शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

नरकेंच्या भूमिकेने जिल्ह्यात खळबळ

By admin | Updated: September 11, 2016 00:22 IST

मागणी पचनी पडणार का? : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीत नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष, नरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत अरुण नरके यांनी घेतलेल्या उघड भूमिकेने शनिवारी जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली. दिवसभर ‘लोकमत’च्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली. नरके यांच्या भूमिकेला नेतेमंडळी कितपत दाद देतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर ‘अमूल’चे आव्हान परतवून लावण्यासाठी तयार असल्याचे अरुण नरके यांनी जाहीर केले. अरुण नरके हे ज्येष्ठ व अभ्यासू संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत संयमाने राजकारण केल्याने ते गेली चाळीस वर्षे सत्तेत राहिले आहेत. त्यांनी आताच अशी आक्रमक भूमिका घेण्यामागे नेमकी कारणे काय असू शकतात, याचीही चर्चा सुरू आहे. त्यात करवीरसह जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीपासून आपण अलिप्त राहण्याचे जाहीर करून त्यांनी दुसरा धक्का दिला आहे. करवीरच्या राजकारणात लक्ष देणार नसल्याचे सांगत पी. एन. पाटील यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे आमदार असल्याने चंद्रदीप नरके यांनी स्वत:चा बेस तयार केला आहे, असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना वाटते. ‘गोकुळ’चा इतिहास पाहिला तर आतापर्यंत नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मागणी केली जात होती; पण पहिल्यांदाच नरके यांनी प्रसारमाध्यमांतून मागणी केली आहे. त्यामुळे ही मागणी नेत्यांना पचनी पडणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)करवीर, कुंभी परिसरात चर्चा!नरके यांच्याभूमिकेचे पडसाद कुंभी-कासारी साखर कारखाना व करवीर मतदारसंघातउमटले आहेत.त्यांच्या भूमिकेनेनरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.गोकुळचा अध्यक्ष बदलायचा की नाही याबाबत आमची कोणतीच अद्याप चर्चा झालेली नाही. त्यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा झाल्यास पी. एन. पाटील यांच्याशी बोलूनच घेऊ, पण या घडीला तसा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही.- माजी आमदार महादेवराव महाडिकसत्तारूढ गटाचे नेतेतीन पर्याय असे असतीलनेते व संचालक यांच्यात समतोल राखण्याचे काम विश्वास पाटील यांनी केले आहे. सर्वसाधारण सभेत विरोधकांना रोखण्यात त्यांना अपयश आले असले तरी आता बदल करायचा म्हटला तर सतेज पाटील यांना घाबरून बदल केल्याचा संदेश जाईल. म्हणून विश्वास पाटील यांनाच कायम ठेवण्याची शक्यता आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून ‘अमूल’च्या संकटाचा सामना करण्यासाठी अरुण नरके यांचाही विचार होऊ शकतो; पण त्यांनी उघड घेतलेली भूमिका संचालकांसह नेत्यांना कितपत पचनी पडणार? हे महत्त्वाचे आहे.सर्वसाधारण सभा व्यवस्थित हाताळू शकले नाहीत म्हणून विश्वास पाटील यांना बदलायचे झाल्यास सहमतीचे नाव म्हणून रवींद्र आपटे यांचे नाव पुढे येऊ शकते.