शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

हद्दवाढीसाठी आताच योग्य वेळ

By admin | Updated: June 12, 2016 01:38 IST

समिती शुक्रवारपासून कोल्हापुरात : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अडचणींत वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाने नियुक्त केलेली समिती येत्या शुक्रवारी (दि. १७) कोल्हापुरात येत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. समितीचा दौरा निश्चित झाल्यामुळे हद्दवाढ होण्याची शक्यता तयार झाली आहे. या समितीने निर्णय काहीही दिला तरी दोन्ही औद्योगिक वसाहती वगळून व शहरालगतची गावे समाविष्ट करून हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पालकमंत्री स्वत:च त्याबाबत फार आग्रही आहेत. आताच आॅक्टोबरपूर्वी त्याबाबत काही ठोस निर्णय होण्याची गरज आहे. अन्यथा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तर पालकमंत्र्यांना राजकीयदृष्ट्याही याबाबत काही निर्णय घेणे शक्य होणार नाही. एकदा जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर मग मात्र हद्दवाढ करणे राजकीय व कायदेशीरदृष्ट्या फारच अडचणीचे होईल. जिल्हा परिषदेच्या सभागृहाचीही आता मुदत संपत असल्यामुळे फारसा विरोध होणार नाही. नवे सभागृह आल्यावर हद्दवाढ करण्यास तीव्र विरोध होईल; कारण त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहाची पुनर्रचना होऊ शकते. त्याला निवडणुकीनंतर सहजासहजी कोण तयार होणार नाही. पालकमंत्री पाटील यांनी स्वत: लक्ष घालून याबाबत नागरिकांची आग्रही मागणी विचारात घेऊन तत्काळ ठोस निर्णय होण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागातील दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केली होती. ही समिती १७ व १८ रोजी कोल्हापूरला येऊन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा करून आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)