शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

कामात सुस्ताई, पण टोलची घाई

By admin | Updated: March 30, 2016 00:39 IST

शिरोलीत टोलनाक्यांची उभारणी : रस्त्याची ३० टक्के कामे अपूर्ण असल्याचा आंदोलकांचा दावा

सतीश पाटील -- शिरोली -कोल्हापूर-सांगली रस्त्यावर टोल बसवायला सुप्रीम कंपनीने घाई केली आहे; एवढ्या घाईने काम केले असते, तर एक वर्षापूर्वीच रस्ता पूर्ण झाला असता, अशी परिस्थिती आहे. चार वर्षांत रस्त्याचे जे काम झाले आहे, त्याबद्दलसुद्धा साशंकता आहे.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच कंपनीने टोल वसुलीची १ मे ही तारीखसुद्धा जाहीर केली आहे. अंकली आणि शिरोली येथे टोलनाके उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अजूनही रस्त्याचे ३0 टक्क्यांपेक्षा जास्त काम बाकी आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. कंपनीने दोन वर्षांत काम पूर्ण करायचे होते; पण तब्बल साडेतीन वर्षे झाली तरी अजून रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अतिग्रे येथील एक किलोमीटरमधील घरे निघालेली नाहीत. हातकणंगले येथील ८00 मीटरच्या उड्डाणपुलाला अजून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरीच दिलेली नाही. सुप्रीम कंपनीने कोणतीही मंजुरी घेण्यापूर्वीच उड्डाणपूल बांधायला सुरुवात केली होती. या पुलासाठी ३२ कोटी रुपये जादा खर्च अपेक्षित असल्याने ते काम अपूर्ण आहे. तमदलगे येथील भूसंपादन झालेले नाही. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये लोकांची घरे येतात. त्यांना योग्य मोबदला मिळाल्यानंतरच तेथील लोकांचे स्थलांतर होणार, पण अद्याप पैसेच मिळालेले नाहीत. त्यामुळे दोन किलोमीटरमधील ४0 घरांचा आणि धनगर समाजाच्या मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. निमशिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. अंकली येथील पुलाचे काम अपूर्ण आहे. हेरले, अतिग्रे, उदगाव, जयसिंगपूर येथील अपुरे रस्त्याचे काम, सांगली, अंकली येथील भूसंपादन झालेले नाही, एवढे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंपनीला एक वर्ष लागेल; पण कंपनी रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करीत १ मेपासून टोल सुरू करण्यासाठी सुप्रीम कंपनी शिरोली आणि अंकली येथे टोलनाके उभारत आहे; पण याला जनतेतून विरोध होण्याची चिन्हे दिसत आहे.