शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवस्थापनामुळेच कारखाने लिलावात काढण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:46 IST

कोल्हापूर : कार्यक्षेत्रामधून पुरेसा ऊस उपलब्ध होईल की नाही याची फारशी फिकीर न करता उभारणी केलेले कारखाने व त्यातही ...

कोल्हापूर : कार्यक्षेत्रामधून पुरेसा ऊस उपलब्ध होईल की नाही याची फारशी फिकीर न करता उभारणी केलेले कारखाने व त्यातही पुन्हा गैरव्यवस्थापन यांमुळेच तोटा होत जाऊन आता राज्यातील पाच कारखान्यांचा लिलाव करण्याची पाळी आली आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे सहकारी चळवळीचे आगर मानले जात होते. आता त्याच महाराष्ट्रात सहकारातील कारखान्यांची लिलावात विक्री होऊ लागली आहे आणि खासगी कारखान्यांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात सध्या ९५ सहकारी व ९२ खासगी कारखाने सुरू आहेत. सहकारामध्ये तोट्यात गेलेला कारखाना खासगी मालकाने घेतला की तो मात्र उत्तम पद्धतीने चालत असल्याचीही राज्यात ‘जरंडेश्वर’पासून अनेक उदाहरणे आहेत.

विक्रीस काढलेले कारखाने व अन्य सहकारी संस्थाही घेणार कोण, हा कळीचा मुद्दा आहे. त्यातील बहुतांश कारखाने तर भंगारात वजनावर विकावे लागतील, अशा स्थितीत असण्याची शक्यता आहे; कारण साखर कारखानदारीतील तंत्रज्ञान आता अधिक विकसित झाले आहे. त्यामुळे जुन्या प्रकारच्या यंत्रसामग्रीवरील कारखाने घेऊन चालविणे म्हणजे ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी स्थिती आहे. मुळात विदर्भ व मराठवाड्यात प्रचंड उन्हाळा असतो. अजूनही सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत. सरासरी अडीच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना हंगामात किमान चार लाख टनांचे गाळप झाले तरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो; परंतु पुरेसा ऊस नाही म्हणून गाळप नाही, गाळप नाही म्हणून तोटे वाढतात, तोटे वाढले म्हणून ऊस बिले थकीत आणि बिलेच मिळणार नसतील तर शेतकरी ऊस घालत नाहीत, अशा चक्रव्यूहात अडकलेले हे कारखाने आहेत. यातील साहेबराव डोणगावकर यांचा गंगापूरसारखा कारखाना तर १९७२चा आहे. साधारणत: १९७२ ते १९९० च्या दरम्यानचे हे कारखाने आहेत. आता हे जुने कारखाने विकत घेऊन तिथे नव्याने चालवण्याचे धाडस कोण करील? तशी शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे ते भंगारात विकणे व मिळेल ती रक्कम कर्ज खात्याला जमा करून घेणे एवढ्याचसाठी हा सगळा खटाटोप आहे.

शेतकरी वाऱ्यावर...

राज्य बँकेने त्यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी कारखान्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या पाच कारखान्यांतील हजारो शेतकऱ्यांची ऊस बिले, ठेवी, सभासद भांडवलाचे कोट्यवधी रुपये व कामगारांचे पगारही थकीत आहेत. त्यांच्या पैशांचे काय, त्याला मात्र कोणीच वाली नाही, हे जास्त संतापजनक आहे. ज्याच्यासाठी उद्योग उभारला तो मरतानाही बिचाऱ्या शेतकऱ्याचेच पुन्हा मरण अशातील हा प्रकार आहे.