शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत वर्षा पर्यटनाचे तीनतेरा

By admin | Updated: July 22, 2014 23:16 IST

मास्टर प्लॅनही बासनात : अवजड वाहतूक, अपुरे पोलीस बळ

अनंत जाधव - सावंतवाडीआंबोलीतील वर्षा पर्यटन सुरू होण्याआधी पोलीस प्रशासन नेहमीच खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी ‘मास्टर प्लॅन’ तयार करीत असते. पण यावर्षी मास्टर प्लॅन सोडाच, जादा पोलीस कुमकही नसल्याने हंगामातील शेवटचा रविवार पर्यटकांसाठी डोकेदुखीचा ठरला. तब्बल १७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि सात तास वाहतूक कोंडी हे पोलिसांचे अपयशच मानावे लागेल. आंबोली वर्षा पर्यटनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा व बेळगाव या राज्यातील पर्यटकही येथे येतात. या वर्षी मात्र अपुरा आणि उशिराने आलेला पाऊस तसेच उशिराने वाहणारे धबधबे यामुळे पर्यटकांना अखेरचे दोन रविवारच वर्षा पर्यटनासाठी मिळाले होते. त्यात शेवटचा रविवार ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरवर्षी वर्षा पर्यटनात रविवारच्या दिवशी आंबोलीतून सावंतवाडीकडे येणारी अवजड वाहतूक नांगरतास नजीक उभी करून ठेवली जाते. तर सावंतवाडीतून आंबोलीकडे जाणारी वाहतूक दाणोलीत थांबविण्यात येते. या खबरदारीमुळे आंबोलीत सहसा वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, यावर्षी आंबोलीच्या वर्षा पर्यटनासाठी मास्टर प्लॅनच तयार करण्यात आला नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ओरोस येथून येणार की सावंतवाडीतीलच ठेवणार यापासूनच वर्षा पर्यटनाचे तीन तेरा वाजले. मध्येच वाहतूक कोडींही सोडवत होते. त्यातच दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आंबोलीत शेवटच्या रविवारी साधारणत: ८० ते ९० हजारांच्या घरात पर्यटक होते. यातील बहुतेक पर्यटक हे दुचाकी घेऊन आले होते. हे दुचाकीस्वार मिळेल तेथे दुचाकी घुसवित असल्याने पोलिसही वैतागले होते. त्यातच १७ ते १८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि तब्बल सात तास वाहतूक कोंडी यामुळे एक किलोमीटर अंतर जाण्यासाठीही एका वाहनाला तब्बल अडीच तास लागत होते. ४ आंबोली हे वर्षा पर्यटनातील राज्यातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. परंतु वाहतूक कोंडी आणि मद्यधुंद पर्यटकांचा त्रास अनुभवल्यावर अनेक पर्यटक पुन्हा येथे येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे. अशा उपाययोजना झाल्यास रविवारसारखा प्रकार पुन्हा घडणार नाही.पार्किंगची सोय होणे गरजेचे४ आंबोली वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटक येतात. परंतु वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे गाड्या रस्त्यानजीक कुठेही पार्किंग करून पर्यटनाचा आनंद लुटतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि याचा त्रास इतर पर्यटकांना सोसावा लागतो. पार्किंगची योग्य सोय केल्यास यातून बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्तावही केला आहे. पण कदाचित मुहूर्त मिळत नसल्याने आणि त्यातच वनविभाग खोडा घालत असल्याने पार्किंगसारखे अनेक प्रश्न धूळखात पडले आहेत.४ आंबोली हे वर्षा पर्यटनातील राज्यातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. परंतु वाहतूक कोंडी आणि मद्यधुंद पर्यटकांचा त्रास अनुभवल्यावर अनेक पर्यटक पुन्हा येथे येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे. अशा उपाययोजना झाल्यास रविवारसारखा प्रकार पुन्हा घडणार नाही.पार्किंगची सोय होणे गरजेचे४ आंबोली वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटक येतात. परंतु वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे गाड्या रस्त्यानजीक कुठेही पार्किंग करून पर्यटनाचा आनंद लुटतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि याचा त्रास इतर पर्यटकांना सोसावा लागतो. पार्किंगची योग्य सोय केल्यास यातून बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्तावही केला आहे. पण कदाचित मुहूर्त मिळत नसल्याने आणि त्यातच वनविभाग खोडा घालत असल्याने पार्किंगसारखे अनेक प्रश्न धूळखात पडले आहेत.