शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

उंबरठा उत्पन्नच मदतीतील अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 00:02 IST

पीक विमा योजना : निकष बदलण्याची मागणी; दुष्काळाचा झटका तरीही कोल्हापूरकर वंचितच

राजाराम लोंढे - कोल्हापूरउंबरठा उत्पन्न जास्त असल्याने पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निकषांमुळे विमा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने खरिपाचे उत्पन्न ५० टक्क्यांच्या खाली आले, कधी नव्हे त्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तरी सरासरी उंबरठा उत्पन्नात बसत नसल्याने विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागच घेता येत नाही. यासाठी विमा योजनेचे निकष बदलण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मंडळातील अधिसूचित पिकांचे मागील अकरा वर्षांचे सरासरी उत्पन्न लक्षात घेऊन मंडळातील सरासरी उत्पन्नाचे चढ-उताराचे प्रमाण काढले जाते. या चढ-उताराच्या प्रमाणावरून जोखीम स्तर ठरविला जातो. चढ-उताराचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, उच्च जोखीम स्तर १५ ते २० टक्के व मध्यम जोखीम स्तर १५ टक्क्यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. एकंदरीत उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न कमी आले तरच नुकसानभरपाई मिळते. राष्ट्रीय पीक विमा योजनेचे निकष हा उंबरठा उत्पन्न आहे, हीच शेतकऱ्यांची खरी अडचण आहे. निकषांत बदल करावा, अशी मागणी गेले अनेक वर्षे शेतकऱ्यांमधून होत आहे, पण विमा कंपन्या त्याला तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देणार असल्याची घोषणा केली पण पीक विम्याच्या निकषांमध्ये काही लवचिकता असणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. पर्जन्यमान दरवर्षी वेगाने बदलत आहे, लहरी हवामानामुळे शेती बेभरवश्याची झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्याची झळ शेतकऱ्यांना बसली आहे. कोल्हापूरकरांनी आजपर्यंत असा दुष्काळ कधी अनुभवला नव्हता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच असणे महत्त्वाचे ठरणार आहे. विमा कंपन्यांनीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी निकषांमध्ये लवचिकता आणून पुढे आले पाहिजे, तरच सरकारचा हेतू सफल होऊ शकेल. कोल्हापूर जिल्हा व सांगली-सातारा जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील तालुक्यात पर्जन्यमान चांगले असल्याने उंबरठा उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा योजनेचा फारसा लाभ होत नाही. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, पण मागील वर्षांचे सरासरी उत्पन्न धरले जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होत नाही. सरकारला खरोखरंच शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर निकषांत काही बदल करणे गरजेचे आहे. - प्रताप चिपळूणकर, शेतकरीशेतकऱ्यांची पाठविमा उतरवूनही निकषांमुळे भरपाईची शक्यता नसल्यानेच शेतकरी विमा योजनेत सहभागी होत नाही. यासाठी विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.