शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

नरकेंच्या भूमिकेने जिल्ह्यात खळबळ

By admin | Updated: September 11, 2016 00:22 IST

मागणी पचनी पडणार का? : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीत नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष, नरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत अरुण नरके यांनी घेतलेल्या उघड भूमिकेने शनिवारी जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली. दिवसभर ‘लोकमत’च्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली. नरके यांच्या भूमिकेला नेतेमंडळी कितपत दाद देतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर ‘अमूल’चे आव्हान परतवून लावण्यासाठी तयार असल्याचे अरुण नरके यांनी जाहीर केले. अरुण नरके हे ज्येष्ठ व अभ्यासू संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत संयमाने राजकारण केल्याने ते गेली चाळीस वर्षे सत्तेत राहिले आहेत. त्यांनी आताच अशी आक्रमक भूमिका घेण्यामागे नेमकी कारणे काय असू शकतात, याचीही चर्चा सुरू आहे. त्यात करवीरसह जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीपासून आपण अलिप्त राहण्याचे जाहीर करून त्यांनी दुसरा धक्का दिला आहे. करवीरच्या राजकारणात लक्ष देणार नसल्याचे सांगत पी. एन. पाटील यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे आमदार असल्याने चंद्रदीप नरके यांनी स्वत:चा बेस तयार केला आहे, असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना वाटते. ‘गोकुळ’चा इतिहास पाहिला तर आतापर्यंत नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मागणी केली जात होती; पण पहिल्यांदाच नरके यांनी प्रसारमाध्यमांतून मागणी केली आहे. त्यामुळे ही मागणी नेत्यांना पचनी पडणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)करवीर, कुंभी परिसरात चर्चा!नरके यांच्याभूमिकेचे पडसाद कुंभी-कासारी साखर कारखाना व करवीर मतदारसंघातउमटले आहेत.त्यांच्या भूमिकेनेनरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.गोकुळचा अध्यक्ष बदलायचा की नाही याबाबत आमची कोणतीच अद्याप चर्चा झालेली नाही. त्यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा झाल्यास पी. एन. पाटील यांच्याशी बोलूनच घेऊ, पण या घडीला तसा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही.- माजी आमदार महादेवराव महाडिकसत्तारूढ गटाचे नेतेतीन पर्याय असे असतीलनेते व संचालक यांच्यात समतोल राखण्याचे काम विश्वास पाटील यांनी केले आहे. सर्वसाधारण सभेत विरोधकांना रोखण्यात त्यांना अपयश आले असले तरी आता बदल करायचा म्हटला तर सतेज पाटील यांना घाबरून बदल केल्याचा संदेश जाईल. म्हणून विश्वास पाटील यांनाच कायम ठेवण्याची शक्यता आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून ‘अमूल’च्या संकटाचा सामना करण्यासाठी अरुण नरके यांचाही विचार होऊ शकतो; पण त्यांनी उघड घेतलेली भूमिका संचालकांसह नेत्यांना कितपत पचनी पडणार? हे महत्त्वाचे आहे.सर्वसाधारण सभा व्यवस्थित हाताळू शकले नाहीत म्हणून विश्वास पाटील यांना बदलायचे झाल्यास सहमतीचे नाव म्हणून रवींद्र आपटे यांचे नाव पुढे येऊ शकते.