शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनवृद्धी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:53 IST

कोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे.

ठळक मुद्दे काळूलाल गुर्जर : राजस्थानात महाराष्ट्रविषयी जिव्हाळाप्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची संख्या पाहता त्या आधारे येथेही पर्यटनवृद्धी करणे शक्य असल्याचे मत राजस्थानचे संसदीय कार्य प्रमुख (कॅबिनेट दर्जा) काळूलाल गुर्जर यांनी व्यक्त केले.पुणे आणि कोल्हापूरच्या वैयक्तिक दौºयावर आलेल्या गुर्जर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंधांना उजाळा दिला. गुर्जर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ स्थान राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत आम्हांला जिव्हाळा आहे. आजही खुदाई करणारे, ब्लास्टिंग करणारे, आइस्क्रीम तयार करणारे अनेक राजस्थानी येथे वास्तव्याला आहेत.पुण्यात राजस्थानी समाजाच्या ‘भजनसंध्या’ कार्यक्रमासाठी आपण आलो होतो. कोल्हापूरचे स्नेही दत्ता सावंत यांच्या आग्रहामुळे येथे आलो. त्यांच्या बानगे या गावी जाऊन कुस्तीच्या आखाड्याला भेट दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो. महाराष्ट्राचे लोक प्रेमळ आहेत, याचा पुन्हा मला अनुभव आला.पर्यटनाबाबत बोलताना ते म्हणाले, राजस्थानमधील किल्ले, वाळवंट, तलावाचे प्रदेश या सर्व बाबींचा उपयोग करून पर्यटन वाढीमध्ये आम्ही यशस्वी ठरलो. वाळवंटातील फेस्टिव्हलला परदेशी पर्यटकांचा प्रतिसाद मिळतो. किल्ल्यांमध्ये हेरिटेज हॉटेल्स सुरू केली आहेत. राजस्थानमध्ये शेतकºयांना एक वर्षासाठी विनाव्याज कर्ज दिले जाते. यावेळी पुणे गुर्जर समाजाचे अध्यक्ष प्रकाश गुर्जर, विक्रमसिंह रजपूत, करणसिंह चुंडावत, दत्ता सावंत, सुनील कदम उपस्थित होते.आर्थिक निकषांवर आरक्षण हवेआरक्षणाचा मूळ हेतू बाजूला पडला असून, त्यामध्ये केवळ आता राजकारण सुरू आहे. पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण ठेवावे असे सूचित केले असताना ते ७० वर्षे सुरू राहिले. त्यामुळे प्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.