शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनवृद्धी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:53 IST

कोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे.

ठळक मुद्दे काळूलाल गुर्जर : राजस्थानात महाराष्ट्रविषयी जिव्हाळाप्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची संख्या पाहता त्या आधारे येथेही पर्यटनवृद्धी करणे शक्य असल्याचे मत राजस्थानचे संसदीय कार्य प्रमुख (कॅबिनेट दर्जा) काळूलाल गुर्जर यांनी व्यक्त केले.पुणे आणि कोल्हापूरच्या वैयक्तिक दौºयावर आलेल्या गुर्जर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंधांना उजाळा दिला. गुर्जर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ स्थान राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत आम्हांला जिव्हाळा आहे. आजही खुदाई करणारे, ब्लास्टिंग करणारे, आइस्क्रीम तयार करणारे अनेक राजस्थानी येथे वास्तव्याला आहेत.पुण्यात राजस्थानी समाजाच्या ‘भजनसंध्या’ कार्यक्रमासाठी आपण आलो होतो. कोल्हापूरचे स्नेही दत्ता सावंत यांच्या आग्रहामुळे येथे आलो. त्यांच्या बानगे या गावी जाऊन कुस्तीच्या आखाड्याला भेट दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो. महाराष्ट्राचे लोक प्रेमळ आहेत, याचा पुन्हा मला अनुभव आला.पर्यटनाबाबत बोलताना ते म्हणाले, राजस्थानमधील किल्ले, वाळवंट, तलावाचे प्रदेश या सर्व बाबींचा उपयोग करून पर्यटन वाढीमध्ये आम्ही यशस्वी ठरलो. वाळवंटातील फेस्टिव्हलला परदेशी पर्यटकांचा प्रतिसाद मिळतो. किल्ल्यांमध्ये हेरिटेज हॉटेल्स सुरू केली आहेत. राजस्थानमध्ये शेतकºयांना एक वर्षासाठी विनाव्याज कर्ज दिले जाते. यावेळी पुणे गुर्जर समाजाचे अध्यक्ष प्रकाश गुर्जर, विक्रमसिंह रजपूत, करणसिंह चुंडावत, दत्ता सावंत, सुनील कदम उपस्थित होते.आर्थिक निकषांवर आरक्षण हवेआरक्षणाचा मूळ हेतू बाजूला पडला असून, त्यामध्ये केवळ आता राजकारण सुरू आहे. पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण ठेवावे असे सूचित केले असताना ते ७० वर्षे सुरू राहिले. त्यामुळे प्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.