्धित कर प्रस्तावित केला होता. हा कर जयसिंगपूर शहरातील तंबाखू पेठेचे अस्तित्व पुसून टाकणारा ठरला. गेल्या दोन वर्षांपासून अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के कराचा प्रश्न भिजत पडला आहे. अद्याप शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने शहरातील व्यापारी हा व्यवसाय नजीकच्या कर्नाटक राज्यात स्थलांतरित करण्याच्या पवित्र्यात आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तंबाखू व्यापाऱ्यांच्या शिष्यमंडळाने अनेकवेळा निवेदने देऊन अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के व्हॅट कमी करावा. व्हॅटमुळे तंबाखू उद्योगावर विपरित परिणाम झाल्याचेही स्पष्ट केले होते.व्हॅटमुळे तंबाखू उद्योगातील महिला, हमाल, गाडीवान यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही लक्षात आणून दिले होते. मात्र, हा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला. दरम्यान, २ जानेवारी रोजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यापारी शिष्टमंडळाला करप्रश्नी सकारात्मक निर्णय घेऊन दहा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अर्थ व नियोजन मंत्र्यांच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.आश्वासनांचाच पूरअनुउत्पादित तंबाखू कराचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’च आहे. यामुळे प्रक्रिया तंबाखू पुरवठा करणाऱ्या जयसिंगपूर पेठेचे अस्तित्व मूल्यवर्धित करामुळे धोक्यात आले आहे. येथील तंबाखू पेठेवर घाला घालणारा हा कर रद्द करून या व्यवसायाला चालना देण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाच्या प्रतिनिधींना अनेकवेळा साकडे घातले. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलेले नाही.व्यवसायावर अनेक हात अवलंबून१९७१ पासून तंबाखू व इतर शेतीमालाच्या व्यवसायासाठी शहरातील व्यापारी पुढे आला. यामुळे तंबाखू पेठेला चांगला राजाश्रय मिळाला. गेल्या नऊ दशकांपासून देशभरातील विक्रेत्यांकडे येथील तंबाखू पाठविला जात आहे. एक हजार माथाडी कामगार, पाच हजार महिला कामगार, शंभर बैलगाडी वाहतूकदार या व्यवसायावर अवलंबून आहेत.