शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

त्रिसदस्यीय रचनेने उमेदवारांची दमछाक वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : महापालिका निवडणूक लढवायचीच या इराद्याने गेल्या वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आखाड्यात उतरलेल्या अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : महापालिका निवडणूक लढवायचीच या इराद्याने गेल्या वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आखाड्यात उतरलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांची त्रिसदस्यीय प्रभाग रचनेने झोप उडवली आहे. मर्यादित प्रभागातच संपर्क ठेवून निवडणुकीसाठी जोडण्या लावू पाहणाऱ्या इच्छुकांना आता भल्या मोठ्या प्रभागात राजकीय सांगड घालावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवाराचा खर्च आणि प्रचारादरम्यान होणारी ''दमछाक'' वाढणार आहे. यापूर्वी प्रभागात एकसदस्यीय पद्धत होती. त्यामुळे उमेदवार आपल्या सहा ते सात हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात लक्ष केंद्रित करत असे. त्यामुळे खर्च करतानाही उमेदवाराकडून ठरावीक भागातच जास्त खर्च केला जात असे. परंतु आता अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात प्रचारासाठी उमेदवाराला फिरावे लागणार आहे. एवढा मोठा प्रभाग फिरताना व प्रत्येक मतदाराची माहिती घेताना उमेदवाराची आणि त्याच्या यंत्रणेची पुरती दमछाक होणार आहे. दरम्यान, जे इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशांनी गेल्या वर्षापासून निवडणुकीची तयारी केली आहे. आपल्या भागात खर्च केला आहे. अनेक कार्यकर्ते सांभाळले आहेत. भागातील प्रत्येकाच्या वाढदिवसाला हजेरी लावली आहे. परंतु आता प्रभाग मोठा झाला असल्याने अन्य दोन प्रभागात त्यांना आपली ओळख नव्याने निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी त्याला त्या भागात काम करावे लागणार आहे. नव्याने मतदारांच्या ओळखी वाढवाव्या लागणार आहेत. कार्यकर्त्यांचे जाळे विणावे लागणार आहे. या सर्व गोष्टी करताना खर्चाचा हातही थोडाफार सैल सोडावा लागणार आहे. दरम्यान, तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अपक्ष उमेदवारांची संख्याही घटण्याची शक्यता आहे.