शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत वर्षा पर्यटनाचे तीनतेरा

By admin | Updated: July 22, 2014 23:16 IST

मास्टर प्लॅनही बासनात : अवजड वाहतूक, अपुरे पोलीस बळ

अनंत जाधव - सावंतवाडीआंबोलीतील वर्षा पर्यटन सुरू होण्याआधी पोलीस प्रशासन नेहमीच खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी ‘मास्टर प्लॅन’ तयार करीत असते. पण यावर्षी मास्टर प्लॅन सोडाच, जादा पोलीस कुमकही नसल्याने हंगामातील शेवटचा रविवार पर्यटकांसाठी डोकेदुखीचा ठरला. तब्बल १७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि सात तास वाहतूक कोंडी हे पोलिसांचे अपयशच मानावे लागेल. आंबोली वर्षा पर्यटनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा व बेळगाव या राज्यातील पर्यटकही येथे येतात. या वर्षी मात्र अपुरा आणि उशिराने आलेला पाऊस तसेच उशिराने वाहणारे धबधबे यामुळे पर्यटकांना अखेरचे दोन रविवारच वर्षा पर्यटनासाठी मिळाले होते. त्यात शेवटचा रविवार ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरवर्षी वर्षा पर्यटनात रविवारच्या दिवशी आंबोलीतून सावंतवाडीकडे येणारी अवजड वाहतूक नांगरतास नजीक उभी करून ठेवली जाते. तर सावंतवाडीतून आंबोलीकडे जाणारी वाहतूक दाणोलीत थांबविण्यात येते. या खबरदारीमुळे आंबोलीत सहसा वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, यावर्षी आंबोलीच्या वर्षा पर्यटनासाठी मास्टर प्लॅनच तयार करण्यात आला नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ओरोस येथून येणार की सावंतवाडीतीलच ठेवणार यापासूनच वर्षा पर्यटनाचे तीन तेरा वाजले. मध्येच वाहतूक कोडींही सोडवत होते. त्यातच दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आंबोलीत शेवटच्या रविवारी साधारणत: ८० ते ९० हजारांच्या घरात पर्यटक होते. यातील बहुतेक पर्यटक हे दुचाकी घेऊन आले होते. हे दुचाकीस्वार मिळेल तेथे दुचाकी घुसवित असल्याने पोलिसही वैतागले होते. त्यातच १७ ते १८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि तब्बल सात तास वाहतूक कोंडी यामुळे एक किलोमीटर अंतर जाण्यासाठीही एका वाहनाला तब्बल अडीच तास लागत होते. ४ आंबोली हे वर्षा पर्यटनातील राज्यातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. परंतु वाहतूक कोंडी आणि मद्यधुंद पर्यटकांचा त्रास अनुभवल्यावर अनेक पर्यटक पुन्हा येथे येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे. अशा उपाययोजना झाल्यास रविवारसारखा प्रकार पुन्हा घडणार नाही.पार्किंगची सोय होणे गरजेचे४ आंबोली वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटक येतात. परंतु वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे गाड्या रस्त्यानजीक कुठेही पार्किंग करून पर्यटनाचा आनंद लुटतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि याचा त्रास इतर पर्यटकांना सोसावा लागतो. पार्किंगची योग्य सोय केल्यास यातून बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्तावही केला आहे. पण कदाचित मुहूर्त मिळत नसल्याने आणि त्यातच वनविभाग खोडा घालत असल्याने पार्किंगसारखे अनेक प्रश्न धूळखात पडले आहेत.४ आंबोली हे वर्षा पर्यटनातील राज्यातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. परंतु वाहतूक कोंडी आणि मद्यधुंद पर्यटकांचा त्रास अनुभवल्यावर अनेक पर्यटक पुन्हा येथे येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे. अशा उपाययोजना झाल्यास रविवारसारखा प्रकार पुन्हा घडणार नाही.पार्किंगची सोय होणे गरजेचे४ आंबोली वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटक येतात. परंतु वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे गाड्या रस्त्यानजीक कुठेही पार्किंग करून पर्यटनाचा आनंद लुटतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि याचा त्रास इतर पर्यटकांना सोसावा लागतो. पार्किंगची योग्य सोय केल्यास यातून बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्तावही केला आहे. पण कदाचित मुहूर्त मिळत नसल्याने आणि त्यातच वनविभाग खोडा घालत असल्याने पार्किंगसारखे अनेक प्रश्न धूळखात पडले आहेत.