शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनवृद्धी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:53 IST

कोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे.

ठळक मुद्दे काळूलाल गुर्जर : राजस्थानात महाराष्ट्रविषयी जिव्हाळाप्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची संख्या पाहता त्या आधारे येथेही पर्यटनवृद्धी करणे शक्य असल्याचे मत राजस्थानचे संसदीय कार्य प्रमुख (कॅबिनेट दर्जा) काळूलाल गुर्जर यांनी व्यक्त केले.पुणे आणि कोल्हापूरच्या वैयक्तिक दौºयावर आलेल्या गुर्जर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंधांना उजाळा दिला. गुर्जर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ स्थान राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत आम्हांला जिव्हाळा आहे. आजही खुदाई करणारे, ब्लास्टिंग करणारे, आइस्क्रीम तयार करणारे अनेक राजस्थानी येथे वास्तव्याला आहेत.पुण्यात राजस्थानी समाजाच्या ‘भजनसंध्या’ कार्यक्रमासाठी आपण आलो होतो. कोल्हापूरचे स्नेही दत्ता सावंत यांच्या आग्रहामुळे येथे आलो. त्यांच्या बानगे या गावी जाऊन कुस्तीच्या आखाड्याला भेट दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो. महाराष्ट्राचे लोक प्रेमळ आहेत, याचा पुन्हा मला अनुभव आला.पर्यटनाबाबत बोलताना ते म्हणाले, राजस्थानमधील किल्ले, वाळवंट, तलावाचे प्रदेश या सर्व बाबींचा उपयोग करून पर्यटन वाढीमध्ये आम्ही यशस्वी ठरलो. वाळवंटातील फेस्टिव्हलला परदेशी पर्यटकांचा प्रतिसाद मिळतो. किल्ल्यांमध्ये हेरिटेज हॉटेल्स सुरू केली आहेत. राजस्थानमध्ये शेतकºयांना एक वर्षासाठी विनाव्याज कर्ज दिले जाते. यावेळी पुणे गुर्जर समाजाचे अध्यक्ष प्रकाश गुर्जर, विक्रमसिंह रजपूत, करणसिंह चुंडावत, दत्ता सावंत, सुनील कदम उपस्थित होते.आर्थिक निकषांवर आरक्षण हवेआरक्षणाचा मूळ हेतू बाजूला पडला असून, त्यामध्ये केवळ आता राजकारण सुरू आहे. पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण ठेवावे असे सूचित केले असताना ते ७० वर्षे सुरू राहिले. त्यामुळे प्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.