शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शेतकरी संघाच्या तीन ज्येष्ठ संचालकांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कदम, मानसिंगराव जाधव व विजयादेवी राणे यांनी आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कदम, मानसिंगराव जाधव व विजयादेवी राणे यांनी आपल्या पदाचे गुरुवारी राजीनामे दिले. यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आले असून, संघावर प्रशासक नेमणुकीची मागणी विरोधी गटाने जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. संचालक मंडळ अल्पमतात आले असल्याने संघावर प्रशासक का नेमू नये, अशी नोटीस सहकार विभाग काढू शकते.

शेतकरी संघातील अपहार व चुकीच्या कारभारामुळे संचालक मंडळात दोन गट पडले होते. शिरोळ शाखेसह अनेक शाखांत लाखो रुपयांचा अपहार झाल्याने सहकार विभागाने कलम ८८ ची चौकशी लावली आहे. गेल्या पाच वर्षांत भूविकास बँकेच्या थकबाकीपोटी युवराज पाटील, मानसिंग पाटील, एम. एम. पाटील यांना सहकार विभागाने अपात्र केले. त्यातच गेल्या पाच वर्षांत दिलीपसिंह पाटील, सुमित्रादेवी शामराव शिंदे, शोभना शिंदे- नेसरीकर, आण्णाप्पा चौगुले व बाबासाहेब पाटील-भुयेकर यांचे निधन झाले. संचालक मंडळातील आठ जागा रिक्त झाल्या. संचालक मंडळ १९ जणांचे होते. त्यातील आठ जागा रिक्त झाल्याने उर्वरित अकरा संचालकांपैकी दोन संचालक सभेलाच येत नसल्याने तांत्रिकदृष्ट्या संचालक मंडळ अल्पमतात आले होते. त्यातच आणखी तिघांनी गुरुवारी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले. त्यामुळे प्रशासक नेमावा, अशी मागणी संघाचे माजी संचालक अजितसिंह मोहिते व सुरेश देसाई यांनी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.

तक्रारीची दाद न घेतल्यानेच राजीनामे

संघाच्या हिताविरोधी भूमिका सत्ताधारी घेत असल्याने सातत्याने विरोध केला. मात्र, ते बहुमताच्या बळावर चुकीचे निर्णय घेत गेले. आमच्या तक्रारीला दाद न दिल्याने राजीनामे देत असल्याचे कारण तिघांनी राजीनाम्यात दिले आहे.

राजीनामे स्वीकारण्यास टाळाटाळ

तीन संचालक राजीनामे सादर करणार याची कुणकुण लागताच संघाचे प्रभारी व्यवस्थापक सचिन सरनोबत हे गायब झाले. विशेष म्हणजे टपाल विभागही तातडीने बंद केला. अखेर तिघांनी राजीनाम्याची प्रत जिल्हा उपनिबंधकांकडे दिली. संचालकांनी राजीनामे दिला की तो मंजूर असतो, असे पोटनियम आहे.

ही आहेत राजीनाम्याची कारणे

संघाच्या लक्ष्मीपुरी, राजारामपुरीतील मोक्याच्या जागा आर्थिक गैरव्यवहार करून परत केल्या.

गूळ, खत, पेट्रोल विभागातील बेकायदेशीर उधारी.

शिरोळ शाखेतील ४० लाखांचा अपहार.

अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामांवर घेणे.

नोकर भरतीतील आर्थिक गैरव्यवहार.