शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टिक्केवाडी ग्रामस्थांचा जंगलात मुक्काम : घरदार उघडे सोडून गावाबाहेर वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:03 IST

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे टिक्केवाडी गाव आहे.

ठळक मुद्देग्रामदैवत भुजाईदेवीच्या श्रद्धेपोटी गुळं काढायची प्रथा

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे टिक्केवाडी गाव आहे. या गावातील ग्रामस्थ दर तीन वर्षांनी गूळ काढण्याच्या प्रथेप्रमाणे घरदार सताड उघडे सोडून गावाबाहेर जंगलात राहण्यासाठी जातात. या कालावधीत गावात एकही माणूस नसतो की, गोठ्यात एकही जनावर नसते. कोणत्याच घरात चूल पेटलेली नाही की दिवा पेटलेला नाही, ही आहे टिक्केवाडी गावची प्रथा. हा संपूर्ण गावच गेलाय ग्रामदैवत भुजाईदेवीच्या श्रद्धेपोटी जंगलात राहायला.

गावकºयांच्या भाषेत ‘गुळं काढायला’ अनेक वर्षे गुळं काढण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जोपासली जात आहे. सुशिक्षितांचे गाव अशी वेगळी ख्याती असलेल्या या गावाने धार्मिक प्रथा तितक्याच श्रद्धेने जोपासली आहे; पण पिढ्यान्पिढ्या या गावात ‘गुळं काढणं’ ही प्रथा चालत आली आहे. दर तीन वर्षांनी देवीच्या श्रद्धेपोटी ही प्रथा चालत आली आहे. परंपरेप्रमाणे गावातील सर्वच लहान-थोर गुरांसह घरदार उघडे सोडून जंगलाच्या सान्निध्यात राहावयास गेले आहेत. देवीच्या कृपेने गावात चोरी होत नाही. चोरीची इतिहासात नोंदही नाही, असे गावकºयांचे मत आहे. ग्रामस्थ ही प्राचीन परंपरा देवीच्या प्रेमापोटी जोपासत आहेत.

गुळं काढण्यापूर्वी ग्रामदैवत भुजाईला कौल लावला जातो. गाव सोडून गावच्या वेशीबाहेर राहायला जावे लागते. देवीने परवानगी दिल्यानंतर सर्व गाव घरात प्रवेश करतो. संसार व घरदार सोडून ग्रामस्थ वेशीबाहेर राहतात. शिवारात पालं, मांडव उभारून संसार थाटतात. निसर्गाच्या सान्निध्यात लहान-थोर जीवन व्यतित करतात. निसर्गात ते वनभोजनाचा आनंद घेतात. काहीजण स्वतंत्र तर काहीजण २० ते २५ कुटुंबे एकत्र येऊन एकच मांडव उभारून राहतात. गावातील स्त्रिया ग्रामीण गीतांमध्ये रंगून जातात. गौरी गीते, जात्यावरच्या ओव्या, रुखवत, उखाणे या ग्रामीण कार्यक्रमांचा रंग भरतो, तर पुरुष मंडळी भजनात रंगून जातात. तर तरुण बुद्धिबळ, कॅरम, मराठी, हिंदी गाण्यांच्या मैफलीत रंगतात. सारा गाव भुजाईदेवीच्या श्रद्धेने बहरून जातो. तालुक्यात सुशिक्षितांचा गाव अशी ओळख असताना गावाने प्रथेचा श्रद्धेने स्वीकार केला आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या प्रथेतून त्यांचे भुजाईदेवीवरील प्रेम या निमित्ताने पाहावयास मिळते.गुळं काढण्याच्या या प्रथेप्रमाणे जोपर्यंत भुजाईचा कौल होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांना गाव सोडून राहावे लागते. मागच्यावेळी सुमारे दीड महिना कौल मिळाला नसल्यामुळे जंगलात राहावे लागले होते. याचा निश्चित असा कालावधी कोणीही सांगू शकत नाही; पण विरक्त जीवन जगण्याची अनुभूती देणारा एक वेगळा अनुभव दर तीन वर्षांनी घेता येतो. काही लोक अंधश्रद्धा म्हणत असले तरीही जीवनाचा वेगळा अनुभव देणारी ही प्रथा भाविक मनोभावे पाळतात.- नेताजी गुरव, पोलीस पाटील