शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:22 IST

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये ...

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये २८९ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला अनेक पालकांनी इंग्रजी माध्यम आणि खासगी शाळांमधील वातावरण पाहून पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे जिल्हाभर खासगी आणि इंग्रजी शाळांची संख्याही भरमसाठ वाढलीे. याचा विपरीत परिणाम जिल्हा परिषदांच्या शाळांवर झाला. मात्र, सध्या जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू ठेवल्याने या शाळांकडे कल वाढला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल विद्यार्थीतालुका प्रवेशित इंग्रजी माध्यमातून खासगी शाळेतून एकूणशाळा जि. प. शाळेत जि. प. शाळेतआजरा ९ ३७ ११ ४८भुदरगड १७ ५३ २४ ७७चंदगड २२ ४४ १६ ६0गडहिंग्लज ५२ १00 ७२ १७२गगनबावडा ३ ५ 0 ५हातकणंगले ३९ ८४ ८0 १६४कागल ६२ १८३ 0 १८३करवीर ८९ २८९ २५८ ५४७पन्हाळा ३२ ६४ २६ ९0राधानगरी ३६ ८0 १ ८१शाहूवाडी २२ ७४ १३ ८७शिरोळ ४२ १0६ ६८ १७४एकूण ४२५ १११९ ५६९ १६८८जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के डिजिटल शाळा, माध्यान्ह भोजन योजना, विज्ञान प्रयोगशाळा, इस्रो भेट असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रह धरला जात असून, याचाच परिणाम म्हणून जि.प.च्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.- अंबरीश घाटगे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूरसर्व शिक्षा अभियान, ज्ञानरचनावादी शिक्षण, शाळाबाह्य व दिव्यांग बालकांच्या शिक्षणाची सुविधा अशा अनेक योजनांमुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षेचे निकाल उच्च दर्जाचे आहेत. या सगळ्यांचा विचार करून पालक निर्णय घेत असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रवेश होत आहेत.- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर