शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:22 IST

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये ...

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये २८९ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला अनेक पालकांनी इंग्रजी माध्यम आणि खासगी शाळांमधील वातावरण पाहून पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे जिल्हाभर खासगी आणि इंग्रजी शाळांची संख्याही भरमसाठ वाढलीे. याचा विपरीत परिणाम जिल्हा परिषदांच्या शाळांवर झाला. मात्र, सध्या जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू ठेवल्याने या शाळांकडे कल वाढला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल विद्यार्थीतालुका प्रवेशित इंग्रजी माध्यमातून खासगी शाळेतून एकूणशाळा जि. प. शाळेत जि. प. शाळेतआजरा ९ ३७ ११ ४८भुदरगड १७ ५३ २४ ७७चंदगड २२ ४४ १६ ६0गडहिंग्लज ५२ १00 ७२ १७२गगनबावडा ३ ५ 0 ५हातकणंगले ३९ ८४ ८0 १६४कागल ६२ १८३ 0 १८३करवीर ८९ २८९ २५८ ५४७पन्हाळा ३२ ६४ २६ ९0राधानगरी ३६ ८0 १ ८१शाहूवाडी २२ ७४ १३ ८७शिरोळ ४२ १0६ ६८ १७४एकूण ४२५ १११९ ५६९ १६८८जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के डिजिटल शाळा, माध्यान्ह भोजन योजना, विज्ञान प्रयोगशाळा, इस्रो भेट असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रह धरला जात असून, याचाच परिणाम म्हणून जि.प.च्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.- अंबरीश घाटगे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूरसर्व शिक्षा अभियान, ज्ञानरचनावादी शिक्षण, शाळाबाह्य व दिव्यांग बालकांच्या शिक्षणाची सुविधा अशा अनेक योजनांमुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षेचे निकाल उच्च दर्जाचे आहेत. या सगळ्यांचा विचार करून पालक निर्णय घेत असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रवेश होत आहेत.- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर