शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नरकेंच्या भूमिकेने जिल्ह्यात खळबळ

By admin | Updated: September 11, 2016 00:22 IST

मागणी पचनी पडणार का? : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीत नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष, नरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत अरुण नरके यांनी घेतलेल्या उघड भूमिकेने शनिवारी जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली. दिवसभर ‘लोकमत’च्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली. नरके यांच्या भूमिकेला नेतेमंडळी कितपत दाद देतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर ‘अमूल’चे आव्हान परतवून लावण्यासाठी तयार असल्याचे अरुण नरके यांनी जाहीर केले. अरुण नरके हे ज्येष्ठ व अभ्यासू संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत संयमाने राजकारण केल्याने ते गेली चाळीस वर्षे सत्तेत राहिले आहेत. त्यांनी आताच अशी आक्रमक भूमिका घेण्यामागे नेमकी कारणे काय असू शकतात, याचीही चर्चा सुरू आहे. त्यात करवीरसह जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीपासून आपण अलिप्त राहण्याचे जाहीर करून त्यांनी दुसरा धक्का दिला आहे. करवीरच्या राजकारणात लक्ष देणार नसल्याचे सांगत पी. एन. पाटील यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे आमदार असल्याने चंद्रदीप नरके यांनी स्वत:चा बेस तयार केला आहे, असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना वाटते. ‘गोकुळ’चा इतिहास पाहिला तर आतापर्यंत नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मागणी केली जात होती; पण पहिल्यांदाच नरके यांनी प्रसारमाध्यमांतून मागणी केली आहे. त्यामुळे ही मागणी नेत्यांना पचनी पडणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)करवीर, कुंभी परिसरात चर्चा!नरके यांच्याभूमिकेचे पडसाद कुंभी-कासारी साखर कारखाना व करवीर मतदारसंघातउमटले आहेत.त्यांच्या भूमिकेनेनरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.गोकुळचा अध्यक्ष बदलायचा की नाही याबाबत आमची कोणतीच अद्याप चर्चा झालेली नाही. त्यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा झाल्यास पी. एन. पाटील यांच्याशी बोलूनच घेऊ, पण या घडीला तसा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही.- माजी आमदार महादेवराव महाडिकसत्तारूढ गटाचे नेतेतीन पर्याय असे असतीलनेते व संचालक यांच्यात समतोल राखण्याचे काम विश्वास पाटील यांनी केले आहे. सर्वसाधारण सभेत विरोधकांना रोखण्यात त्यांना अपयश आले असले तरी आता बदल करायचा म्हटला तर सतेज पाटील यांना घाबरून बदल केल्याचा संदेश जाईल. म्हणून विश्वास पाटील यांनाच कायम ठेवण्याची शक्यता आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून ‘अमूल’च्या संकटाचा सामना करण्यासाठी अरुण नरके यांचाही विचार होऊ शकतो; पण त्यांनी उघड घेतलेली भूमिका संचालकांसह नेत्यांना कितपत पचनी पडणार? हे महत्त्वाचे आहे.सर्वसाधारण सभा व्यवस्थित हाताळू शकले नाहीत म्हणून विश्वास पाटील यांना बदलायचे झाल्यास सहमतीचे नाव म्हणून रवींद्र आपटे यांचे नाव पुढे येऊ शकते.