शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

उंबरठा उत्पन्नच मदतीतील अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 00:02 IST

पीक विमा योजना : निकष बदलण्याची मागणी; दुष्काळाचा झटका तरीही कोल्हापूरकर वंचितच

राजाराम लोंढे - कोल्हापूरउंबरठा उत्पन्न जास्त असल्याने पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निकषांमुळे विमा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने खरिपाचे उत्पन्न ५० टक्क्यांच्या खाली आले, कधी नव्हे त्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तरी सरासरी उंबरठा उत्पन्नात बसत नसल्याने विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागच घेता येत नाही. यासाठी विमा योजनेचे निकष बदलण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मंडळातील अधिसूचित पिकांचे मागील अकरा वर्षांचे सरासरी उत्पन्न लक्षात घेऊन मंडळातील सरासरी उत्पन्नाचे चढ-उताराचे प्रमाण काढले जाते. या चढ-उताराच्या प्रमाणावरून जोखीम स्तर ठरविला जातो. चढ-उताराचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, उच्च जोखीम स्तर १५ ते २० टक्के व मध्यम जोखीम स्तर १५ टक्क्यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. एकंदरीत उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न कमी आले तरच नुकसानभरपाई मिळते. राष्ट्रीय पीक विमा योजनेचे निकष हा उंबरठा उत्पन्न आहे, हीच शेतकऱ्यांची खरी अडचण आहे. निकषांत बदल करावा, अशी मागणी गेले अनेक वर्षे शेतकऱ्यांमधून होत आहे, पण विमा कंपन्या त्याला तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देणार असल्याची घोषणा केली पण पीक विम्याच्या निकषांमध्ये काही लवचिकता असणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. पर्जन्यमान दरवर्षी वेगाने बदलत आहे, लहरी हवामानामुळे शेती बेभरवश्याची झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्याची झळ शेतकऱ्यांना बसली आहे. कोल्हापूरकरांनी आजपर्यंत असा दुष्काळ कधी अनुभवला नव्हता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच असणे महत्त्वाचे ठरणार आहे. विमा कंपन्यांनीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी निकषांमध्ये लवचिकता आणून पुढे आले पाहिजे, तरच सरकारचा हेतू सफल होऊ शकेल. कोल्हापूर जिल्हा व सांगली-सातारा जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील तालुक्यात पर्जन्यमान चांगले असल्याने उंबरठा उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा योजनेचा फारसा लाभ होत नाही. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, पण मागील वर्षांचे सरासरी उत्पन्न धरले जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होत नाही. सरकारला खरोखरंच शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर निकषांत काही बदल करणे गरजेचे आहे. - प्रताप चिपळूणकर, शेतकरीशेतकऱ्यांची पाठविमा उतरवूनही निकषांमुळे भरपाईची शक्यता नसल्यानेच शेतकरी विमा योजनेत सहभागी होत नाही. यासाठी विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.