शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

टिंबर मार्केट भाजी विक्रेत्यांचा मोर्चा

By admin | Updated: March 14, 2016 23:41 IST

पुनर्वसनाचा प्रश्न : महापालिकेसमोर आयुक्तांची गाडी अडवून निदर्शने

कोल्हापूर : डोक्यावर भाजीची बुट्टी घेऊन टिंबर मार्केटमधील भाजी विक्रेत्या महिलांनी सोमवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शने केली. परिसरातील भाजी विक्रेत्यांचे वारंवार पुनर्वसन होऊनही पुन्हा त्यांचे पुनर्वसनाच्या नावाखाली हटविण्याचा महापालिका प्रशासनाचा डाव मोडून काढण्यासाठी या भाजी विक्रेत्यांनी हा मोर्चा काढून आयुक्त पी. शिवशंकर यांची महापाालिका प्रवेशद्वारातच गाडी अडविली. या आंदोलनाचे नेतृत्व मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी केले. संभाजीनगर परिसरातील भाजी विक्रेते हे टिंबर मार्केट परिसरात व्यवसाय करतात. हा व्यवसाय प्रथम स्वामी समर्थ मंदिर ते रेसकोर्स नाका या परिसरात सुरू होता. वाहतूक अडथळ्याचे कारण पुढे करत महापालिकेने त्यांना तेथून निर्माण चौक ते पेट्रोल पंपापर्यंत व्यवसायास भाग पाडले. पुन्हा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्यांचे पुनर्वसन टिंबर मार्केट परिसरात कायमस्वरूपी पट्टे मारून केले. गेली १५ वर्षे येथे हे भाजी विक्रेते येथे सुरळीत व्यवसाय करत आहेत. पुन्हा उद्योगपती, प्रशासन व लोकप्रतिनिधींचा संगनमताने या भाजी विक्रेत्यांना येथून हटविण्याचा डाव सुरू आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ‘मनसे’च्या नेतृत्वाखाली भाजी विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाकडे दाद मागितली. शिवाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. भाजी विक्रेत्या महिला डोक्यावर भाजीच्या बुट्ट्या घेऊन आल्या होत्या. मोर्चा महापालिकेवर पोहोचल्यावर प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांची गाडी महापालिकेत जात असताना या भाजी विक्रेत्यांनी त्यांची गाडी काही वेळ अडवून धिक्कार केला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. मोर्चात जिल्हाध्यक्ष राजू जाधव, बबन सावरे, नरेश चिक्कोडीकर, आण्णा तिळवे, सागर वासुदेव, भीमराव साखरे, विजय वाडकर, रशीद बागवान, अंजना चव्हाण, सिंधू कांबळे, रंजना खाडे, किरण पोतदार, सुरैया बागवान, बाळासाहेब यादव, अजय चौगुले, सतीश सावंत, योगेश कवाळे, प्रकाश तौर, बापू चव्हाण, मोहसीन बागवान,भाजी विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उन्हातही महिलांची लक्षणीय उपस्थितीरणरणत्या उन्हात भरदुपारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजी विक्रेते महिलांची संख्या मोठी होती, तर डोक्यावर भाजीच्या बुट्ट्या घेऊन अनेक वृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. कडक उन्हामुळे या मोर्चातील वृद्ध महिलांसह आंदोलकांची केविलवाणी परिस्थिती झाली होती.