शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

गैरव्यवस्थापनामुळेच कारखाने लिलावात काढण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:46 IST

कोल्हापूर : कार्यक्षेत्रामधून पुरेसा ऊस उपलब्ध होईल की नाही याची फारशी फिकीर न करता उभारणी केलेले कारखाने व त्यातही ...

कोल्हापूर : कार्यक्षेत्रामधून पुरेसा ऊस उपलब्ध होईल की नाही याची फारशी फिकीर न करता उभारणी केलेले कारखाने व त्यातही पुन्हा गैरव्यवस्थापन यांमुळेच तोटा होत जाऊन आता राज्यातील पाच कारखान्यांचा लिलाव करण्याची पाळी आली आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे सहकारी चळवळीचे आगर मानले जात होते. आता त्याच महाराष्ट्रात सहकारातील कारखान्यांची लिलावात विक्री होऊ लागली आहे आणि खासगी कारखान्यांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात सध्या ९५ सहकारी व ९२ खासगी कारखाने सुरू आहेत. सहकारामध्ये तोट्यात गेलेला कारखाना खासगी मालकाने घेतला की तो मात्र उत्तम पद्धतीने चालत असल्याचीही राज्यात ‘जरंडेश्वर’पासून अनेक उदाहरणे आहेत.

विक्रीस काढलेले कारखाने व अन्य सहकारी संस्थाही घेणार कोण, हा कळीचा मुद्दा आहे. त्यातील बहुतांश कारखाने तर भंगारात वजनावर विकावे लागतील, अशा स्थितीत असण्याची शक्यता आहे; कारण साखर कारखानदारीतील तंत्रज्ञान आता अधिक विकसित झाले आहे. त्यामुळे जुन्या प्रकारच्या यंत्रसामग्रीवरील कारखाने घेऊन चालविणे म्हणजे ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी स्थिती आहे. मुळात विदर्भ व मराठवाड्यात प्रचंड उन्हाळा असतो. अजूनही सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत. सरासरी अडीच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना हंगामात किमान चार लाख टनांचे गाळप झाले तरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो; परंतु पुरेसा ऊस नाही म्हणून गाळप नाही, गाळप नाही म्हणून तोटे वाढतात, तोटे वाढले म्हणून ऊस बिले थकीत आणि बिलेच मिळणार नसतील तर शेतकरी ऊस घालत नाहीत, अशा चक्रव्यूहात अडकलेले हे कारखाने आहेत. यातील साहेबराव डोणगावकर यांचा गंगापूरसारखा कारखाना तर १९७२चा आहे. साधारणत: १९७२ ते १९९० च्या दरम्यानचे हे कारखाने आहेत. आता हे जुने कारखाने विकत घेऊन तिथे नव्याने चालवण्याचे धाडस कोण करील? तशी शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे ते भंगारात विकणे व मिळेल ती रक्कम कर्ज खात्याला जमा करून घेणे एवढ्याचसाठी हा सगळा खटाटोप आहे.

शेतकरी वाऱ्यावर...

राज्य बँकेने त्यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी कारखान्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या पाच कारखान्यांतील हजारो शेतकऱ्यांची ऊस बिले, ठेवी, सभासद भांडवलाचे कोट्यवधी रुपये व कामगारांचे पगारही थकीत आहेत. त्यांच्या पैशांचे काय, त्याला मात्र कोणीच वाली नाही, हे जास्त संतापजनक आहे. ज्याच्यासाठी उद्योग उभारला तो मरतानाही बिचाऱ्या शेतकऱ्याचेच पुन्हा मरण अशातील हा प्रकार आहे.