शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

‘बाहुबली’ गुरुकुलात स्रेहभोजनाने माजी विद्यार्थ्यांचा ‘थर्टी फर्स्ट’ - गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:02 IST

बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे

भरत शास्त्री ।बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करून वर्षाखेर व नववर्षाचे स्वागत करून आपले स्नेहसंमेलन पार पाडले. हे सर्व विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते.

१९९४ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी कोणतीही पाश्चिमात्य संस्कृती किंवा धांगडधिंगा यांना फाटा देत सेलिब्रेशन न करता आपण विधायक पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे ठरविले. आपण ज्या गुरुकुलमध्ये संस्कार घेतले तेथील विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.

या बॅचमधील विविध विद्यार्थी पुढे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, व्यवसाय यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. ब्रह्मचारी श्रीधर अण्णा यांनी १९९४ बॅचमधील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रत्येक व्यक्ती व कुटुंबीयांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून गुरुकुलने दिलेले धार्मिक संस्कार पुढेही न विसरण्याचे आवाहन केले. सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह आणि नैतिकता आपल्या आचरणामध्ये जोपासण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे नियोजन युवराज पाटील, योगेश पायशेट्टी, प्रवीण पाचोरे, उमेश मसरगुप्पी, विजयकुमार चौगुले, प्रशांत कोईक, जिनगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, जयकुमार चौगुले, सुदर्शन चौगुले, प्रवीण किणे, शीतल पाटील, शीतल बुरसे, आदींनी केले होते.

गुरुकुलमधील विद्यार्थी म्हणजे अस्सल सोनंबाहुबली गुरुकुलच्या मुशीतून धार्मिक संस्कार घेऊ न घडलेले विद्यार्थी जीवनात कधीही तत्त्वांपासून परावृत्त होत नाहीत, ते अस्सल सोनंच आहे. शतकोत्तर वाटचाल करणाºया या गुरुकुलातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ न गेले आहेत. ते विविध क्षेत्रात सचोटीने आणि न्यायाने कार्यरत आहेत. त्यांचे यश पाहून माझे हृदय प्रफुल्लित होते. आपल्या मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी आपण नेहमीच असे उपक्रम केले पाहिजेत. - बह्मचारी श्रीधर अण्णा