शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कामात सुस्ताई, पण टोलची घाई

By admin | Updated: March 30, 2016 00:39 IST

शिरोलीत टोलनाक्यांची उभारणी : रस्त्याची ३० टक्के कामे अपूर्ण असल्याचा आंदोलकांचा दावा

सतीश पाटील -- शिरोली -कोल्हापूर-सांगली रस्त्यावर टोल बसवायला सुप्रीम कंपनीने घाई केली आहे; एवढ्या घाईने काम केले असते, तर एक वर्षापूर्वीच रस्ता पूर्ण झाला असता, अशी परिस्थिती आहे. चार वर्षांत रस्त्याचे जे काम झाले आहे, त्याबद्दलसुद्धा साशंकता आहे.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच कंपनीने टोल वसुलीची १ मे ही तारीखसुद्धा जाहीर केली आहे. अंकली आणि शिरोली येथे टोलनाके उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अजूनही रस्त्याचे ३0 टक्क्यांपेक्षा जास्त काम बाकी आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. कंपनीने दोन वर्षांत काम पूर्ण करायचे होते; पण तब्बल साडेतीन वर्षे झाली तरी अजून रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अतिग्रे येथील एक किलोमीटरमधील घरे निघालेली नाहीत. हातकणंगले येथील ८00 मीटरच्या उड्डाणपुलाला अजून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरीच दिलेली नाही. सुप्रीम कंपनीने कोणतीही मंजुरी घेण्यापूर्वीच उड्डाणपूल बांधायला सुरुवात केली होती. या पुलासाठी ३२ कोटी रुपये जादा खर्च अपेक्षित असल्याने ते काम अपूर्ण आहे. तमदलगे येथील भूसंपादन झालेले नाही. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये लोकांची घरे येतात. त्यांना योग्य मोबदला मिळाल्यानंतरच तेथील लोकांचे स्थलांतर होणार, पण अद्याप पैसेच मिळालेले नाहीत. त्यामुळे दोन किलोमीटरमधील ४0 घरांचा आणि धनगर समाजाच्या मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. निमशिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. अंकली येथील पुलाचे काम अपूर्ण आहे. हेरले, अतिग्रे, उदगाव, जयसिंगपूर येथील अपुरे रस्त्याचे काम, सांगली, अंकली येथील भूसंपादन झालेले नाही, एवढे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंपनीला एक वर्ष लागेल; पण कंपनी रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करीत १ मेपासून टोल सुरू करण्यासाठी सुप्रीम कंपनी शिरोली आणि अंकली येथे टोलनाके उभारत आहे; पण याला जनतेतून विरोध होण्याची चिन्हे दिसत आहे.