शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तीन हजार वाहक-चालकांचा रोज लाखो प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:44 IST

कोल्हापूर : लाॅकडाऊनपूर्वीप्रमाणेच एसटीची लालपरी पुन्हा रुळावर येऊ लागली असून, रोज तीन हजार चालक-वाहक रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. ...

कोल्हापूर : लाॅकडाऊनपूर्वीप्रमाणेच एसटीची लालपरी पुन्हा रुळावर येऊ लागली असून, रोज तीन हजार चालक-वाहक रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. यात सुमारे पावणेदोन लाख प्रवाशांशी या कर्मचाऱ्यांचा संपर्क येऊ लागला आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे वाहक-चालकांसह प्रवाशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर आगाराच्या ७०० बस राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत धावत आहे.

लाॅकडाऊनच्या काळात ६० ते ७० दिवस एसटीची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक सीट सोडून प्रवाशांना तालुकांतर्गत प्रवासाला मुभा दिली. सर्व प्रवाशांची थर्मल टेस्ट केल्यानंतर त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यानंतर आता पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरू आहे. यात राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच गोवा, उत्तर कर्नाटक, आंध्र आदी ठिकाणी ही सेवा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, चंदगड, आजरा, इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले, शिरोळ, गारगोटी, मुरगूड, राधानगरी आदी ठिकाणी प्रवासी वाहतुकीला उत्तम प्रतिसाद आहे. केवळ गगनबावडा मार्गावरील वाहतुकीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद आहे. सर्वच आगारांतून सातशे बस रात्रं-दिवस असून, त्यांच्याकडून किमान दोन ते अडीच लाख किलोमीटरचे अंतर पार केले जाते. एकूणच सर्व परिस्थिती पूर्ववत होत असताना आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाल्यास एसटी महामंडळाचे कंबरडे मोडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती आहे.

विनामास्क प्रवास

अनेक प्रवासी विनामास्क बसमधून प्रवास करतात. त्यांना वाहकाने हटकले की, त्यांच्याबरोबर वादावादी करणे, असे प्रकार वारंवार होतात. यापूर्वी महामंडळाकडून प्रवाशांची थर्मल चाचणी केली जात होती. मात्र, ती मागे पडली. आता सर्वच आलबेल असल्यासारखे सर्व प्रवासी वावरत आहेत.

लसीकरण अद्यापही नाही

सद्य:स्थितीत कोल्हापूर विभागात चालक (१५००), वाहक (१५००), असे तीन हजार कर्मचारी एसटी बसमधून लाखो प्रवाशांसोबत दिवस-रात्र असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात या विभागात आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोविशिल्ड लस देणे गरजेची बाब आहे, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

बस -७००

फेऱ्या - ४५००

कि.मी. अंतर - २ ते २.५० लाख अंतर रोज

प्रवासी संख्या : १ लाख ७५ हजार ते दोन लाख इतकी

कोट

कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत वरिष्ठ अथवा जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही सूचना अथवा आदेश आलेला नाही. तो आल्यास त्वरित अंमलबजावणी करू. सद्य:स्थितीत आमचे सर्व कर्मचारी योग्य ती काळजी घेऊनच काम करीत आहेत.

- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग.