शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निराधार मुलांना आधार देणाऱ्यांवर उसनवारीची वेळ

By admin | Updated: October 27, 2015 00:15 IST

निरीक्षणगृह कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत; ‘आभास’चा पाठपुरावा

कोल्हापूर : गरीब, निराधार मुलांचे पोषण करून त्यांना आधार देणाऱ्या राज्यातील ६० निरीक्षणगृहांतील २७८ कर्मचाऱ्यांवर उसनवारी करून जगण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचे वेतन थकीत असल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. कोल्हापुरातील आभास फाउंडेशनने आवाज उठवीत संबंधित कर्मचाऱ्यांची वेतनाअभावी होत असलेली परवड ‘ई-मेल’द्वारे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्या तीन दिवसांपूर्वी मांडली आहे.राज्यातील बालविकास विभागातील १२ सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांची अनुदानित ४८ अशी एकत्रितपणे ६० निरीक्षणगृहे आहेत. या ठिकाणी सहा ते अठरा वयोगटातील निराधार, गरीब मुला-मुलींच्या संगोपनाचे काम या निरीक्षणगृहांतील कर्मचारी करतात. यातील काही गृहांना एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत अनुदान व कर्मचारी वेतन दिले जाते. निरीक्षणगृहांतील कर्मचाऱ्यांचे वेतन मंत्रालयातून काढण्यात येते. वेतन काढल्यानंतर ते पुणे आयुक्तालयाद्वारे वितरित करण्यात येते; पण मंत्रालयातून जूनपासून वेतन काढण्यात आलेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांसाठीची दोन आणि मुलींसाठीचे एक निरीक्षणगृह कार्यरत आहे. यातील मुलांच्या निरीक्षणगृहांमधील कर्मचाऱ्यांची ४० टक्के पदे रिक्त आहेत. शिवाय जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम होत असून, त्याचा फटका बाल विकासाच्या प्रक्रियेलादेखील बसत आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत असताना प्रशासन, सरकारचे त्याकडील दुर्लक्ष बाल विकासाला मारक ठरणारे आहे. सुधारित आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेतया निरीक्षणगृहांतील मुला-मुलींसाठी, त्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची गरज असल्याचे आभास फाउंडेशनच्या सचिव प्राजक्ता देसाई यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, शिक्षक अशी पदे नव्याने नियुक्त करावीत, अशी मागणी आम्ही केली आहे. निरीक्षणगृहांसाठी विविध ४२० पदे मंजूर आहेत. त्यापैकी १४२ पदे अद्याप रिक्त आहेत.बालकांच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी अशा महत्त्वाच्या पदांची गरज आहे. राज्यातील उदासीन धोरणांमुळे एकात्मिक बाल संरक्षण योजनेचा केंद्राने तयार केलेला सुधारित आराखडादेखील मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने या बालकांच्या पुनर्वसनाच्यादृष्टीने एकूणच निरीक्षणगृहांतील आणि बाल विकासातील सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. थकीत वेतन मिळण्यासह अन्य अडचणींची सोडवणूक होईपर्यंत ‘आभास’ पाठपुरावा करणार आहे.