इचलकरंजी : येथील एका सायझिंग कामगाराला रस्त्यात अडवून मारहाण करत मोबाइल आणि २१ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. ही घटना २६ नोव्हेंबर २०१९ ला घडली होती. हे तिघे बालिका अपहरण व अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आहेत.
शुभम नितीन भोसले (वय २०, रा. कोरोची, ता. हातकणंगले), सौरभ मकरध्वज माने (२१, रा. जयभीमनगर) आणि रोहित गजानन जाधव (१९, रा. गणेशनगर), अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील तिघे संशयित हे अट्टल गुन्हेगार असून, त्यांनी ऐन दिवाळीदिवशी एका बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. त्याचदरम्यान बोनस घेऊन निघालेल्या गुरव यांची लूट केली होती. अत्याचार प्रकरणात तिघे जण न्यायालयीन कोठडीत असून, या लूटमारप्रकरणी न्यायालयाच्या परवानगीने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
फोटो ओळी १८०२२०२१-आयसीएच-०४ इचलकरंजीतील वाटमारी प्रकरणात शिक्षा लागलेल्या तिघा आरोपींची पोलिसांनी कारागृहात रवानगी केली.